शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

लढायचे सोडून, म्यानमारचे 151 सैनिक भारतात पळून आले; आसाम रायफल्सच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 08:45 IST

आसाम रायफल्सच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. एका सशस्त्र जातीय गटाने सैन्याच्या तळांवर हल्ले केले आहेत.

भारताचा आणखी एक शेजारी देश म्यानमार अस्थिरतेच्या फेऱ्यातून जात आहे. गृहयुद्धामुळे तेथील परिस्थित चिघळली आहे. काही महिन्यांपूर्वी म्यानमारच्या सीमेलगतच्या हजारो नागरिकांनी भारतात येत शरण घेतली होती. आता सैन्यही पळून येऊ लागले आहे. म्यानमारचे जवळपास १५१ सैनिक भारतात पळून आले आहेत. 

आसाम रायफल्सच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. एका सशस्त्र जातीय गटाने सैन्याच्या तळांवर हल्ले केले आहेत. हे सैन्य तळ या गटाने ताब्यात घेतले आहेत. यामुळे तेथील जवळपास १५१ सैनिक पळून मिझोरमच्या लॉन्गतलाई जिल्ह्यात आले आहेत. तातमादाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या म्यानमारच्या सैनिकांनी भारतात शरण घेतली आहे. शस्त्रास्त्रे घेऊन ते भारतात दाखल झाले.

आराकान आर्मीच्या सशस्त्र गटाने त्यांच्या तळावर ताबा मिळविला आहे. गेल्या काही दिवसांपासून म्यानमार आर्मी आणि अरकान आर्मीच्या सैन्यामध्ये जोरदार गोळीबार होत आहे. शुक्रवारी मिझोराममध्ये घुसलेले म्यानमार आर्मीचे काही सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. आसाम रायफल्सने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले आहेत. 

हे सर्व म्यानमार लष्कराचे सैनिक आता म्यानमार सीमेजवळील लोंगतलाई जिल्ह्यातील पर्व येथे आसाम रायफल्सच्या सुरक्षित ठिकाणी आहेत. या सैनिकांना पुन्हा म्यानमारला पाठविण्यात येणार आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि म्यानमारच्या लष्करामध्ये याबाबत चर्चा सुरु आहे, असे आसाम रायफल्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नोव्हेंबरमध्ये देखील म्यानमार-भारत सीमेवरील लष्करी छावण्या लोकशाही समर्थक मिलिशिया - पीपल्स डिफेन्स फोर्स (पीडीएफ) ने ताब्यात घेतल्यावर एकूण 104 म्यानमार सैनिक मिझोरामला पळून आले होते. 

टॅग्स :Myanmarम्यानमार