शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"भाजपाचा अयोध्येत पराभव झाल्याने मोदी आता जय श्रीराम म्हणत नाहीत, हिंदू धर्माला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 10:06 IST

AAP Sanjay Singh And Narendra Modi : संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला.

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. "भाजपा हा हिंसक विचारधारा असलेला पक्ष आहे. जिथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंसक विचारधारेला चालना देण्याचं काम करतात. भाजपाचा अयोध्येत पराभव झाला, त्यामुळे आता त्यांनी जय श्रीराम म्हणणं बंद केलं आहे" असं म्हणत संजय सिंह यांनी निशाणा साधला आहे. 

TV9 च्या रिपोर्टनुसार, आप खासदार म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि भाजपा हिंदू धर्म आणि हिंदू समाजाला बदनाम करण्याचं काम करत आहेत. देशाचे पंतप्रधान मुजरा असा शब्द वापरतात. याशिवाय मुघल, मदरसा, मुस्लिम, घुसखोर असे शब्द उघडपण वापरून देशात द्वेष पसरवतात. मला विचारायचं आहे की, हिंदू धर्म म्हणतो धर्माचा विजय झाला पाहिजे, अधर्माचा नाश झाला पाहिजे, सजीवांमध्ये सद्भावना आणि जगाचे कल्याण व्हावे, असे हिंदू धर्म सांगतो. पण भारताचे पंतप्रधान सजीवांमध्ये चुकीची भावना निर्माण करत आहेत.

आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह म्हणाले की, "भाजपा आणि पंतप्रधान मोदी यातून अजून शिकलेले नाहीत. त्यामुळे अयोध्या, सुलतानपूर, प्रतापगड, प्रयागराज, श्रावस्ती, कौशांबी, चित्रकूट, रामपूर, सीतापूर आणि नाशिक लोकसभा जागा गमावल्या. भारतातील प्रत्येक ठिकाण धर्माशी संबंधित आहे. तसेच, जे ठिकाण रामाचं आहे तिथून भगवान श्रीरामांनी भाजपाचा निर्धार ओळखून त्यांचा पराभव केला."

संजय सिंह यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला. मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, दलित, मागासवर्गीय, शेतकरी, पैलवानांना शिवीगाळ करतात. आता भाजपाचे नेते अयोध्येतील जनतेला शिव्या देत आहेत.  पंतप्रधान मोदी जय श्रीराम म्हणत नाहीत. आता ते जय जगन्नाथ म्हणत आहेत. आता या लोकांनी जय श्रीराम म्हणणंही बंद केलं आहे, हे असे स्वार्थी लोक आहेत. तेव्हा अयोध्येने त्यांचा पराभव केला असल्याचं देखील संजय यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAAPआपBJPभाजपाAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर