शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आप हा महिलाविरोधी पक्ष; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 08:36 IST

मालीवाल प्रकरणावरही भाष्य

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: दिल्ली विरोधीपक्ष म्हणून प्रसिद्ध असलेला आम आदमी पक्ष आता महिलाविरोधी पक्षही बनला असल्याचा आरोप गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, दिल्लीचे लोक विचारत आहेत की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पहिल्या दिवसांपासून स्वाती मालीवाल प्रकरणावर गप्प का आहेत? त्यांनी या विषयी काही तरी स्पष्टीकरण द्यावे. अरविंद केजरीवाल यांचे मौन या प्रकरणाबद्दल सर्व काही सांगते, 'असेही मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे. 'आप' आता दिल्लीविरोधी, महिलाविरोधी पक्ष बनला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल स्वातींवर दबाव आणत असल्याची शंकाही त्यांनी वर्तविली आहे. सोनी मिश्रा प्रकरणातील केजरीवाल हे असेच वागले होते असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आप नेते वाल्मिकी नायक यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदे सांगितले की, मुख्यमंत्री निवडणुकीच्या प्रचारात मुद्द्याचे सोडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर खासगी आरोप करत आहेत. दिल्लीची जनता त्यांचा या भूलथापांना बळी पडणार नाही. मुख्यमंत्री सावंत यांनी विकासावर बोलावे. दिल्लीचा किती विकास झाला आहे हे लोकांना माहिती आहे, असेही ते म्हणाले. यावेळी अॅड. सुरेल तिळवे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी गोव्याच्या विकासावर बोलावे. तसेच भाजपने दिल्लीवासीयांसाठी काय केले हे सांगावे. एखाद्या मुख्यमंत्र्यावर चांगले काम करत असल्याने खासगी आरोप करणे चुकीचे आहे, असे सांगून नायक म्हणाले, राज्यात सध्या चोऱ्या, खून अपहरण तसेच अन्य गुन्हेगारी वाढली आहे. पण सरकारचे याच्यावर काही नियंत्रण नाही. मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त आहेत. त्यांना फक्त भाजप दिसत आहे. तर अन्य पक्षाचे नेत्यांना त्यांना जेलमध्ये टाकावे, असे वाटत आहे. पण केजरीवाल निर्दोष असून, ते पुन्हा २ जून रोजी जेलमध्ये जाणार नाहीत, असा विश्वास असल्याचेही नायक यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सिद्धी नाईक प्रकरणावर बोला: पालेकर

पणजी : स्वाती मालीवाल प्रकरणावरून दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करण्याऐवजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाच्या तपासावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी पक्षाचे गोवा प्रमुख अॅड. अमित पालेकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत हे दिल्लीत निवडणुकीचा प्रचार करत आहेत. यावेळी त्यांनी स्वाती मालीवाल प्रकरणी आप नेते केजरीवाल का गप्प आहेत? असा प्रश्न केला होता. खरे तर मुख्यमंत्र्यांना या विषयाची कुठलीही माहिती नाही, अशी टीका त्यांनी केली. अॅड. पालेकर म्हणाले, की मालीवाल प्रकरणावरून आम आदमी पक्षाने यापूर्वीच जाहीर विधान जारी केले आहे. डॉ. सावंत यांनी केजरीवाल यांना या विषयावरून प्रश्न करण्याऐवजी सिद्धी नाईक मृत्यूप्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला यावर गोव्यात आल्यानंतर विधान करावे. त्याचा तपास करण्याचा गोवा पोलिसांना पूर्णपणे अपयश आले आहे. सरकारला महिलांना सुरक्षा पुरवता आलेली नाही. गोवा पोलिसांना सिद्धी मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यात अपयश का आले यावर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतPoliticsराजकारण