शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

१० मिनिटांपर्यंत ट्रेनमध्ये न पोहोचल्यास तिकिट रद्द होणार का? जाणून घ्या यामागील सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 18:10 IST

Indian Railway : रेल्वेने केलेल्या प्रत्येक बदलाचा सामान्यांवर मोठा परिणाम होत असतो.

Railway New Rules | नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोच्या घरात आहे. भारतीय रेल्वे नवनवीन उपक्रम, नवनवीन बदल करून प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी प्रयत्नशील असते. रेल्वेने केलेल्या प्रत्येक बदलाचा सामान्यांवर मोठा परिणाम होत असतो. दरम्यान, सोशल मीडिया आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, जर एखादा प्रवासी रेल्वेच्या नियोजित वेळेच्या १० मिनिटांपर्यंत आपल्या सीटवर पोहोचला नाही तर त्याचे तिकिट रद्द केले जाऊ शकते. 

अनेकदा उशीर झाल्यामुळे प्रवासी त्यांच्या मूळ स्टेशनऐवजी पुढील स्टेशनवर जाऊन ट्रेन पकडतात. पण, या नवीन नियमानंतर ते ट्रेनमध्ये चढू शकणार नाहीत, असे सांगितले जात आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, रेल्वेने नवा नियम बनवला आहे. त्यानुसार, ट्रेन सुरू झाल्यानंतर १० मिनिटांत प्रवासी सीटवर पोहोचला नाही, तर संबंधित प्रवाशाचे तिकीट रद्द केले जाईल.

१० मिनिटे उशीर झाल्यास तिकीट रद्द होणार?भारतीय रेल्वेमध्ये चेंकिंग स्टाफ हॅन्ड हेल्ड टर्मिनलच्या माध्यमातून तिकीट चेकिंग केले जाते. यात प्रवासी आला आहे किंवा नाही याची माहिती द्यावी लागते. यापूर्वी हे काम कागदांवर चालायचे. यात टीटीई पुढील स्टेशनपर्यंत वाट पाहत होता. अशा परिस्थितीत जर कोणी १० मिनिटांपर्यंत त्याच्या सीटवर आला नाही तर त्याचे तिकीट रद्द केले जाईल. पण, लक्षणीय बाब म्हणजे अद्याप रेल्वेने याबाबत कोणताही आदेश जारी केला नाही. या आदेशाबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, असा कोणताही आदेश रेल्वेकडून जारी करण्यात आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रेल्वेच्या म्हणण्यानुसार सध्याच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेpassengerप्रवासी