शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

Accident: कारमध्ये ठेवलेली बाटली ठरली मृत्यूचे कारण, भीषण अपघातात इंजिनियरचा करुण अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 07:46 IST

Accident: एक छोटीशी चूकसुद्धा कधी कधी जीवघेणी ठरू शकते. अशीच एक घटना नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर कारमधील पाण्याच्या एका बाटलीमुळे इंजिनिअरचा मृत्यू झाला.

नवी दिल्ली - एक छोटीशी चूकसुद्धा कधी कधी जीवघेणी ठरू शकते. अशीच एक घटना नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर कारमधील पाण्याच्या एका बाटलीमुळे इंजिनिअरचा मृत्यू झाला.

दिल्लीतील राहणारे इंजिनिअर अभिषेक झा मित्रासोबत कारमधून ग्रेटर नोएडाच्या दिशेने जात होते. यादरम्यान, अभिषेक यांची कार रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या ट्रकवर जोरात जाऊन आदळली. या अपघातात अभिषेक यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा मित्र गंभीर जखमी झाला. पोलिसांनी अपघाताचे कारण हे कारमध्ये असलेली पाण्याची बाटली असल्याचे सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा अभिषेक हे कार चालवत होते. तेव्हा सीटच्या मागे ठेवलेली पाण्याची एक बाटली सरकून अभिषेक यांच्या पायाखाली आली. समोर असलेला ट्रक पाहून कारवर नियंत्रण मिळवण्यासाठी अभिषेक यांनी ब्रेक लावला. मात्र ब्रेक पेंडलच्या खाली बाटी असल्याने ब्रेक लागला नाही आणि गाडी वेगाने जाऊन ट्रकवर आदळली.

पोलिसांनी सांगितले की, हा अपघात सेक्टर १४४ जवळ झाला. ज्यामध्ये गाडी चालवत असलेल्या अभिषेक यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक झा हे ग्रेटर नोएडामधील एका कंपनीमध्ये इंजिनिअर होते. अभिषेक हे शुक्रवारी रात्री मित्रासोबत रिनॉल्ट ट्राइबर गाडीमधून नोएडा येथून ग्रेटर नोएडाकडे जाण्यासाठी निघाले होते. त्यादरम्यान, सेक्टर १४४ जवळ त्यांची वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला बंद पडलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. पाण्याची बाटली ब्रेक पैंडलखाली आल्याने हा अपघात घडला.  

टॅग्स :Accidentअपघातdelhiदिल्ली