शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

Arvind Kejriwal : "सरकार पाडण्यासाठी 6300 कोटी खर्च केले नसते तर महागाईचा सामना करावा लागला नसता"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 12:58 IST

AAP Arvind Kejriwal And Modi Government : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महागाईवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

नवी दिल्ली - केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लावल्यानंतर अन्नपदार्थांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. रोज लागणारे पीठ, डाळ, तांदूळ आणि साखर यांच्या किमतींत वाढ पाहायला मिळाली आहे. यामुळे सामान्य नागरिकांचा खिसा दिवसेंदिवस रिकामा होत आहे. व्यापाऱ्यांनी सामान्यत: सध्या सुरू असलेल्या पावसामुळे डाळ, साखर, तांदूळ यांच्या किमतींत वाढ होते. मात्र आता जीएसटी लावल्याने आणि त्यानंतर मूळ किमतीत वाढ केल्याने वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे असं म्हटलं आहे. याच दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महागाईवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"सरकार पाडण्यासाठी 6 हजार 300 कोटी खर्च केले नसते तर महागाईचा सामना करावा लागला नसता" असं म्हणत निशाणा साधला आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "गहू, तांदुळ, दही, ताक, मधावर लादण्यात आलेल्या जीएसटीतून सरकारला वर्षाकाठी 7 हजार 500 कोटींचा महसूल मिळणार आहे. तर आत्तापर्यंत सरकार पाडण्यासाठी सरकारने 6 हजार 300 कोटींचा खर्च केला आहे. सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला नसता तर जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लादण्याची वेळ आली नसती. जनतेला महागाईचा सामना करावा लागला नसता" असं केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

"गरिबांच्या जेवणावर टॅक्स आणि श्रीमंतांचं 5 लाख कोटींचं कर्ज माफ"

अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर याआधी देखील टीकास्त्र सोडलं आहे. "गरिबांच्या जेवणावर टॅक्स आणि श्रीमंतांचं 5 लाख कोटींचं कर्ज माफ" असं म्हणत निशाणा साधला होता. केंद्राने पेन्शन सुविधा बंद करण्यासाठी अग्निवीर योजनेची सुरुवात केली. केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग आणण्यासाठी देखील मनाई केली. तसेच मनरेगासाठी पैसे नसल्याचं म्हटलं असल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केली होती. 

"पहिल्यांदा तांदूळ-गव्हावर टॅक्स लावण्यात आला"

अरविंद केजरीवाल यांनी "पहिल्यांदा तांदूळ-गव्हावर टॅक्स लावण्यात आला. कोणत्याच सरकारने याआधी असं क्रूर पाऊल उचललं नाही. केंद्र सरकारची अशी काय अवस्था झाली? सरकारी शाळेत फी घेतली गेली तर अर्ध्याहून अधिक मुलं निरक्षर राहतील. गरीब माणसं कुठून आणतील पैसे? उपचारासाठी काय करणार?, केंद्र सरकारचा हा सगळा पैसे नेमका जातो कुठे?... यांनी सरकारी पैशांनी आपल्या मित्रांची कोट्यवधी रुपयांची कर्ज माफ केली आहेत. कर्ज माफ नसतं केलं तर देशाची अशी अवस्था झाली नसती" असं म्हणत मोदी सरकारवर टीका केली होती. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीGSTजीएसटी