शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बॅरिकेडला धडकून अपघात : ७५ लाख नुकसानभरपाई देण्याचे पोलिसांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 05:40 IST

दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेणारा धीरजकुमार मोटारसायकलवरून जाताना बॅरिकेडवर धडकला. पोलिसांनी रस्ता पूर्ण बंद करण्यासाठी साखळी लावून बॅरिकेड एकमेकांत बांधले होते.

- खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली : पोलिसांनी रस्त्यावर लावलेल्या बॅरिकेडला धडकून जखमी झालेल्या दुचाकीस्वारास ७५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. बॅरिकेडवर रीफ्लेक्टर नव्हते. पोलिसांशिवाय बॅरिकेड रस्त्यावर लावून सोडले, यासाठी पोलिसांना जबाबदार धरण्यात आले आहे.दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेणारा धीरजकुमार मोटारसायकलवरून जाताना बॅरिकेडवर धडकला. पोलिसांनी रस्ता पूर्ण बंद करण्यासाठी साखळी लावून बॅरिकेड एकमेकांत बांधले होते. रात्री २ च्या सुमारास हा अपघात झाला. यानंतर त्याच्या मेंदूसह इतर ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.एक महिन्यानंतर त्याला दवाखान्यातून सुटी मिळाली त्यावेळीही तो अर्धवट बेशुद्धच होता. दरम्यान पोलिसांनी त्याच्यावर हयगयीने वाहन चालवून अपघात केल्याबद्दल गुन्हा नोंदवला. धीरजकुमारने पोलिसांविरुद्ध नुकसानभरपाई मिळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.याचिकेला विरोध करताना पोलिसांनी बॅरिकेड चांगला प्रकाश असणाऱ्या ठिकाणी लावण्यात आले होते व ते दूरवरून दिसत होते, असे सांगितले. धीरजकुमार वेगात होता. त्यामुळे त्याचा ब्रेक लागला नाही व त्याला साखळी दिसली नाही. तसेच घटनास्थळावर हेलमेट मिळून आले नाही. यावरून स्वत:च्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला आहे.धीरजकुमारतर्फे याचे खंडन करण्यात आले. न्यायालयात सादर झालेले फोटो पाहून बॅरिकेडच्या ठिकाणी चांगला प्रकाश नव्हता, तसेच बॅरिकेडला रात्री चमकणारा रंग देण्यात आला नव्हता.याशिवाय बॅरिकेड लावून सोडून दिले तेथे पोलीस नेमले नव्हते, असे निष्कर्ष काढून न्यायालयाने पोलिसांनी बॅरिकेडसंबंधी स्वत:च्याच धोरणाचे पालन केले नाही, असे स्पष्ट करून ७५ लाख रुपये ४ आठवड्यांत न्यायालयात भरण्याचे आदेश दिले.बॅरिकेड लावण्याबद्दल दिल्ली पोलिसांचे धोरण- सर्व बॅरिकेडस्ना रात्री चमकणारे फ्ल्युरोसेंट कलर किंवा ब्लिंकर लावण्यात यावे. ज्यामुळे ते दुरूनच दिसतील.- कोणत्याही परिस्थितीत जेथे पोलीस नसेल तेथे बॅरिकेड लावू नयेत.- जेव्हा उपयोगात नसतील तेव्हा ते काढून घ्यावेत.- बॅरिकेड अशा पद्धतीने लावावेत की, तपासणीसाठी वाहने थांबतील; पण त्यांना त्यातून जाताही येईल.

सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेड लावण्याचे पोलिसांना अधिकार आहेत; पण यासोबत ते चुकीच्या पद्धतीने लावून किंवा खराब बॅरिकेड लावून अपघात होणार नाहीत याची काळजी घेण्याची जबाबदारीही पोलिसांचीच आहे.- न्या. नवीन चावला, दिल्ली उच्च न्यायालय

 

 

टॅग्स :Courtन्यायालय