शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

'चौथी पास राजाला देश कसा चालवायचा, हे समजत नाही', रामलीला मैदानातून केजरीवाल कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 14:12 IST

AAP Rally At Ramlila Maidan: '12 वर्षांपूर्वी आम्ही भ्रष्टाचाराविरोधात या मैदानावर एकत्र आलो होतो. आज पुन्हा एकदा याच मैदानावर अहंकारी हुकूमशहाला हटवण्यासाठी एकत्र आलो आहोत.'

AAP Rally At Ramlila Maidan: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा दिल्लीच्या रामलीला मैदानावर आले आहेत. आम आदमी पक्षाने रविवारी (11 जून) मोठी रॅली काढली. रॅलीला संबोधित करताना केजरीवालांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. '12 वर्षांपूर्वी आम्ही भ्रष्टाचाराविरोधात या मैदानावर एकत्र आलो होतो. आज 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा याच मैदानावर आपण एका अहंकारी हुकूमशहाला हटवण्यासाठी एकत्र आलो आहोत,' अशी टीका त्यांनी केली.

'आमच्याकडे 100 मनीष सिसोदिया आहेत'केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात आम आदमी पार्टीने दिल्लीच्या रामलीला मैदानावर मोठी रॅली काढली. यावेळी केजरीवाल म्हणाले की, केंद्र सरकारच्या हुकूमशाही अध्यादेशाविरोधात दिल्लीतील जनता रामलीला मैदानावर एकजूट होत आहे. मोदीना वाटतं की, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना तुरुंगात टाकल्याने आमचे काम थांबेल. आमच्याकडे एक नाही तर 100 सिसोदिया आहेत, 100 सत्येंद्र आहेत. एक गेला तर दुसरा कामावर येईल. त्यांना तुरुंगात टाकून काम झाले नाही, म्हणून त्यांनी अध्यादेश आणला. दिल्लीतील जनतेवर अध्यादेश लादला जात आहे. दिल्लीचे सातही खासदार घरात लपून बसले आहेत', अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

'देश चालवायचं मोदींना समजत'केजरीवाल पुढे म्हणाले की, 'चौथी पास राजाला देश कसा चालवायचा, हे समजत नाही. सगळीकडे बेरोजगारी पसरली आहे, ही कशी दूर करायची, ते समजत नाही. भ्रष्टाचार कसा दूर करायचा, हे समजत नाही. जीएसटीमुळे व्यापारी चिंतेत आहेत. रेल्वेचे काय झाले आहे. 2002 मध्ये पंतप्रधान गुजरातचे मुख्यमंत्री झाले. 12 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते. गेली 9 वर्षे ते पंतप्रधान आहेत. 2015 मध्ये मी मुख्यमंत्री झालो, मला 8 वर्षे झाली. मी आज त्यांना आव्हान देतो, इतक्या वर्षात तुम्ही काय काम केले आणि मी काय काम केले...'

'140 कोटी लोक अध्यादेशाला विरोध करतील''या अध्यादेशाविरोधात मी सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहे. दिल्लीची जनता, संपूर्ण देशाची जनता आमच्यासोबत आहे. 140 कोटी मिळून या अध्यादेशाला विरोध करतील आणि लोकशाही वाचवतील. हे फक्त दिल्लीकरांच्या बाबतीत घडले आहे, असे समजू नका. असाच अध्यादेश राजस्थानसाठी, पंजाबसाठी, मध्यप्रदेशसाठी, महाराष्ट्रासाठी आणला जाईल, हे आता थांबायला हवे. आता दिल्लीत लोकशाही राहणार नाही, हुकूमशाही चालेल,' अशी टीकाही त्यांनी यावेली केली. 

'मोदींचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नाही'अरविंद केजरीवाल म्हणाले की, '19 मे रोजी देशाच्या पंतप्रधानांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळला. सर्वोच्च न्यायालयावर माझा विश्वास नाही, असे पंतप्रधान म्हणाले. 75 वर्षांच्या इतिहासात प्रथमच असा पंतप्रधान आला आहे, जो सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवत नाही. अशा अहंकारी पंतप्रधानांवर देशातील जनता विश्वास ठेवू शकत नाही. आज या व्यासपीठावरुन एका अहंकारी हुकूमशहाला देशातून हटवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आज या व्यासपीठावरुन पुन्हा आंदोलन सुरू होणार,' असंही केजरीवाल यावेली म्हणाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्ली