शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

तुमच्या ५५ जागा येणार आहेत तर उमेदवारांना फोन करायची काय गरज?; भाजपवर भडकले अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 22:51 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Arvind Kejriwal on Delhi Exit Polls: दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी बुधवारी मतदान पार पडलं. दिल्ली निवडणुकीचे ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहेत. भाजपला ११ पैकी नऊ एक्झिट पोलमध्ये बहुमत मिळण्याची अपेक्षा आहे. तर दोन एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्ष सत्तेत येणार असल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे आता एक्झिट पोलनुसार २७ वर्षांनंतर भाजप दिल्लीत सत्तेत परतण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आपचे प्रमुख आणि माझी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर मोठा आरोप करत आमच्या उमेदवारांना सतत फोन येत असल्याचे म्हटलं आहे.

दिल्ली विधानसभेच्या सर्व ७० जागांवर मतदान झाल्यानंतर विविध यंत्रणांच्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजप सरकार स्थापन करेल असे म्हटलं जात आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो. मात्र आम आदमी पक्षाने बुधवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोलचे आकडे नाकारले होते. सर्वेक्षण करणाऱ्यांनी आमच्या कामगिरीला कमी लेखले आहे, असं आपने म्हटलं होतं. त्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांनी एक्झिट पोलवर भाष्य केलं.

दिल्लीत मतदान झाल्यानंतर आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पक्षाकडून सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यात येत आहे. अशातच अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर मोठा आरोप करत आमच्या उमेदवारांना सतत फोन येत असल्याचे सांगितले. आमच्या उमेदवारांना आम आदमी पक्ष सोडून त्यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी १५ कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे अरविंद केजरीवाल म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्ष दिल्लीत निवडणूक लढविणाऱ्या आमच्या पक्षाच्या उमेदवारांना फोन करून कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवत असल्याचा आरोप केला.

"शिव्या देणाऱ्या पक्षाला ५५ पेक्षा जास्त जागा मिळत असल्याचे काही एजन्सी दाखवत आहेत. गेल्या दोन तासांत आमच्या १६ उमेदवारांना 'आप' सोडून त्यांच्या पक्षात जाण्यास सांगणारे फोन आले आहेत. आम्ही तुम्हाला मंत्री बनवू आणि प्रत्येकी १५ कोटी रुपये देऊ असं त्यांना सागण्यात येत आहे," असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

"त्यांच्या पक्षाला ५५ पेक्षा जास्त जागा मिळणार असतील तर आमचे उमेदवार बोलवायची काय गरज आहे? वातावरण निर्माण करून काही उमेदवारांना पराभूत व्हावे, यासाठी बनावट सर्वेक्षण करण्यात आले आहे. पण तुम्ही शिव्या द्या, आमचा एकही उमेदवार फुटणार नाही," असंही अरविंद केजरीवाल म्हणाले.

दरम्यान, आपचे खासदार संजय सिंह यांनी दावा केला की पक्षाच्या सात आमदारांना भाजपकडून फोन आले आहेत, ज्यांनी त्यांना आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये सामील होण्यासाठी १५ कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. आम्ही आमदारांना असे ऑडिओ कॉल रेकॉर्ड करण्यास आणि त्याबद्दल तक्रार करण्यास सांगितले आहे. कुणी भेटले तर त्याचा छुप्या कॅमेऱ्याने व्हिडिओ बनवण्यास सांगितले आहे. मतमोजणीपूर्वीच भाजपने आपला पराभव मान्य केला असून देशाच्या इतर भागांप्रमाणे दिल्लीतही भाजपने पक्ष फोडण्याचे राजकारण सुरू केले आहे.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपा