शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

अभिनेत्री आमरीनच्या मारेकऱ्यांना कंठस्नान, 4 दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 11:26 IST

सुरक्षा दलांकडून काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा

सुरेश डुग्गरलाेकमत न्यूज नेटवर्कजम्मू : काश्मीरमधील प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आमरीन भट्ट यांची दाेन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली हाेती. त्यांच्या मारेकऱ्यांना ४८ तासांमध्ये सुरक्षादलांनी यमसदनी धाडले आहे. सुरक्षादलांनी मुश्ताक भट्ट आणि फरहान हबीब अशी ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. लष्कर-ए-ताेयबाचा कमांडर लतीफ याच्या इशाऱ्यावरून आमरीन यांची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. 

गेल्या २४ तासांमध्ये सुरक्षादलांनी वेगवेगळ्या चकमकींमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. चाैघेही ‘लष्कर’चे सदस्य हाेते. काश्मीरचे पाेलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी यासंदर्भात सांगितले, की बडगाममधील चाडुरा भागात मुश्ताक आणि फरहान हे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली हाेती. त्यांना आत्मसमर्पणाची पूर्ण संधी देण्यात आली हाेती. दोघांनी आमरीन यांच्यावर त्यांच्या घरासमोरच गोळीबार केला होता. तर, साैरा भागातही चकमकीत आणखी दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. 

गेल्या पाच महिन्यांत १५ जवान शहीदगेल्या जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांत १५ नागरिकांचा मृत्यू झाला, तर सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकींमध्ये १५ जवान शहीद झाले आहेत. येत्या ३० जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यात सहभागी होणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी या मार्गावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. काश्मिरी पंडित राहुल भट्ट, अभिनेत्री अमरीन भट्ट यांच्या हत्येमुळे हे स्पष्ट झाले की, दहशतवादी काश्मिरी पंडित व नामवंत लोकांना लक्ष्य करत आहेत.

यंदाच्या वर्षी ८८ दहशतवाद्यांचा खात्माकाश्मीरमध्ये यंदाच्या वर्षी सुरक्षा जवानांनी ८८ दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामध्ये ३० विदेशी दहशतवाद्यांचा समावेश आहे. काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी रद्द केले. तेव्हापासून आजवर ५५० दहशतवाद्यांना सुरक्षा जवानांनी कंठस्नान घातले आहे. या व्यापक कारवाईमुळे दहशतवाद्यांनी आपल्या व्यूहनीतीत बदल केला. घातपाती कारवाया घडविण्यासाठी ते काश्मीरमधील स्थानिक युवकांचा वापर अधिक प्रमाणात करू लागले.

तीन दिवसांत दहा दहशतवादी ठारदाेघांनी नुकताच ‘लष्कर’मध्ये प्रवेश केला हाेता. त्यांच्याकडून एके-५६ रायफल, चार मॅगझीन आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये दहा दहशतवाद्यांना ठार मारले आहे.

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर