शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आप हा महिलाविरोधी पक्ष; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 08:36 IST

मालीवाल प्रकरणावरही भाष्य

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: दिल्ली विरोधीपक्ष म्हणून प्रसिद्ध असलेला आम आदमी पक्ष आता महिलाविरोधी पक्षही बनला असल्याचा आरोप गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, दिल्लीचे लोक विचारत आहेत की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पहिल्या दिवसांपासून स्वाती मालीवाल प्रकरणावर गप्प का आहेत? त्यांनी या विषयी काही तरी स्पष्टीकरण द्यावे. अरविंद केजरीवाल यांचे मौन या प्रकरणाबद्दल सर्व काही सांगते, 'असेही मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे. 'आप' आता दिल्लीविरोधी, महिलाविरोधी पक्ष बनला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल स्वातींवर दबाव आणत असल्याची शंकाही त्यांनी वर्तविली आहे. सोनी मिश्रा प्रकरणातील केजरीवाल हे असेच वागले होते असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आप नेते वाल्मिकी नायक यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदे सांगितले की, मुख्यमंत्री निवडणुकीच्या प्रचारात मुद्द्याचे सोडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर खासगी आरोप करत आहेत. दिल्लीची जनता त्यांचा या भूलथापांना बळी पडणार नाही. मुख्यमंत्री सावंत यांनी विकासावर बोलावे. दिल्लीचा किती विकास झाला आहे हे लोकांना माहिती आहे, असेही ते म्हणाले. यावेळी अॅड. सुरेल तिळवे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी गोव्याच्या विकासावर बोलावे. तसेच भाजपने दिल्लीवासीयांसाठी काय केले हे सांगावे. एखाद्या मुख्यमंत्र्यावर चांगले काम करत असल्याने खासगी आरोप करणे चुकीचे आहे, असे सांगून नायक म्हणाले, राज्यात सध्या चोऱ्या, खून अपहरण तसेच अन्य गुन्हेगारी वाढली आहे. पण सरकारचे याच्यावर काही नियंत्रण नाही. मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त आहेत. त्यांना फक्त भाजप दिसत आहे. तर अन्य पक्षाचे नेत्यांना त्यांना जेलमध्ये टाकावे, असे वाटत आहे. पण केजरीवाल निर्दोष असून, ते पुन्हा २ जून रोजी जेलमध्ये जाणार नाहीत, असा विश्वास असल्याचेही नायक यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सिद्धी नाईक प्रकरणावर बोला: पालेकर

पणजी : स्वाती मालीवाल प्रकरणावरून दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करण्याऐवजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाच्या तपासावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी पक्षाचे गोवा प्रमुख अॅड. अमित पालेकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत हे दिल्लीत निवडणुकीचा प्रचार करत आहेत. यावेळी त्यांनी स्वाती मालीवाल प्रकरणी आप नेते केजरीवाल का गप्प आहेत? असा प्रश्न केला होता. खरे तर मुख्यमंत्र्यांना या विषयाची कुठलीही माहिती नाही, अशी टीका त्यांनी केली. अॅड. पालेकर म्हणाले, की मालीवाल प्रकरणावरून आम आदमी पक्षाने यापूर्वीच जाहीर विधान जारी केले आहे. डॉ. सावंत यांनी केजरीवाल यांना या विषयावरून प्रश्न करण्याऐवजी सिद्धी नाईक मृत्यूप्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला यावर गोव्यात आल्यानंतर विधान करावे. त्याचा तपास करण्याचा गोवा पोलिसांना पूर्णपणे अपयश आले आहे. सरकारला महिलांना सुरक्षा पुरवता आलेली नाही. गोवा पोलिसांना सिद्धी मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यात अपयश का आले यावर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतPoliticsराजकारण