शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

Saurabh Bharadwaj : "भाजपाचे समर्थकही म्हणताहेत..."; केजरीवालांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर 'आप'चा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 12:55 IST

AAP Saurabh Bharadwaj And Arvind Kejriwal : आम आदमी पार्टीचे (AAP) नेते आणि मंत्री सौरभ भारद्वाज यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेबाबत मोठा दावा केला आहे.

दिल्लीत पुढचा मुख्यमंत्री कोण असणार याची जोरदार चर्चा आहे. याच दरम्यान, आम आदमी पार्टीचे (AAP) नेते आणि मंत्री सौरभ भारद्वाज यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेबाबत मोठा दावा केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी खरोखरच मोठं पाऊल उचललं आहे, असं भाजपाचे समर्थकही म्हणत आहेत असं भारद्वाज यांनी सांगितलं. 

सौरभ भारद्वाज सोमवारी पत्रकार परिषदेत म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिकपणाच्या नावावर निवडणूक लढविण्याबाबत सांगितलं आहे. एका प्रामाणिक माणसाला जेलमध्ये पाठवलं, त्यांना यामध्ये अडकवण्यात संपूर्ण केंद्र सरकार व्यस्त होतं. त्यामुळे भाजपाविरोधात प्रचंड नाराजी आहे."

"दिल्लीतील प्रत्येकजण निवडणूक कधी होणार असा प्रश्न विचारत आहे. निवडणुका व्हाव्यात आणि केजरीवाल यांची मुख्यमंत्रीपदी निवड व्हावी, अशी दिल्लीतील जनतेची इच्छा आहे. केजरीवाल यांना अडकवण्याचा कट पंतप्रधानांनी रचला. मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला आहे."

"देशातील ही पहिलीच निवडणूक असेल ज्यामध्ये एखादा मुख्यमंत्री म्हणत असेल की ही निवडणूक प्रामाणिकपणाच्या नावावर लढवली जाईल आणि तेही जेव्हा केंद्र सरकार, सर्व यंत्रणा, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स असो, सर्व एजन्सी मुख्यमंत्र्यांच्या मागे लागल्या असून त्यांची बदनामी करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही."

"भारतीय जनता पक्षाने गेल्या दोन वर्षांत जे काही केलं, तरीही मुख्यमंत्र्यांचा आपल्या जनतेवर आणि प्रामाणिकपणावर विश्वास आहे. दिल्लीतील लोक निवडणुका व्हाव्यात म्हणून उत्सुक आहेत आणि ते अरविंद केजरीवाल यांना मतदान करून पुन्हा मुख्यमंत्री बनवतील" असं सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीBJPभाजपाPoliticsराजकारण