शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

लढायचे सोडून, म्यानमारचे 151 सैनिक भारतात पळून आले; आसाम रायफल्सच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 08:45 IST

आसाम रायफल्सच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. एका सशस्त्र जातीय गटाने सैन्याच्या तळांवर हल्ले केले आहेत.

भारताचा आणखी एक शेजारी देश म्यानमार अस्थिरतेच्या फेऱ्यातून जात आहे. गृहयुद्धामुळे तेथील परिस्थित चिघळली आहे. काही महिन्यांपूर्वी म्यानमारच्या सीमेलगतच्या हजारो नागरिकांनी भारतात येत शरण घेतली होती. आता सैन्यही पळून येऊ लागले आहे. म्यानमारचे जवळपास १५१ सैनिक भारतात पळून आले आहेत. 

आसाम रायफल्सच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. एका सशस्त्र जातीय गटाने सैन्याच्या तळांवर हल्ले केले आहेत. हे सैन्य तळ या गटाने ताब्यात घेतले आहेत. यामुळे तेथील जवळपास १५१ सैनिक पळून मिझोरमच्या लॉन्गतलाई जिल्ह्यात आले आहेत. तातमादाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या म्यानमारच्या सैनिकांनी भारतात शरण घेतली आहे. शस्त्रास्त्रे घेऊन ते भारतात दाखल झाले.

आराकान आर्मीच्या सशस्त्र गटाने त्यांच्या तळावर ताबा मिळविला आहे. गेल्या काही दिवसांपासून म्यानमार आर्मी आणि अरकान आर्मीच्या सैन्यामध्ये जोरदार गोळीबार होत आहे. शुक्रवारी मिझोराममध्ये घुसलेले म्यानमार आर्मीचे काही सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. आसाम रायफल्सने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले आहेत. 

हे सर्व म्यानमार लष्कराचे सैनिक आता म्यानमार सीमेजवळील लोंगतलाई जिल्ह्यातील पर्व येथे आसाम रायफल्सच्या सुरक्षित ठिकाणी आहेत. या सैनिकांना पुन्हा म्यानमारला पाठविण्यात येणार आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि म्यानमारच्या लष्करामध्ये याबाबत चर्चा सुरु आहे, असे आसाम रायफल्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नोव्हेंबरमध्ये देखील म्यानमार-भारत सीमेवरील लष्करी छावण्या लोकशाही समर्थक मिलिशिया - पीपल्स डिफेन्स फोर्स (पीडीएफ) ने ताब्यात घेतल्यावर एकूण 104 म्यानमार सैनिक मिझोरामला पळून आले होते. 

टॅग्स :Myanmarम्यानमार