शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

प्राध्यापकाच्या छळाला कंटाळून विद्यार्थिनीने घेतलं पेटवून; पोलिसांकडून एबीव्हीपी नेत्यासह दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 12:42 IST

ओडिशातील विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात एबीव्हीपीच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे.

Balasore College Harassment Case: ओडिशातील पुरी जिल्ह्यात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. दोन आठवडे जीवन आणि मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात मुलीचा मृत्यू झाला. दुसरीकडे, बालासोरमधील महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात ओडिशा पोलिसांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राज्य सहसचिवासह दोघांना अटक केली. एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्धच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवर संस्थेने निष्क्रियता दाखविल्यामुळे २० वर्षीय विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली होती.

जुलैच्या सुरुवातीला फकीर मोहन ऑटोनॉमस कॉलेजमधल्या प्राचार्यांच्या ऑफिसबाहेर दुसऱ्या वर्षाच्या बी एडच्या विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेतले होते. त्यावेळी एबीव्हीपी नेते सुभट संदीप नायक आणि ज्योती प्रकाश बिस्वाल तिथे उपस्थित होते, असे पोलिसांनी सांगितले. ९० टक्के भाजलेल्या या विद्यार्थिनीचा घटनेच्या दोन दिवसांनी १५ जुलै रोजी मृत्यू झाला होता, ज्यामुळे ओडिशामध्ये संतापाची लाट उसळली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागप्रमुख समीर रंजन साहू यांच्याविरुद्ध वारंवार तक्रारी केल्यानंतरही प्राचार्य दिलीप घोष यांच्यासह महाविद्यालय प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. साहू सतत लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न करत होते. तसेच समीर साहू नापास करण्याची धमकी देऊन मानसिक छळ करायचा असा आरोप विद्यार्थिनीचा होता. पीडितेने तिच्या सहकाऱ्यांना विभागप्रमुखांविरुद्ध गंभीर कारवाईची मागणी करण्यासाठी एकत्र केले होते. मात्र कारवाई न झाल्याने तिने टोकाचं पाऊलउचललं

विद्यार्थिनीने स्वतःवर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. तिला वाचवण्यासाठी तिच्या सहकाऱ्यांनी धाव घेतली मात्र तोपर्यंत तिच्या शरीराचा ९०% पेक्षा जास्त भाग भाजला होता. तिला सुरुवातीला बालासोर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला एम्स भुवनेश्वरमध्ये हलवण्यात आले. उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

पोलिसांच्या तपासात, महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रार दाखल न झाल्यामुळे, प्राचार्यांसोबत झालेल्या भेटीनंतर लगेचच महिलेने आत्महत्या केली. या भेटी दरम्यान तिला तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला गेला असाही आरोप करण्यात आला. जर आरोप मागे घेतले नाहीत तर तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले जाईल असे मुख्याध्यापकांनी तिला सांगितले होते, असं कुटुंबियांनी म्हटलं. विभागप्रमुख साहू यांनी  प्रशासनावर तिच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी दबाव आणण्यासाठी पीडितेविरुद्ध विद्यार्थ्यांच्या एका गटाला एकत्र केले होते.

दरम्यान, या प्रकरणात प्राचार्य आणि विभागप्रमुख दोघांनाही यापूर्वीच अटक करण्यात आली होती आणि त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात आले. त्यानंतर आता एबीव्हीपीच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :OdishaओदिशाCrime Newsगुन्हेगारी