शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

Arvind Kejriwal: "सुधरा नाहीतर...!", अरविंद केजरीवालांनी पाकिस्तानला थेट जागाच दाखवली; काश्मीरबाबत केलं मोठं विधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 16:05 IST

AAP Jan Akrosh Rally in Delhi: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून होणाऱ्या 'टार्गेट किलिंग' प्रकरणाच्या निषेधार्थ आम आदमी पक्षानं आज जन आक्रोश रॅलीचं आयोजन दिल्लीत केलं होतं.

AAP Jan Akrosh Rally in Delhi: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून होणाऱ्या 'टार्गेट किलिंग' प्रकरणाच्या निषेधार्थ आम आदमी पक्षानं आज जन आक्रोश रॅलीचं आयोजन दिल्लीत केलं होतं. या रॅलीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकार तसंच पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. "गेल्या काही महिन्यांमध्ये काश्मीरमध्ये एकूण १८ नागरिकांची हत्या झाली आहे. ज्या लोकांना पोलीस सुरक्षा देण्यात आली होती अशाही लोकांना ठार मारण्यात आलं. काश्मीर दहशतीच्या आगीत जळत आहे, तर भाजपा राजकारणात व्यग्र आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा पूर्णपणे फोल ठरली आहे", असं केजरीवाल म्हणाले. 

काश्मीरी पंडितांना आवश्यक सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी केजरीवालांनी मोदी सरकारकडे केली आहे. गेल्या काही आठवठ्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा काश्मीरी पंडितांना लक्ष्य केलं जात आहे. यावरुन विविध राजकीय पक्षांनी भाजपावर निशाणा साधला आहे. घडलेल्या घटनांना जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला आहे. 

"जेव्हा भाजपा सत्तेत आली तेव्हा काश्मीर दहशतवादाच्या आगीत जळू लागला. भाजपाला फक्त घाणेरडं राजकारण करता येतं. यांना भारतीयांशी कोणतंही घेणं देणं नाही. संपूर्ण देशात घाणेरडं राजकारण सुरू आहे. ४५०० काश्मीरी पंडितांचं पीएम रिलीफ फंडच्या माध्यमातून पूनर्वसन करण्यात आलं. तुम्ही त्यांना आज इतर कोणत्या राज्यात जाण्यापासून रोखलं आहे. १७७ काश्मीरींना यांनीच जम्मू-काश्मीरमध्ये ठेवलं आहे आणि त्यांची बदली केली नाही. ज्याचे परिणाम आज सर्वांसमोर आहेत", असं केजरीवाल म्हणाले. 

पाकिस्तानला दाखवली जागाजन आक्रोश रॅलीच्या व्यासपीठावरुन केजरीवाल यांनी थेट पाकिस्तानला आव्हान दिलं. पाकिस्तानला आव्हान देताना केजरीवाल म्हणाले की,"सुधरा, नाहीतर भारतानं जर ठरवलं तर पाकिस्तान वाचणार नाही. काश्मीर भारताचा भाग होता, आहे आणि कायम राहणार आहे. या विषयावर लवकरच गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही भेट घेऊन बोलणार आहे", असं केजरीवाल म्हणाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपJammu Kashmirजम्मू-काश्मीर