शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

बॅरिकेडला धडकून अपघात : ७५ लाख नुकसानभरपाई देण्याचे पोलिसांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 05:40 IST

दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेणारा धीरजकुमार मोटारसायकलवरून जाताना बॅरिकेडवर धडकला. पोलिसांनी रस्ता पूर्ण बंद करण्यासाठी साखळी लावून बॅरिकेड एकमेकांत बांधले होते.

- खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली : पोलिसांनी रस्त्यावर लावलेल्या बॅरिकेडला धडकून जखमी झालेल्या दुचाकीस्वारास ७५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. बॅरिकेडवर रीफ्लेक्टर नव्हते. पोलिसांशिवाय बॅरिकेड रस्त्यावर लावून सोडले, यासाठी पोलिसांना जबाबदार धरण्यात आले आहे.दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेणारा धीरजकुमार मोटारसायकलवरून जाताना बॅरिकेडवर धडकला. पोलिसांनी रस्ता पूर्ण बंद करण्यासाठी साखळी लावून बॅरिकेड एकमेकांत बांधले होते. रात्री २ च्या सुमारास हा अपघात झाला. यानंतर त्याच्या मेंदूसह इतर ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.एक महिन्यानंतर त्याला दवाखान्यातून सुटी मिळाली त्यावेळीही तो अर्धवट बेशुद्धच होता. दरम्यान पोलिसांनी त्याच्यावर हयगयीने वाहन चालवून अपघात केल्याबद्दल गुन्हा नोंदवला. धीरजकुमारने पोलिसांविरुद्ध नुकसानभरपाई मिळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.याचिकेला विरोध करताना पोलिसांनी बॅरिकेड चांगला प्रकाश असणाऱ्या ठिकाणी लावण्यात आले होते व ते दूरवरून दिसत होते, असे सांगितले. धीरजकुमार वेगात होता. त्यामुळे त्याचा ब्रेक लागला नाही व त्याला साखळी दिसली नाही. तसेच घटनास्थळावर हेलमेट मिळून आले नाही. यावरून स्वत:च्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला आहे.धीरजकुमारतर्फे याचे खंडन करण्यात आले. न्यायालयात सादर झालेले फोटो पाहून बॅरिकेडच्या ठिकाणी चांगला प्रकाश नव्हता, तसेच बॅरिकेडला रात्री चमकणारा रंग देण्यात आला नव्हता.याशिवाय बॅरिकेड लावून सोडून दिले तेथे पोलीस नेमले नव्हते, असे निष्कर्ष काढून न्यायालयाने पोलिसांनी बॅरिकेडसंबंधी स्वत:च्याच धोरणाचे पालन केले नाही, असे स्पष्ट करून ७५ लाख रुपये ४ आठवड्यांत न्यायालयात भरण्याचे आदेश दिले.बॅरिकेड लावण्याबद्दल दिल्ली पोलिसांचे धोरण- सर्व बॅरिकेडस्ना रात्री चमकणारे फ्ल्युरोसेंट कलर किंवा ब्लिंकर लावण्यात यावे. ज्यामुळे ते दुरूनच दिसतील.- कोणत्याही परिस्थितीत जेथे पोलीस नसेल तेथे बॅरिकेड लावू नयेत.- जेव्हा उपयोगात नसतील तेव्हा ते काढून घ्यावेत.- बॅरिकेड अशा पद्धतीने लावावेत की, तपासणीसाठी वाहने थांबतील; पण त्यांना त्यातून जाताही येईल.

सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेड लावण्याचे पोलिसांना अधिकार आहेत; पण यासोबत ते चुकीच्या पद्धतीने लावून किंवा खराब बॅरिकेड लावून अपघात होणार नाहीत याची काळजी घेण्याची जबाबदारीही पोलिसांचीच आहे.- न्या. नवीन चावला, दिल्ली उच्च न्यायालय

 

 

टॅग्स :Courtन्यायालय