शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

‘आप’ सरकारमुळे निर्भयाच्या दोषींना फाशीस विलंब -जावडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 02:31 IST

सर्वोच्च न्यायालयाने अर्ज फेटाळून लावल्यानंतर आप सरकारने दोषींना आठवड्याभरात नोटिसा द्यायला हव्या होत्या. तसे झाले असते, तर या आरोपींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेची याआधीच अंमलबजावणी झाली असती.

नवी दिल्ली : दिल्लीतील ‘आप’ सरकारच्या निष्काळजीमुळेच निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्यास विलंब होत आहे, असा आरोप माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. फाशीची शिक्षा रद्द करण्याचा आरोपींचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने २०१७ साली फेटाळून लावला. त्यानंतर या आरोपींना नोटीस देण्यास आप सरकारने अडीच वर्षे लावली, असेही त्यांनी सांगितले.

जावडेकर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने अर्ज फेटाळून लावल्यानंतर आप सरकारने दोषींना आठवड्याभरात नोटिसा द्यायला हव्या होत्या. तसे झाले असते, तर या आरोपींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेची याआधीच अंमलबजावणी झाली असती. दिल्लीमध्ये १९८४ साली शीखविरोधी दंगल घडविणाऱ्यांना काँग्रेसने पाठीशी घातले, असा आरोप प्रकाश जावडेकर यांनी एसआयटी अहवालाच्या आधारे केला आहे. ते म्हणाले की, या दंगलीमध्ये बळी पडलेल्यांच्या वारसदारांना न्याय मिळावा म्हणून काँग्रेसने काहीही केले नाही. दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस.एन. धिंग्रा हे प्रमुख असलेल्या एसआयटी पथकाने शीखविरोधी दंगलीचा तपास करून अहवाल सादर केला होता. ही केवळ दंगल नव्हती, तर शिखांचे अत्यंत निर्घृणरीत्या केलेले हत्याकांड होते.एकाचा अर्ज फेटाळला२०१२ साली दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींपैकी मुकेश सिंह याने केलेला दयेचा अर्ज फेटाळण्याची शिफारस दिल्ली सरकारने बुधवारी केली. ती शिफारस तातडीने नायब राज्यपालांकडे पाठविण्यात आली, असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले. मुकेश सिंह याने दयेचा अर्ज केला असल्याने या आरोपींना २२ जानेवारी रोजी फाशी देता येणार नाही, असे आप सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला याआधी सांगितले होते. मुकेश सिंह, विनय शर्मा, अक्षयकुमार सिंह, पवन गुप्ता, अशी या चार आरोपींची नावे आहेत.

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपBJPभाजपाAAPआप