शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आचार्य सत्येंद्र दास यांना शरयू नदीत 'जल समाधी', संतांवर अंत्यसंस्कार का होत नाहीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 19:40 IST

Ayodhya Priest Satyendra Das : श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांचे बुधवारी वयाच्या 85व्या वर्षी निधन झाले.

Ayodhya Priest Satyendra Das : अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांचे बुधवारी निधन झाले. गुरुवारी सायंकाळी महंत सत्येंद्र दास यांना शरयू नदीच्या तुळशीदास घाटावर जलसमाधी देण्यात आली. यापूर्वी त्यांचे पार्थिव रथावर बसवून शहरभर फिरवण्यात आले. दरम्यान, संतांना जलसमाधी का दिली जाते, त्यांच्यावर अंत्यसंस्कार का केले जात नाहीत? असे प्रश्न अनेकांना पडले असतील.

जलसमाधी म्हणजे काय?सनातन धर्मात अंतिम संस्कारासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. यापैकी एक म्हणजे संताचे पार्थिव अंत्यविधी न करता नदीत फेकले जाते. याला जलसमाधी म्हणतात. जलसमाधी देताना मृतदेहाला जड दगड बांधले जातात. त्यानंतर मृतदेह नदीत सोडला जातो. याशिवाय संतांना भू-समाधीही दिली जाते. यामध्ये मृत शरीराला पद्मासन किंवा सिद्धीसनाच्या मुद्रेत बसवून जमिनीत गाडले जाते.

जलसमाधी का दिली जाते?भारतीय संस्कृती आणि सनातन धर्मात प्राचीन काळापासून संतांना जलसमाधी देण्याची परंपरा आहे. पाणी हे पवित्र तत्व असून त्यात समाधी केल्याने मोक्ष प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे. असे मानले जाते की मानवी शरीर पृथ्वी, पाणी, अग्नि, वायू आणि आकाश या पाच घटकांनी बनलेले आहे. संतांचे मृतदेह पाण्यात विसर्जित केले जातात जेणेकरून ते त्याच्या मूळ घटकाकडे परत येतील. 

आचार्य सत्येंद्र दास कोण होते?सत्येंद्र दास हे अयोध्याराम मंदिराचे मुख्य पुजारी होते. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला. निर्वाणी आखाड्यातून आलेल्या अयोध्येतील प्रमुख संतांपैकी ते एक होते. 3 फेब्रुवारीला त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. त्यानंतर त्यांना संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGI) मध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी वयाच्या 85 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर