शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

Delhi Election 2020 : "मोदी, शहांच्या सभांचा भाजपाला फायदा होणार; पण सत्तेचा वनवास कायम राहणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 20:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे चाणक्य समजले जाणाऱ्या अमित शाहांनी दिल्लीच्या निवडणुकीच्या प्रचारात उडी घेतल्यानं चांगलीच रंगत आली आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे चाणक्य समजले जाणाऱ्या अमित शाहांनी दिल्लीच्या निवडणुकीच्या प्रचारात उडी घेतल्यानं चांगलीच रंगत आली आहे. भाजपाच्या या दोन नेत्यांनी दिल्लीच्या राजकारणाच्या हवेची दिशाच बदलली आहे. एबीपी न्यूज आणि सी व्होटरनं केलेल्या सर्व्हेनुसार, 61 टक्के लोकांना वाटतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीचा भाजपाला फायदा होणार आहे. परंतु निवडणुकीत आम आदमी पार्टी 42 ते 56 जागा जिंकू शकते, तर भाजपाला 10 ते 24 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. दिल्लीतला सत्तेचा वनवास भाजपाला काही संपुष्टात आणता येणार नाही. एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार 62 टक्के लोकांनी शाहीन बागेत धरणे आंदोलन करणं चुकीचं असल्याचं नमूद केलं आहे. तर 83 टक्के लोकांच्या मते, शाहीन बागेतील आंदोलन हा राजकारणाचा एक भाग झाला आहे. तसेच 39 टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार शाहीन बागेतल्या मुद्द्याचा भाजपाला फायदा होईल, तर 25 टक्के लोकांच्या मते, आम आदमी पार्टीला हे आंदोलन फायदेशीर ठरणार आहे. फक्त चार टक्के लोकांना या मुद्द्यावरून काँग्रेसला फायदा होत असल्याचं वाटत असल्याचं समोर आलं आहे.सर्व्हेमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या निवडणूक रॅलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. या रॅलींचा भाजपाला फायदा होऊ शकतो हे 53 टक्के लोकांना वाटतं, तर 29 टक्के लोकांना याचा फायदा होणार नाही, असं वाटत आहे. 11 टक्के लोकांना हे सर्व काही कठीण असल्याचं वाटत आहे.केजरीवालांवर वैयक्तिक हल्ल्यानं भाजपाला फायदा होणार नसल्याचं 48 टक्के लोकांना वाटत आहे. 72 टक्के लोक केजरीवालांना बाहेरचा समजत नाही, तर 21 टक्के लोकांना केजरीवाल बाहेरचे वाटतात. केजरीवालांवर वैयक्तिक हल्ला केल्यानं 24 टक्के लोकांना वाटतं भाजपाला काहीही नुकसान होणार नाही. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी