शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

प्राध्यापकाच्या छळाला कंटाळून विद्यार्थिनीने घेतलं पेटवून; पोलिसांकडून एबीव्हीपी नेत्यासह दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 12:42 IST

ओडिशातील विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात एबीव्हीपीच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे.

Balasore College Harassment Case: ओडिशातील पुरी जिल्ह्यात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. दोन आठवडे जीवन आणि मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात मुलीचा मृत्यू झाला. दुसरीकडे, बालासोरमधील महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात ओडिशा पोलिसांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राज्य सहसचिवासह दोघांना अटक केली. एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्धच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवर संस्थेने निष्क्रियता दाखविल्यामुळे २० वर्षीय विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली होती.

जुलैच्या सुरुवातीला फकीर मोहन ऑटोनॉमस कॉलेजमधल्या प्राचार्यांच्या ऑफिसबाहेर दुसऱ्या वर्षाच्या बी एडच्या विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेतले होते. त्यावेळी एबीव्हीपी नेते सुभट संदीप नायक आणि ज्योती प्रकाश बिस्वाल तिथे उपस्थित होते, असे पोलिसांनी सांगितले. ९० टक्के भाजलेल्या या विद्यार्थिनीचा घटनेच्या दोन दिवसांनी १५ जुलै रोजी मृत्यू झाला होता, ज्यामुळे ओडिशामध्ये संतापाची लाट उसळली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागप्रमुख समीर रंजन साहू यांच्याविरुद्ध वारंवार तक्रारी केल्यानंतरही प्राचार्य दिलीप घोष यांच्यासह महाविद्यालय प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. साहू सतत लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न करत होते. तसेच समीर साहू नापास करण्याची धमकी देऊन मानसिक छळ करायचा असा आरोप विद्यार्थिनीचा होता. पीडितेने तिच्या सहकाऱ्यांना विभागप्रमुखांविरुद्ध गंभीर कारवाईची मागणी करण्यासाठी एकत्र केले होते. मात्र कारवाई न झाल्याने तिने टोकाचं पाऊलउचललं

विद्यार्थिनीने स्वतःवर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. तिला वाचवण्यासाठी तिच्या सहकाऱ्यांनी धाव घेतली मात्र तोपर्यंत तिच्या शरीराचा ९०% पेक्षा जास्त भाग भाजला होता. तिला सुरुवातीला बालासोर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला एम्स भुवनेश्वरमध्ये हलवण्यात आले. उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

पोलिसांच्या तपासात, महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रार दाखल न झाल्यामुळे, प्राचार्यांसोबत झालेल्या भेटीनंतर लगेचच महिलेने आत्महत्या केली. या भेटी दरम्यान तिला तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला गेला असाही आरोप करण्यात आला. जर आरोप मागे घेतले नाहीत तर तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले जाईल असे मुख्याध्यापकांनी तिला सांगितले होते, असं कुटुंबियांनी म्हटलं. विभागप्रमुख साहू यांनी  प्रशासनावर तिच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी दबाव आणण्यासाठी पीडितेविरुद्ध विद्यार्थ्यांच्या एका गटाला एकत्र केले होते.

दरम्यान, या प्रकरणात प्राचार्य आणि विभागप्रमुख दोघांनाही यापूर्वीच अटक करण्यात आली होती आणि त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात आले. त्यानंतर आता एबीव्हीपीच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :OdishaओदिशाCrime Newsगुन्हेगारी