शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

१० मिनिटांपर्यंत ट्रेनमध्ये न पोहोचल्यास तिकिट रद्द होणार का? जाणून घ्या यामागील सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 18:10 IST

Indian Railway : रेल्वेने केलेल्या प्रत्येक बदलाचा सामान्यांवर मोठा परिणाम होत असतो.

Railway New Rules | नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोच्या घरात आहे. भारतीय रेल्वे नवनवीन उपक्रम, नवनवीन बदल करून प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी प्रयत्नशील असते. रेल्वेने केलेल्या प्रत्येक बदलाचा सामान्यांवर मोठा परिणाम होत असतो. दरम्यान, सोशल मीडिया आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, जर एखादा प्रवासी रेल्वेच्या नियोजित वेळेच्या १० मिनिटांपर्यंत आपल्या सीटवर पोहोचला नाही तर त्याचे तिकिट रद्द केले जाऊ शकते. 

अनेकदा उशीर झाल्यामुळे प्रवासी त्यांच्या मूळ स्टेशनऐवजी पुढील स्टेशनवर जाऊन ट्रेन पकडतात. पण, या नवीन नियमानंतर ते ट्रेनमध्ये चढू शकणार नाहीत, असे सांगितले जात आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, रेल्वेने नवा नियम बनवला आहे. त्यानुसार, ट्रेन सुरू झाल्यानंतर १० मिनिटांत प्रवासी सीटवर पोहोचला नाही, तर संबंधित प्रवाशाचे तिकीट रद्द केले जाईल.

१० मिनिटे उशीर झाल्यास तिकीट रद्द होणार?भारतीय रेल्वेमध्ये चेंकिंग स्टाफ हॅन्ड हेल्ड टर्मिनलच्या माध्यमातून तिकीट चेकिंग केले जाते. यात प्रवासी आला आहे किंवा नाही याची माहिती द्यावी लागते. यापूर्वी हे काम कागदांवर चालायचे. यात टीटीई पुढील स्टेशनपर्यंत वाट पाहत होता. अशा परिस्थितीत जर कोणी १० मिनिटांपर्यंत त्याच्या सीटवर आला नाही तर त्याचे तिकीट रद्द केले जाईल. पण, लक्षणीय बाब म्हणजे अद्याप रेल्वेने याबाबत कोणताही आदेश जारी केला नाही. या आदेशाबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, असा कोणताही आदेश रेल्वेकडून जारी करण्यात आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रेल्वेच्या म्हणण्यानुसार सध्याच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेpassengerप्रवासी