शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'आप'कडून मुख्यमंत्र्यांचे आभार अन् फडणवीसांना टोलाही लगावला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 20:35 IST

युद्धात आणि युद्धजन्य परिस्थितीत शहीद होणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांऐवजी 1 कोटी रुपयांचा मदतनिधी देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. तसेच, शहीद जवानांच्या कुटुंबीयांना 1 कोटींची मदत देण्याचा निर्णय हा कौतुकास्पद असून ही मूळ संकल्पना आपचे नेते अरविंद केजरीवाल यांची असल्याचेही आपने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयासंदर्भातील एक बातमी ट्विटरवर शेअर करुन आपने राजकीय सीमारेषा ओलांडल्याबद्दल आभार, असे म्हटले आहे. 

युद्धात आणि युद्धजन्य परिस्थितीत शहीद होणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांऐवजी 1 कोटी रुपयांचा मदतनिधी देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. तसेच, देशांतर्गत सुरक्षा करताना शहीद झाल्यास सुरक्षा जवान, निमलष्करी जवान, सैन्यातील जवानांच्या कुटुंबीयांना ही 1 कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. फडणवीस सरकारच्या या निर्णयाचे आम आदमी पक्षांकडून स्वागत करण्यात आले आहे. तसेच, या निर्णयाबद्दल आभारही मानले आहेत. 

आपण राजकीय सीमारेषा ओलांडत जवानांच्या कुटुंबीयांसाठी अरविंद केजरीवाल यांची संकल्पना राबवत हा महत्वपूर्ण निर्णय घेतला. नक्कीच 1 कोटी रुपयांनी शहीदांच्या कुटुबीयांचे दु:ख भरून येणार नाही. मात्र, या कुटुंबीयांच्या भविष्य उज्ज्वल होण्यासाठी मदत होईल. आपले शहीद जवान यासाठी पात्र आहेत, असे ट्विट आम आदमी पक्षाने केले आहे. तसेच, आपकडून एक व्यंगात्मक फोटोही शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये अरविंद केजरीवाल शहीद जवानाच्या कुटुबीयांकडे 1 कोटी रुपयांचा चेक देत आहेत. तर बाजुलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाहून आता आम्हीही शहिदांच्या कुटुंबीयास 1 कोटींची मदत देणार, असे म्हणत असल्याचे लिहिले आहेत. तसेच, कहाँ था ना हम राजनिधी बदलने आये है! असेही आपच्या या ट्विटमध्ये लिहिले आहे.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्रीAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल