शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

केजरीवालांच्या जुन्या सहकाऱ्याने साथ सोडली, आपने भाजपवर केला ED कारवाईचा आरोप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 13:58 IST

दिल्ली सरकारमधील मंत्री कैलाश गहलोत यांनी मंत्रीपदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Kailash Gehlot Resigns: दिल्लीच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. आम आदमी पार्टीच्या आतिशी सरकारमधील परिवहन मंत्री आणि आम आदमी पक्षाचे दिग्गज नेते कैलाश गेहलोत (Kailash Gehlot) यांनी आज अचानक मंत्रीपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत त्यांनी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना पत्र लिहिले आहे.

पक्षावर गंभीर आरोप

कैलाश गेहलोत यांनी राजीनामा देताना पक्षावर काही गंभीर आरोपही केले. गेहलोत यांनी केजरीवालांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले की, 'मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज आम आदमी पक्षासमोर गंभीर आव्हाने आहेत. ज्या मूल्यांनी आपल्याला 'आप'मध्ये एकत्र आणले, त्याच मूल्यांचे आव्हान पक्षासमोर आहे. राजकीय महत्त्वाकांक्षेने जनतेशी असलेल्या बांधिलकीला मागे टाकले आहे. यामुळे जनतेला दिलेली अनेक आश्वासने अपूर्ण राहिली आहेत.'

यमुना स्वच्छतेचे उदाहरण 'उदाहरणार्थ, आपण यमुनेला स्वच्छ नदी बनवण्याचे वचन दिले होते, परंतु आपण ते आजपर्यंत पूर्ण करू शकलो नाही. आता यमुना नदी पूर्वीपेक्षा जास्त प्रदूषित झाली आहे. आणखी एक क्लेशदायक गोष्ट म्हणजे लोकांच्या हक्कांसाठी लढण्याऐवजी आपण केवळ आपल्या राजकीय अजेंडासाठी लढत आहोत. त्यामुळे दिल्लीतील लोकांना मुलभूत सेवाही पुरविण्यात अडचणी येत आहेत.'

आपण आजही 'आम आदमी' आहोत का?'कैलाश गेहलोत पुढे लिहितात, 'शीशमहल(केजरीवालांचे निवासस्थान) सारखे अनेक लज्जास्पद आणि विचित्र वाद आहेत, ज्यामुळे आपल्या सर्वांवर, खरंच आपण 'आम आदमी' आहोत का? असा प्रश्न उपस्थित करतात. दिल्ली सरकार आपला जास्तीत जास्त वेळ केंद्राशी भांडण्यात घालवत असेल, तर दिल्लीचा विकास कधीही होणार नाही.'

दिल्लीच्या लोकांसी सेवा करण्यासाठी...ते शेवटी म्हणथात, 'दिल्लीच्या लोकांची सेवा करण्याच्या वचनबद्धतेने मी माझा राजकीय प्रवास सुरू केला आणि मला पुढेही ठेवायचे आहे. त्यामुळेच 'आप'पासून दूर जाण्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरला नाही. त्यामुळेच मी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला संधी दिली, आमदार-मंत्री केले, त्याबद्दल धन्यवाद.'

भाजपने केले स्वागत भाजप नेत्यांनी कैलाश गेहलोत यांच्या या पावलाचे स्वागत केले असून, त्यांच्या राजीनाम्यामुळे आम आदमी पार्टी हा भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष असल्याचे स्पष्ट झाले असल्याची टीका केली आहे.

आपचा भाजपवर आरोपकैलाश गेहलोत यांच्या राजीनाम्यानंतर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह म्हणाले की, भाजप पुन्हा एकदा आपल्या कटात यशस्वी झाला. भाजप अनेक दिवसांपासून ईडीच्या माध्यमातून गेहलोत यांच्यावर दबाव आणत होता. कोणत्याही विरोधी नेत्यावर कारवाई झाली की, भाजपचे लोक खूप गोंधळ घालतात आणि जेव्हा तो राजीनामा देऊन भाजपमध्ये जातो, तेव्हा त्यांची सर्व पापे 'मोदी वॉशिंग पावडर'ने धुऊन जातात.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्ली