शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

भाजपाची हिंदू-मुस्लिम राजकारण करण्याची हिंमत नाही - केजरीवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 09:55 IST

दिल्लीतील सदर बाजारमध्ये आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. दिल्लीत भाजपामध्ये हिंदू-मुस्लिम राजकारण करण्याची हिंमत नाही आहे, कारण आम आदमी पार्टीने आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे राजकीय चर्चेची दिशा बदलली आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. तसेच, आपल्या सरकारद्वारे करण्यात आलेल्या कामांचे कौतुक करत, पुढील वर्षी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आम आदमी पार्टीला मतदान करतील, असाही दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

दिल्लीतील सदर बाजारमध्ये आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले, " भाजपाजवळ दिल्लीत हिंदू-मुस्लिम राजकारण करण्याची हिंमत नाही आहे, कारण आम्ही देशाच्या राजकारणाची दिशा बदलली असून आरोग्य आणि शिक्षण याकडे लक्ष दिले आहे. आम्ही भाजपाला आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यांवर चर्चा करण्यास मजबूर केले आहे. ही मोठी बाब आहे." याचबरोबर, दिल्लीतील प्रत्येक नागरिकाला दिल्ली सरकारकडून लागू करण्यात आलेल्या योजनांचा लाभ मिळत असल्याचेही यावेळी अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. 

दरम्यान, दिल्ली सरकारने आपल्या हद्दीतील सर्वच रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवण्याचा निर्णय घेतला असून प्रत्येक रस्त्याचे आज रिडिझायनिंग सुरू करण्यात आले आहे. त्यातील नऊ रस्त्यांचा पहिला पायलट प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.  यावेळी ते म्हणाले, "दिल्ली सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत एकूण 1260 किमीचे रस्ते येत आहेत. या सर्व रस्त्यांची फेर आखणी केली जात आहे. त्याद्वारे वाहतूक कोंडीच्या प्रश्‍नावरही उकल साधली जाईल. पायलट प्रकल्पात 45 किमी अंतराचे जे नऊ रस्ते नव्याने आखले जाणार आहेत, त्याचे काम येत्या वर्षभरात पूर्ण होईल. कामासाठी चारशे कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. तसेच, फुटपाथही मोठे केले जाणार असून या रस्त्यांवर अपंगांसाठीही स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे." 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीBJPभाजपा