शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

आरेतील वृक्षतोडीवरच्या निर्णयासारखा न्याय आम्हाला का नाही? - मेहबुबा मुफ्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 18:07 IST

मेहबुबा मुफ्ती यांनी आरेमधील वृक्षतोडीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देमेहबुबा मुफ्ती यांनी आरेमधील वृक्षतोडीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आरेतील वृक्षतोडीवरच्या निर्णयासारखा न्याय आम्हाला का नाही? असं म्हटलं आहे.   मुंबईमधील आरे कॉलीनीमधील झाडांचा विषय हा काश्मीरमधील लोकांच्या आयुष्यापेक्षा अधिक महत्वाचा आहे असा टोला लगावला आहे.

नवी दिल्ली - आरेमधील वृक्षतोडीविरोधात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. आरेमधील वृक्षतोडीविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आरेमधील वृक्षतोडीला तूर्तास स्थगिती दिली आहे. याप्रकरणी जोपर्यंत पर्यावरणविषयक खंडपीठाचा निर्णय येत नाही तोपर्यंत आरेमधील परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी आरेमधील वृक्षतोडीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आरेतील वृक्षतोडीवरच्या निर्णयासारखा न्याय आम्हाला का नाही? असं म्हटलं आहे.   

मुंबईमधील आरे कॉलीनीमधील झाडांचा विषय हा काश्मीरमधील लोकांच्या आयुष्यापेक्षा अधिक महत्वाचा आहे असा टोला मेहबुबा मुफ्ती यांनी लगावला आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी सोमवारी (7 ऑक्टोबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून Aarey trees > Kashmiri lives असं ट्वीट केलं आहे. आरेतील झाडे ही काश्मीरमधील लोकांच्या आयुष्यापेक्षा अधिक महत्वाचं असल्याचं त्यामध्ये म्हटलं आहे.

'आरेमधील वृक्षतोड थांबवण्यात पर्यावरणप्रेमींना यश आल्याबद्दल आनंद आहे. मात्र व्यक्ती स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य यासारखे मुलभूत अधिकारही काश्मिरी लोकांना का नाकारले जात आहेत हे समजत नाही. सध्या काश्मिरींना इतर भारतीयांप्रमाणे हक्क दिले जात असल्याचे सरकार सांगत आहे पण सत्य परिस्थिती वेगळी आहे. येथील काश्मिरी लोकांचे मुलभूत अधिकारही काढून घेण्यात आले आहेत' असं ट्वीट मेहबुबा मुफ्ती यांनी केलं आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी वृक्षतोडीचा निषेध नोंदविला होता. तसेच मेहबुबा मुफ्ती यांनीही आंदोलकांचे समर्थन करताना वृक्षतोडीविरोधात आवाज उठविण्याचे आवाहन केले होते. 

मेहबुबा मुफ्ती यांनी याआधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर काश्मीर दौऱ्यावरून निशाणा साधला होता. जम्मू-काश्मीरमधील विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविल्यानंतर अजित डोवाल काश्मीर खोऱ्यात दाखल झाले. यामुळे मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटरच्या माध्यमातून अजित डोवाल यांना लक्ष्य केले होत. गेल्या दौऱ्यावेळी फोटो सेशन दरम्यान लंचमध्ये बिर्याणी होती. यावेळी हलीम आहे का? असा सवाल मेहबुबा मुफ्ती यांनी केला होता. 

 

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीJammu Kashmirजम्मू-काश्मीरAarey Coloneyआरे