शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अपघातामागे घातपात की निष्काळजीपणा? ‘कोरोमंडल’प्रकरणी सीबीआयचा तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 05:57 IST

रेल्वे अपघातात मदतकार्यासाठी पुढे आलेल्या एनडीआरएफच्या जवानांना या घटनेचा मोठा धक्का बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी कथित गुन्हेगारी स्वरूपाच्या निष्काळजीपणाबाबत सीबीआयने मंगळवारी गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू केला. या अपघातात २७८ जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक चौकशीत इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये छेडछाड झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने केंद्रीय तपास एजन्सीकडे तपास सोपविण्याचे ठरविले. या अपघातामागे घातपात, तोडफोड झाल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे.

फॉरेन्सिक तज्ज्ञांसह सीबीआय अधिकाऱ्यांचे पथक सोमवारी बालासोर जिल्ह्यात पोहोचले. त्यानंतर मंगळवारी त्यांनी दुपारी २.१५ वाजता गुन्हा दाखल केला. ओडिशातील तिहेरी रेल्वे अपघात झाल्यानंतर सीबीआयने गुन्हा नोंदविल्याचे त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले. ओडिशा सरकारने सोमवारीच पत्राद्वारे सीबीआयला तपास करण्यास संमती दिली. रेल्वे पोलिसांनी ३ जून रोजी नोंदविलेल्या गुन्ह्याची कॉपी सीबीआयने ताब्यात घेतली आहे. 

रेल्वे अपघातातील १०० हून अधिक मृतदेहाची ओळख पटलेली नाही. येथील विविध हॉस्पिटलमध्ये हे मृतदेह ठेवण्यात आलेले आहेत. भुवनेश्वरमधील एम्सने डीएनए नमुने घेण्याचे काम सुरू केले आहे.

४० प्रवाशांचा विजेचा धक्का लागून मृत्यू 

कोरोमंडल एक्स्प्रेसमधून बाहेर काढलेल्या सुमारे ४० मृतदेहांवर जखमेच्या कोणत्याही खुणा नाहीत आणि त्यांचा मृत्यू विजेचा धक्का लागून झाला असावा, असे रेल्वे पोलिसांनी म्हटले आहे. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, अपघाताच्या वेळी तुटलेल्या थेट ओव्हरहेड वायर्स काही डब्यांमध्ये अडकल्या आणि त्यात अडकलेल्या प्रवाशांना विजेचा धक्का बसला.

पाणीही रक्तासारखे दिसते...जवानांना धक्का

रेल्वे अपघातात मदतकार्यासाठी पुढे आलेल्या एनडीआरएफच्या जवानांना या घटनेचा मोठा धक्का बसला आहे. या जवानांनी ४४ लोकांना वाचविले, तर १२१ मृतदेह बाहेर काढले. एका जवानाने सांगितले की, जेव्हा तो पाणी पाहतो तेव्हा त्याला रक्तासारखे वाटते. तर दुसऱ्या जवानाने सांगितले की, या घटनेनंतर त्याला भूक लागणे बंद झाले आहे. या जवानांसाठी एनडीआरएफने मनोवैज्ञानिक समुपदेशन सुरू केले आहे.

 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातIndian Railwayभारतीय रेल्वेCBIगुन्हा अन्वेषण विभागCBIसीबीआयCentral Bureau of Investigationकेंद्रीय गुन्हे अन्वेषण