शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

Arvind Kejriwal: "सुधरा नाहीतर...!", अरविंद केजरीवालांनी पाकिस्तानला थेट जागाच दाखवली; काश्मीरबाबत केलं मोठं विधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 16:05 IST

AAP Jan Akrosh Rally in Delhi: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून होणाऱ्या 'टार्गेट किलिंग' प्रकरणाच्या निषेधार्थ आम आदमी पक्षानं आज जन आक्रोश रॅलीचं आयोजन दिल्लीत केलं होतं.

AAP Jan Akrosh Rally in Delhi: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून होणाऱ्या 'टार्गेट किलिंग' प्रकरणाच्या निषेधार्थ आम आदमी पक्षानं आज जन आक्रोश रॅलीचं आयोजन दिल्लीत केलं होतं. या रॅलीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकार तसंच पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. "गेल्या काही महिन्यांमध्ये काश्मीरमध्ये एकूण १८ नागरिकांची हत्या झाली आहे. ज्या लोकांना पोलीस सुरक्षा देण्यात आली होती अशाही लोकांना ठार मारण्यात आलं. काश्मीर दहशतीच्या आगीत जळत आहे, तर भाजपा राजकारणात व्यग्र आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा पूर्णपणे फोल ठरली आहे", असं केजरीवाल म्हणाले. 

काश्मीरी पंडितांना आवश्यक सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी केजरीवालांनी मोदी सरकारकडे केली आहे. गेल्या काही आठवठ्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा काश्मीरी पंडितांना लक्ष्य केलं जात आहे. यावरुन विविध राजकीय पक्षांनी भाजपावर निशाणा साधला आहे. घडलेल्या घटनांना जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला आहे. 

"जेव्हा भाजपा सत्तेत आली तेव्हा काश्मीर दहशतवादाच्या आगीत जळू लागला. भाजपाला फक्त घाणेरडं राजकारण करता येतं. यांना भारतीयांशी कोणतंही घेणं देणं नाही. संपूर्ण देशात घाणेरडं राजकारण सुरू आहे. ४५०० काश्मीरी पंडितांचं पीएम रिलीफ फंडच्या माध्यमातून पूनर्वसन करण्यात आलं. तुम्ही त्यांना आज इतर कोणत्या राज्यात जाण्यापासून रोखलं आहे. १७७ काश्मीरींना यांनीच जम्मू-काश्मीरमध्ये ठेवलं आहे आणि त्यांची बदली केली नाही. ज्याचे परिणाम आज सर्वांसमोर आहेत", असं केजरीवाल म्हणाले. 

पाकिस्तानला दाखवली जागाजन आक्रोश रॅलीच्या व्यासपीठावरुन केजरीवाल यांनी थेट पाकिस्तानला आव्हान दिलं. पाकिस्तानला आव्हान देताना केजरीवाल म्हणाले की,"सुधरा, नाहीतर भारतानं जर ठरवलं तर पाकिस्तान वाचणार नाही. काश्मीर भारताचा भाग होता, आहे आणि कायम राहणार आहे. या विषयावर लवकरच गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही भेट घेऊन बोलणार आहे", असं केजरीवाल म्हणाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपJammu Kashmirजम्मू-काश्मीर