शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

‘आप’ने गमावली एक कोटीची अनामत

By admin | Updated: May 26, 2014 03:14 IST

केवळ १० हजार रुपये भरून जामीन घेण्यास नकार देणार्‍या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला त्यापेक्षा हजारपट रकमेला लोकसभा निवडणुकीच्या निकालाने मुकावे लागणार आहे.

नवी दिल्ली : केवळ १० हजार रुपये भरून जामीन घेण्यास नकार देणार्‍या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला त्यापेक्षा हजारपट रकमेला लोकसभा निवडणुकीच्या निकालाने मुकावे लागणार आहे. ‘आप’ने देशभरात लोकसभेच्या ५४३ पैकी ४३२ जागा लढविल्या आणि ४१४ जागांवर त्यांच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. या जप्त झालेल्या अनामत रकमेपोटी ‘आप’ला आता एक कोटी रुपये गमवावे लागणार आहेत. ‘आप’च्या फक्त १८ उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचविता आली. त्यात पंजाबमधील ८, दिल्लीतील ७ आणि चंदिगढ, महाराष्टÑ (चंद्रपूर) आणि उत्तर प्रदेश (वाराणशी)मधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. ४१४ जागांवर ‘आप’ उमेदवारांना एकूण मतांच्या एक षष्ठांश मते मिळविण्यात अपयश आले. मतदारसंघात झालेल्या मतदानापैकी किमान एक षष्ठांश मते मिळविणार्‍या उमेदवारांचीच अनामत रक्कम जप्त होत नाही. ज्यांना इतकी मते मिळत नाहीत, त्यांची अनामत रक्कम जप्त होऊन सरकारी कोषागारात जाते. लोकसभा निवडणूक लढविणार्‍या उमेदवाराला लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम ३४ (१) (अ) अन्वये २५ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते. अनुसूचित जाती, जमाती व भटक्या जमातींच्या उमेदवारांसाठी ही अनामत रक्कम १२,५०० रुपये ठेवण्यात आली आहे. एकूण वैध मतांच्या एक षष्ठांश मते मिळविण्यात अपयश आल्यास ही ‘आप’च्या राखीव मतदारसंघातील उमेदवारांची संख्या उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे सर्व उमेदवारांनी २५ हजार रुपये भरल्याचे गृहीत धरून हा १ कोटी ३ लाख ५० हजारांचा आकडा काढण्यात आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)