शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

केजरीवालांच्या जुन्या सहकाऱ्याने साथ सोडली, आपने भाजपवर केला ED कारवाईचा आरोप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 13:58 IST

दिल्ली सरकारमधील मंत्री कैलाश गहलोत यांनी मंत्रीपदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Kailash Gehlot Resigns: दिल्लीच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. आम आदमी पार्टीच्या आतिशी सरकारमधील परिवहन मंत्री आणि आम आदमी पक्षाचे दिग्गज नेते कैलाश गेहलोत (Kailash Gehlot) यांनी आज अचानक मंत्रीपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत त्यांनी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना पत्र लिहिले आहे.

पक्षावर गंभीर आरोप

कैलाश गेहलोत यांनी राजीनामा देताना पक्षावर काही गंभीर आरोपही केले. गेहलोत यांनी केजरीवालांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले की, 'मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज आम आदमी पक्षासमोर गंभीर आव्हाने आहेत. ज्या मूल्यांनी आपल्याला 'आप'मध्ये एकत्र आणले, त्याच मूल्यांचे आव्हान पक्षासमोर आहे. राजकीय महत्त्वाकांक्षेने जनतेशी असलेल्या बांधिलकीला मागे टाकले आहे. यामुळे जनतेला दिलेली अनेक आश्वासने अपूर्ण राहिली आहेत.'

यमुना स्वच्छतेचे उदाहरण 'उदाहरणार्थ, आपण यमुनेला स्वच्छ नदी बनवण्याचे वचन दिले होते, परंतु आपण ते आजपर्यंत पूर्ण करू शकलो नाही. आता यमुना नदी पूर्वीपेक्षा जास्त प्रदूषित झाली आहे. आणखी एक क्लेशदायक गोष्ट म्हणजे लोकांच्या हक्कांसाठी लढण्याऐवजी आपण केवळ आपल्या राजकीय अजेंडासाठी लढत आहोत. त्यामुळे दिल्लीतील लोकांना मुलभूत सेवाही पुरविण्यात अडचणी येत आहेत.'

आपण आजही 'आम आदमी' आहोत का?'कैलाश गेहलोत पुढे लिहितात, 'शीशमहल(केजरीवालांचे निवासस्थान) सारखे अनेक लज्जास्पद आणि विचित्र वाद आहेत, ज्यामुळे आपल्या सर्वांवर, खरंच आपण 'आम आदमी' आहोत का? असा प्रश्न उपस्थित करतात. दिल्ली सरकार आपला जास्तीत जास्त वेळ केंद्राशी भांडण्यात घालवत असेल, तर दिल्लीचा विकास कधीही होणार नाही.'

दिल्लीच्या लोकांसी सेवा करण्यासाठी...ते शेवटी म्हणथात, 'दिल्लीच्या लोकांची सेवा करण्याच्या वचनबद्धतेने मी माझा राजकीय प्रवास सुरू केला आणि मला पुढेही ठेवायचे आहे. त्यामुळेच 'आप'पासून दूर जाण्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरला नाही. त्यामुळेच मी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला संधी दिली, आमदार-मंत्री केले, त्याबद्दल धन्यवाद.'

भाजपने केले स्वागत भाजप नेत्यांनी कैलाश गेहलोत यांच्या या पावलाचे स्वागत केले असून, त्यांच्या राजीनाम्यामुळे आम आदमी पार्टी हा भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष असल्याचे स्पष्ट झाले असल्याची टीका केली आहे.

आपचा भाजपवर आरोपकैलाश गेहलोत यांच्या राजीनाम्यानंतर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह म्हणाले की, भाजप पुन्हा एकदा आपल्या कटात यशस्वी झाला. भाजप अनेक दिवसांपासून ईडीच्या माध्यमातून गेहलोत यांच्यावर दबाव आणत होता. कोणत्याही विरोधी नेत्यावर कारवाई झाली की, भाजपचे लोक खूप गोंधळ घालतात आणि जेव्हा तो राजीनामा देऊन भाजपमध्ये जातो, तेव्हा त्यांची सर्व पापे 'मोदी वॉशिंग पावडर'ने धुऊन जातात.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्ली