शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

'या' तिघांमुळे मद्य धोरणात 2 हजार कोटींचे नुकसान, आतिशी यांचा मोठा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 00:09 IST

मद्य धोरणात २००० कोटी रुपयांचे नुकसान तिघांमुळे झाल्याचे आतिशी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर या तिघांच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.

दिल्ली विधानसभेत सोमवारी मद्य धोरणासंदर्भात नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अर्थात कॅगचा अहवाल (CAG Report) सादर करण्यात आला. यात मद्य धोरणामुळे राज्याला २.६८ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हणण्यात आले आहे. हा अहवाल सादर झाल्यानंतर आता भाजप आणि आम आदमी पक्षात वाकयुद्ध सुरू झाले आहे. यातच, आतिशी यांनी एक मोठा दावा केला आहे. मद्य धोरणात हे २००० कोटी रुपयांचे नुकसान तिघांमुळे झाल्याचे आतिशी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर या तिघांच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.

उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी अडथळे निर्माण केले -आतिशी म्हणाल्या, उपराज्यपाल, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्या हस्तक्षेपामुळे मद्य धोरण योग्यपद्धतीने अंमलात आणले नाही. ज्यामुळे नुकसान झाले. त्या पुढे म्हणाल्या, धोरणाची अंमलबजावणी करण्यापासून रोखाण्यास तीन जण जबाबदार आहेत. सर्वप्रथम, भाजपचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना, ज्यांनी नवे मद्य धोरण लागू होऊ दिले नाही, अडथळे निर्माण केले.

...परिणामी, दिल्लीचे अपेक्षित महसुलात २००० कोटी रुपये तर वार्षिक ८,९०० कोटी रुपये नुकसान -आतिशी पुढे म्हणाल्या, दुसरे म्हणजे सीबीआय, ज्यांनी धोरणआला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच एफआयआर दाखल केला. तिसरे म्हणजे ईडी, ज्यांनी धोरण संपण्याच्या एक वर्ष आधीच या धोरणावर ईसीआयआर केला. एलजींच्या हस्तक्षेपानंतर, सीबीआयच्या एफआयआरनंतर आणि ईडीच्या ईसीआयआरनंतर, कुठल्याही अधिकाऱ्याचे या धोरणावर पुन्हा स्वाक्षरी करण्याची धाडस नव्हते. परिणामी, दिल्लीला अपेक्षित महसुलात २००० कोटी रुपये आणि वार्षिक दृष्ट्या ८,९०० कोटी रुपये नुकसान झाले. 

टॅग्स :AtishiआतिशीAAPआपdelhiदिल्ली