शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

देशाचे पंतप्रधान शिक्षित असते तर...; केजरीवालांचा मोदींवर हल्लाबोल, बोचऱ्या शब्दात केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 19:00 IST

"कमी शिकलेला पंतप्रधान असेल तर कुणीही मूर्ख बनवेल..."

दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मध्य प्रदेशात निवडणुकीचा शंखनाद केला आहे. 'आप'ला पर्याय म्हणून समोर ठेवत केजरीवाल यांनी राज्यातील जनतेला एक संधी देण्याचे आवाहन केले. सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांच्या अटकेवरून केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही हल्ला चढवला. 'ज्या दिवशी मनीष सिसोदिया यांना अटक झाली, त्याच दिवशी देशाचा पंतप्रधान शिक्षित असावा, असे वाटले. पंतप्रधान कमी शिक्षित असल्यास कुणीही मूर्ख बनवू शकते, असे अरविंद केजरीवाल म्हणाले, ते राजधानी भोपाळमध्ये मंगळवारी आयोजित कार्यकर्ता सम्मेलनाला बोलत होते.

केजरीवाल म्हणाले, "पंतप्रधानांनी मनीष सिसोदिया यांना जेलमध्ये पाठवले. त्याच दिवशी मला वाटले की, देशाचा पंतप्रधान शिक्षित असायला हवा. देशाचे पंतप्रधान शिक्षित असते तर त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळले असते. देशाचे पंतप्रधान देशभक्त असते, तर सोसोदिया हे आम आदमी पक्षाचे आहेत की, इतर कुठल्या पक्षाचे, असा विचार त्यांनी केला नसता. त्यांनी मनीष सिसोदिया सारख्या व्यक्तीला देशाचे शिक्षण मंत्री बनवले असते आणि देशातील 10 लाख शाळा व्यवस्थित करायला सांगितले असते. पण त्यांनी सिसोदिया यांना तुरुंगात टाकले."

'आप' संयोजक केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवताना अतिशय बोचऱ्या शब्दांचा वापर केला. केजरीवाल म्हणाले, 'कमी शिकलेला पंतप्रधान असेल तर कुणीही मूर्ख बनवेल. कुणीतरी येऊन म्हणेल, साहेब, नोटाबंदी करा, भ्रष्टाचार संपेल. आता कमी शिकलेला पंतप्रधान असेल तर, त्यांना समज नाही, नोटाबंदी केली, भ्रष्टाचार संपला? कुणी येऊन म्हणेल की नोटाबंदीने दहशतवाद संपुष्टात येईल, काय झाले? संपूर्ण देश रांगेत उभा राहिला. संपूर्ण देश उद्ध्वस्त झाला. ना भ्रष्टाचार संपला ना दहशतवाद. कुणी म्हणेल सर्वांना थाळी वाजवायला सांगा, कोरोना संपुष्टात येईल. संपूर्ण देशाला थाळी वाजवायला सांगितले. म्हणूनच मी म्हणतो की देशाचा पंतप्रधान शिक्षित असायला हवा.'

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीArvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीMadhya Pradeshमध्य प्रदेश