शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

केजरीवालांच्या जुन्या सहकाऱ्याने साथ सोडली, आपने भाजपवर केला ED कारवाईचा आरोप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 13:58 IST

दिल्ली सरकारमधील मंत्री कैलाश गहलोत यांनी मंत्रीपदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Kailash Gehlot Resigns: दिल्लीच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. आम आदमी पार्टीच्या आतिशी सरकारमधील परिवहन मंत्री आणि आम आदमी पक्षाचे दिग्गज नेते कैलाश गेहलोत (Kailash Gehlot) यांनी आज अचानक मंत्रीपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत त्यांनी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना पत्र लिहिले आहे.

पक्षावर गंभीर आरोप

कैलाश गेहलोत यांनी राजीनामा देताना पक्षावर काही गंभीर आरोपही केले. गेहलोत यांनी केजरीवालांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले की, 'मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज आम आदमी पक्षासमोर गंभीर आव्हाने आहेत. ज्या मूल्यांनी आपल्याला 'आप'मध्ये एकत्र आणले, त्याच मूल्यांचे आव्हान पक्षासमोर आहे. राजकीय महत्त्वाकांक्षेने जनतेशी असलेल्या बांधिलकीला मागे टाकले आहे. यामुळे जनतेला दिलेली अनेक आश्वासने अपूर्ण राहिली आहेत.'

यमुना स्वच्छतेचे उदाहरण 'उदाहरणार्थ, आपण यमुनेला स्वच्छ नदी बनवण्याचे वचन दिले होते, परंतु आपण ते आजपर्यंत पूर्ण करू शकलो नाही. आता यमुना नदी पूर्वीपेक्षा जास्त प्रदूषित झाली आहे. आणखी एक क्लेशदायक गोष्ट म्हणजे लोकांच्या हक्कांसाठी लढण्याऐवजी आपण केवळ आपल्या राजकीय अजेंडासाठी लढत आहोत. त्यामुळे दिल्लीतील लोकांना मुलभूत सेवाही पुरविण्यात अडचणी येत आहेत.'

आपण आजही 'आम आदमी' आहोत का?'कैलाश गेहलोत पुढे लिहितात, 'शीशमहल(केजरीवालांचे निवासस्थान) सारखे अनेक लज्जास्पद आणि विचित्र वाद आहेत, ज्यामुळे आपल्या सर्वांवर, खरंच आपण 'आम आदमी' आहोत का? असा प्रश्न उपस्थित करतात. दिल्ली सरकार आपला जास्तीत जास्त वेळ केंद्राशी भांडण्यात घालवत असेल, तर दिल्लीचा विकास कधीही होणार नाही.'

दिल्लीच्या लोकांसी सेवा करण्यासाठी...ते शेवटी म्हणथात, 'दिल्लीच्या लोकांची सेवा करण्याच्या वचनबद्धतेने मी माझा राजकीय प्रवास सुरू केला आणि मला पुढेही ठेवायचे आहे. त्यामुळेच 'आप'पासून दूर जाण्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरला नाही. त्यामुळेच मी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला संधी दिली, आमदार-मंत्री केले, त्याबद्दल धन्यवाद.'

भाजपने केले स्वागत भाजप नेत्यांनी कैलाश गेहलोत यांच्या या पावलाचे स्वागत केले असून, त्यांच्या राजीनाम्यामुळे आम आदमी पार्टी हा भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष असल्याचे स्पष्ट झाले असल्याची टीका केली आहे.

आपचा भाजपवर आरोपकैलाश गेहलोत यांच्या राजीनाम्यानंतर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह म्हणाले की, भाजप पुन्हा एकदा आपल्या कटात यशस्वी झाला. भाजप अनेक दिवसांपासून ईडीच्या माध्यमातून गेहलोत यांच्यावर दबाव आणत होता. कोणत्याही विरोधी नेत्यावर कारवाई झाली की, भाजपचे लोक खूप गोंधळ घालतात आणि जेव्हा तो राजीनामा देऊन भाजपमध्ये जातो, तेव्हा त्यांची सर्व पापे 'मोदी वॉशिंग पावडर'ने धुऊन जातात.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्ली