शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

“अरविंद केजरीवालांनी दिल्लीला जागतिक स्तरावर नेले, INDIA मुळे भाजपचा पराभव निश्चित”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 17:26 IST

AAP Vs BJP: दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात लोकसभेत सादर केलेल्या विधेयकावर बोलताना अमित शाह यांनी आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली.

AAP Vs BJP: दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात केंद्र सरकार एक अध्यादेश आणत आहे. या अध्यादेशाला आम आदमी पक्षाने कडाडून विरोध केला असून, देशभरातील विरोधी पक्षांना या विधेयकाविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले. या विधेयकावर बोलताना अमित शाह यांनी आम आदमी पक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. याला आम आदमी पक्षाने प्रत्युत्तर दिले. 

अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात केंद्र सरकार नॅशनल कॅपिटल सिव्हील सर्विसेस ॲथॉरिटीचे गठन करणार आहे. या अधिकार समितीत दिल्लीचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि प्रधान गृह सचिव असतील. ही अधिकार समिती पोस्टिंग, बदल्यासंदर्भात शिफारस करून उपराज्यपालांकडे पाठवेल. त्यावर उपराज्यपाल निर्णय घेतील. अध्यादेशावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत भूमिका मांडली. यावर आम आदमी पक्षाने प्रत्युत्तर दिले. 

INDIA मुळे भाजपचा पराभव

अमित शाह दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळू शकत नाहीत. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीला 'वर्ल्ड क्लास' बनवले आहे. जागतिक स्तरावर नेले आहे. भाजपला 'इंडिया' नावाची भीती वाटते आणि २०२४ मध्ये पक्षाचा पराभव होईल. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले अमित शाह हे केजरीवाल सरकारचे ध्येय सेवा नसल्याचे सांगत आहेत, असा पलटवार आम आदमी पक्षाचे खासदार सुशील गुप्ता यांनी केला. 

नेमके काय म्हणाले अमित शाह? 

पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनीही दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यास विरोध केला होता. दिल्लीबाबत कायदे करण्याचा पूर्ण अधिकार केंद्राला आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांना सांगू इच्छितो की, तुम्ही तुमच्या मनाला जे पटते, तेच वाचले आहे. तुम्ही सर्व बाबी निःपक्षपातीपणे सभागृहासमोर ठेवाव्यात. सन २०१५ मध्ये असा पक्ष दिल्लीत सत्तेवर आला, ज्याचे उद्दिष्ट फक्त लढणे होते, सेवा करणे नाही. त्यांची अडचण ट्रान्सफर पोस्टिंगचे अधिकार मिळण्याची नाही, तर आपले बंगले बांधण्यासारखा भ्रष्टाचार लपविण्यासाठी आणि दक्षता विभागाला आपल्या बाजूने करण्याची आहे. मी सर्व पक्षांना विनंती करतो की, निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्याचे राजकारण करू नये. देशाच्या भल्यासाठी विधेयके आणि कायदे आणले जातात, त्यामुळे दिल्लीच्या भल्यासाठी विरोध करणे योग्य नाही, असे अमित शाह यांनी स्पष्टपणे नमूद केले. 

 

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीAmit Shahअमित शाहMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनArvind Kejriwalअरविंद केजरीवाल