शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

आप हा महिलाविरोधी पक्ष; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 08:36 IST

मालीवाल प्रकरणावरही भाष्य

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: दिल्ली विरोधीपक्ष म्हणून प्रसिद्ध असलेला आम आदमी पक्ष आता महिलाविरोधी पक्षही बनला असल्याचा आरोप गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, दिल्लीचे लोक विचारत आहेत की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पहिल्या दिवसांपासून स्वाती मालीवाल प्रकरणावर गप्प का आहेत? त्यांनी या विषयी काही तरी स्पष्टीकरण द्यावे. अरविंद केजरीवाल यांचे मौन या प्रकरणाबद्दल सर्व काही सांगते, 'असेही मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे. 'आप' आता दिल्लीविरोधी, महिलाविरोधी पक्ष बनला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल स्वातींवर दबाव आणत असल्याची शंकाही त्यांनी वर्तविली आहे. सोनी मिश्रा प्रकरणातील केजरीवाल हे असेच वागले होते असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आप नेते वाल्मिकी नायक यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदे सांगितले की, मुख्यमंत्री निवडणुकीच्या प्रचारात मुद्द्याचे सोडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर खासगी आरोप करत आहेत. दिल्लीची जनता त्यांचा या भूलथापांना बळी पडणार नाही. मुख्यमंत्री सावंत यांनी विकासावर बोलावे. दिल्लीचा किती विकास झाला आहे हे लोकांना माहिती आहे, असेही ते म्हणाले. यावेळी अॅड. सुरेल तिळवे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी गोव्याच्या विकासावर बोलावे. तसेच भाजपने दिल्लीवासीयांसाठी काय केले हे सांगावे. एखाद्या मुख्यमंत्र्यावर चांगले काम करत असल्याने खासगी आरोप करणे चुकीचे आहे, असे सांगून नायक म्हणाले, राज्यात सध्या चोऱ्या, खून अपहरण तसेच अन्य गुन्हेगारी वाढली आहे. पण सरकारचे याच्यावर काही नियंत्रण नाही. मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त आहेत. त्यांना फक्त भाजप दिसत आहे. तर अन्य पक्षाचे नेत्यांना त्यांना जेलमध्ये टाकावे, असे वाटत आहे. पण केजरीवाल निर्दोष असून, ते पुन्हा २ जून रोजी जेलमध्ये जाणार नाहीत, असा विश्वास असल्याचेही नायक यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सिद्धी नाईक प्रकरणावर बोला: पालेकर

पणजी : स्वाती मालीवाल प्रकरणावरून दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करण्याऐवजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाच्या तपासावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी पक्षाचे गोवा प्रमुख अॅड. अमित पालेकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत हे दिल्लीत निवडणुकीचा प्रचार करत आहेत. यावेळी त्यांनी स्वाती मालीवाल प्रकरणी आप नेते केजरीवाल का गप्प आहेत? असा प्रश्न केला होता. खरे तर मुख्यमंत्र्यांना या विषयाची कुठलीही माहिती नाही, अशी टीका त्यांनी केली. अॅड. पालेकर म्हणाले, की मालीवाल प्रकरणावरून आम आदमी पक्षाने यापूर्वीच जाहीर विधान जारी केले आहे. डॉ. सावंत यांनी केजरीवाल यांना या विषयावरून प्रश्न करण्याऐवजी सिद्धी नाईक मृत्यूप्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला यावर गोव्यात आल्यानंतर विधान करावे. त्याचा तपास करण्याचा गोवा पोलिसांना पूर्णपणे अपयश आले आहे. सरकारला महिलांना सुरक्षा पुरवता आलेली नाही. गोवा पोलिसांना सिद्धी मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यात अपयश का आले यावर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतPoliticsराजकारण