शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

'आप'चे खासदार टोमॅटोचा हार घालून राज्यसभेत पोहोचले; सभापती म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 16:53 IST

टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम आदमी पक्षाचे खासदार सुशील गुप्ता टोमॅटोचा हार घालून राज्यसभेत पोहोचले.

नवी दिल्ली : देशाच्या संसदेला लोकशाहीचे मंदिर म्हटले जाते. पण संसदेत खासदार आपला निषेध व्यक्त करण्यासाठी अनोखे मार्ग अवलंबतात. असाच काहीसा प्रकार बुधवारी संसदेतही पाहायला मिळाला. दिल्लीत टोमॅटोचे भाव २०० रुपये किलोवर पोहोचला आहे. टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम आदमी पक्षाचे खासदार सुशील गुप्ता टोमॅटोचा हार घालून राज्यसभेत पोहोचले.

केंद्रीय मंत्र्यांना टोमॅटो आणि आले भेट देणार आहे, असे खासदार सुशील गुप्ता यांनी सांगितले. तसेच, देशभरात टोमॅटोचे भाव गगनाला भिडत असल्याचे सुशील गुप्ता यांनी सभागृहाबाहेर सांगितले. सर्वसामान्य माणूस महागाईच्या आगीत होरपळत आहे, मात्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही. टोमॅटोशिवाय डिझेल-पेट्रोलने १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. असे असतानाही सरकार ना महागाईवर चर्चा करत आहे, ना मणिपूरवर चर्चा करत आहे. त्यामुळे हा दागिना (टोमॅटोची हार) घालून सभागृहात जात आहे, असे खासदार सुशील गुप्ता म्हणाले.

दरम्यान, सभागृहात सुशील गुप्ता यांच्या शेजारी बसलेले जेडीयू खासदार अनिल प्रसाद हेगडे यांना बोलण्याची संधी मिळाली, तेव्हा सुशील गुप्ताही कॅमेऱ्यात दिसले. यावेळी त्यांनी गळ्यात घातलेला टोमॅटोचा माळ उचलला आणि राज्यसभेच्या कॅमेऱ्यातही दाखवला. राज्यसभेत सुशील गुप्ता जेव्हा टोमॅटोचा हार दाखवत होते, तेव्हा आपचे खासदार राघव चढ्ढाही पुढच्या रांगेत बसले होते.

पीयूष गोयल यांना भेट देणार टोमॅटोखाद्यपदार्थांच्या वाढत्या किमती पाहता सुशील गुप्ता यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे वेळ मागितली आहे. पीयूष गोयल यांची भेट घेतल्यानंतर त्यांना टोमॅटो आणि आल्याची टोपली भेट देणार असल्याचे सुशील गुप्ता म्हणाले. तसेच, मणिपूर, हरयाणा, महागाईवर सरकारने घरात चर्चा करावी, मात्र सरकार सभागृहातील चर्चेपासून पळ काढत असल्याचेही सुशील गुप्ता म्हणाले.

सभापतींनी नोंदवला आक्षेप दुसरीकडे, राज्यसभेच्या सभापती जगदीप धनखड यांनी आप खासदार सुशील गुप्ता यांनी टोमॅटोचा हार घालून राज्यसभेत येण्यावर आक्षेप नोंदवला. कोणाचेही नाव न घेता ते म्हणाले की, सभागृहात वागण्याची मर्यादा असते आणि ठराविक प्रोटोकॉल असतो. राज्यसभेचे अध्यक्ष असताना आमच्या सभागृहातील अनेक सन्माननीय सदस्य या मर्यादेचे उल्लंघन करतात, हे पाहून मला दुःख झाले आहे, असे सभापती जगदीप धनखड म्हणाले.  यानंतर त्यांनी राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाAAPआप