शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

‘आप’ आमदारांना अरविंद केजरीवाल यांचा ‘कानमंत्र’; “काहीही सहन करेन, पण...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 14:49 IST

लोकांना आपल्याकडून अपेक्षा आहेत. ३ दिवसांत चांगले निर्णय झाले त्याबद्दल केजरीवालांनी पंजाब सरकारचं अभिनंदन केले.

नवी दिल्ली – पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन झालं आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेट बैठक पार पडली आहे. त्यानंतर आता आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या आमदारांसोबत व्हर्चुअल बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री भगवंत मान, आप नेते राघव चड्ढा हेदेखील उपस्थित होते. या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी आमदारांना ‘कानमंत्र’ दिला आहे.

अरविंद केजरीवाल(AAP Arvind Kejariwal) म्हणाले की, मी आज तुमच्याशी बोलताना आनंदी आहे. त्यासोबत भावूक देखील झालोय. पंजाबच्या लोकांनी आपवर विश्वास ठेवला आणि आम आदमी पक्षाच्या कामावर मतदान केले. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह तुम्ही सगळ्यांनी पंजाबच्या जनतेसाठी चांगले काम करायला हवे. शेतकऱ्यांना नुकसानीचे पैसे द्यायला हवेत. भ्रष्टाचार मुक्त पंजाब बनवण्याचं आपलं आश्वासन पूर्ण करायला हवं. पंजाब सरकारनं पहिल्या कॅबिनेटमध्ये २५ हजार बेरोजगार युवकांना नोकरी देण्याचा निर्णय घेतला तो महत्त्वाचा आहे. लोकांना आपल्याकडून अपेक्षा आहेत. ३ दिवसांत चांगले निर्णय झाले त्याबद्दल केजरीवालांनी पंजाब सरकारचं अभिनंदन केले.

तसेच भाजपा अद्यापही ४ राज्यांत सरकार बनवू शकत नाही. पदांवरून त्यांच्या नेत्यांमध्ये वाद सुरू आहेत. पंजाबमध्ये मी ऐकलं ज्यांना मंत्रिपदं मिळाली नाहीत ते नाराज आहेत. आपकडे ९२ आमदार आहेत. त्यातील १७ मंत्री बनू शकतात. तुम्ही स्वत:ला मंत्र्यांपेक्षा कमी समजू नका. वेगळ्या इच्छा ठेवू नका. एका टीमप्रमाणे काम करा. सर्वांना जबाबदारी मिळेल. भगवंत मान तुमच्यावर देतील ती जबाबदारी पूर्ण करा. तुमच्यापैकी ९९ टक्के पहिल्यांदा आमदार बनले आहेत. तुम्ही कधी आमदार व्हाल असा विचार केला नसेल. काहींनी मोठमोठ्या नेत्यांना हरवलं आहे. परंतु अहंकार बाळगू नका. कुठल्याही पदावर आपला हक्क आहे असं समजू नका. जनता त्यांना नाकारते हे आधीच्या नेत्यांकडे बघून कळेल असा कानमंत्र अरविंद केजरीवाल यांनी आमदारांना दिला आहे.

भ्रष्टाचारावर सज्जड दम

अरविंद केजरीवालांनी या बैठकीत भ्रष्टाचाराचा मुद्द्यावरही भाष्य केले. काहीही सहन करू शकतो परंतु बेईमानी नाही. काम करण्याची संधी देऊ परंतु जर बेईमानी केली तर कारवाई करू. काहीही करा मात्र बेईमानी आणि जनतेचा अपमान करू नका. मी सोशल मीडियावर हे पाहिलंय. हे सगळं बोलण्याची गरज आहे का? काम करा, आपल्याला मान मिळेल. विरोधी असो वा अधिकारी हा त्यांचा दोष नाही. सिस्टम सुधारली पाहिजे. पंजाबच्या काही मंत्र्यांच्या घरातील लोकांनीही ‘आप’ला मतदान केले. पुढील ५ वर्षात ३ कोटी पंजाबी जनतेचे मन जिंकायचं आहे. पुढील वेळी एकही मत फिरता कामा नये. कुणी भ्रष्टाचार करत असेल तर सांगा असं आवाहनही अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या आमदारांना केले.  

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालPunjabपंजाब