शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"भाजपाचा अयोध्येत पराभव झाल्याने मोदी आता जय श्रीराम म्हणत नाहीत, हिंदू धर्माला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 10:06 IST

AAP Sanjay Singh And Narendra Modi : संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला.

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. "भाजपा हा हिंसक विचारधारा असलेला पक्ष आहे. जिथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंसक विचारधारेला चालना देण्याचं काम करतात. भाजपाचा अयोध्येत पराभव झाला, त्यामुळे आता त्यांनी जय श्रीराम म्हणणं बंद केलं आहे" असं म्हणत संजय सिंह यांनी निशाणा साधला आहे. 

TV9 च्या रिपोर्टनुसार, आप खासदार म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि भाजपा हिंदू धर्म आणि हिंदू समाजाला बदनाम करण्याचं काम करत आहेत. देशाचे पंतप्रधान मुजरा असा शब्द वापरतात. याशिवाय मुघल, मदरसा, मुस्लिम, घुसखोर असे शब्द उघडपण वापरून देशात द्वेष पसरवतात. मला विचारायचं आहे की, हिंदू धर्म म्हणतो धर्माचा विजय झाला पाहिजे, अधर्माचा नाश झाला पाहिजे, सजीवांमध्ये सद्भावना आणि जगाचे कल्याण व्हावे, असे हिंदू धर्म सांगतो. पण भारताचे पंतप्रधान सजीवांमध्ये चुकीची भावना निर्माण करत आहेत.

आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह म्हणाले की, "भाजपा आणि पंतप्रधान मोदी यातून अजून शिकलेले नाहीत. त्यामुळे अयोध्या, सुलतानपूर, प्रतापगड, प्रयागराज, श्रावस्ती, कौशांबी, चित्रकूट, रामपूर, सीतापूर आणि नाशिक लोकसभा जागा गमावल्या. भारतातील प्रत्येक ठिकाण धर्माशी संबंधित आहे. तसेच, जे ठिकाण रामाचं आहे तिथून भगवान श्रीरामांनी भाजपाचा निर्धार ओळखून त्यांचा पराभव केला."

संजय सिंह यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला. मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, दलित, मागासवर्गीय, शेतकरी, पैलवानांना शिवीगाळ करतात. आता भाजपाचे नेते अयोध्येतील जनतेला शिव्या देत आहेत.  पंतप्रधान मोदी जय श्रीराम म्हणत नाहीत. आता ते जय जगन्नाथ म्हणत आहेत. आता या लोकांनी जय श्रीराम म्हणणंही बंद केलं आहे, हे असे स्वार्थी लोक आहेत. तेव्हा अयोध्येने त्यांचा पराभव केला असल्याचं देखील संजय यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAAPआपBJPभाजपाAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर