शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

अभिनेत्री आमरीनच्या मारेकऱ्यांना कंठस्नान, 4 दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 11:26 IST

सुरक्षा दलांकडून काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा

सुरेश डुग्गरलाेकमत न्यूज नेटवर्कजम्मू : काश्मीरमधील प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आमरीन भट्ट यांची दाेन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली हाेती. त्यांच्या मारेकऱ्यांना ४८ तासांमध्ये सुरक्षादलांनी यमसदनी धाडले आहे. सुरक्षादलांनी मुश्ताक भट्ट आणि फरहान हबीब अशी ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. लष्कर-ए-ताेयबाचा कमांडर लतीफ याच्या इशाऱ्यावरून आमरीन यांची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. 

गेल्या २४ तासांमध्ये सुरक्षादलांनी वेगवेगळ्या चकमकींमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. चाैघेही ‘लष्कर’चे सदस्य हाेते. काश्मीरचे पाेलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी यासंदर्भात सांगितले, की बडगाममधील चाडुरा भागात मुश्ताक आणि फरहान हे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली हाेती. त्यांना आत्मसमर्पणाची पूर्ण संधी देण्यात आली हाेती. दोघांनी आमरीन यांच्यावर त्यांच्या घरासमोरच गोळीबार केला होता. तर, साैरा भागातही चकमकीत आणखी दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. 

गेल्या पाच महिन्यांत १५ जवान शहीदगेल्या जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांत १५ नागरिकांचा मृत्यू झाला, तर सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकींमध्ये १५ जवान शहीद झाले आहेत. येत्या ३० जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यात सहभागी होणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी या मार्गावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. काश्मिरी पंडित राहुल भट्ट, अभिनेत्री अमरीन भट्ट यांच्या हत्येमुळे हे स्पष्ट झाले की, दहशतवादी काश्मिरी पंडित व नामवंत लोकांना लक्ष्य करत आहेत.

यंदाच्या वर्षी ८८ दहशतवाद्यांचा खात्माकाश्मीरमध्ये यंदाच्या वर्षी सुरक्षा जवानांनी ८८ दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामध्ये ३० विदेशी दहशतवाद्यांचा समावेश आहे. काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी रद्द केले. तेव्हापासून आजवर ५५० दहशतवाद्यांना सुरक्षा जवानांनी कंठस्नान घातले आहे. या व्यापक कारवाईमुळे दहशतवाद्यांनी आपल्या व्यूहनीतीत बदल केला. घातपाती कारवाया घडविण्यासाठी ते काश्मीरमधील स्थानिक युवकांचा वापर अधिक प्रमाणात करू लागले.

तीन दिवसांत दहा दहशतवादी ठारदाेघांनी नुकताच ‘लष्कर’मध्ये प्रवेश केला हाेता. त्यांच्याकडून एके-५६ रायफल, चार मॅगझीन आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये दहा दहशतवाद्यांना ठार मारले आहे.

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर