शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

Arvind Kejriwal: माझ्या फक्त पाच मागण्या मान्य करा, मी राजकारण सोडेन; अरविंद केजरीवाल यांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 15:24 IST

अरविंद केजरीवाल यांनी इतर विरोधी पक्षांसह भाजपवर निशाणा साधला.

आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल रविवारी हरयाणातील जींद दौऱ्यावर होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ते मोर्चेबांधणी करत आहेत. त्यांनी जींद येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. केजरीवाल यांनी यावेळी इतर विरोधी पक्षांसह भाजपवर निशाणा साधला. याशिवाय सरकारने माझ्या पाच मागण्या मान्य केल्यास राजकारण सोडेन असे आव्हान दिले. केजरीवाल यांच्या पाच मागण्यांमध्ये चांगले शिक्षण, उपचार, कमी महागाई, रोजगार आणि गरिबांना मोफत वीज यांचा समावेश आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसह पंजाबचे मुख्यमंत्री देखील मंचावर उपस्थित होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, माझ्या पाच मागण्या आहेत, या केवळ माझ्याच नाहीत तर १४० कोटी देशवासियांच्या मागण्या आहेत. माझ्या पाच मागण्या पूर्ण करा, मी राजकारण सोडेन. मी इथे सत्तेसाठी आलो नाही, मी मंत्री किंवा मुख्यमंत्री बनण्यासाठी आलो नाही आणि पैसा कमावण्यासाठीही आलो नाही. मी १४० कोटी जनतेच्या वतीने जिंदच्या व्यासपीठावरून ही मागणी करत आहे.

केजरीवाल यांच्या पाच प्रमुख मागण्या 

  1. देशातील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करा, सर्वांना समान शिक्षण द्या.
  2. प्रत्येक नागरिकासाठी चांगल्या उपचाराची व्यवस्था करा.
  3. महागाई कमी करा, आम्ही दिल्ली आणि पंजाबमध्ये हे करून दाखवले आहे.
  4. प्रत्येक हाताला, तरूणाराला रोजगार उपलब्ध करून द्या.
  5. गरिबांना मोफत वीज द्या, सर्वांना २४ तास वीज द्या.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ईडी-सीबीआय आणि दिल्ली पोलीस माझ्या मागे लागले आहेत जणू काय मी दहशतवादी आहे. मी दहशतवादी नाही, हे दहशतवादी आहेत ज्यांनी प्रत्येक घरात महागाईची दहशत पसरवली आहे. आज उपचार घेणे किती महाग झाले आहे. पेट्रोल आणि डिझेल महागले कारण तेल कंपन्या त्यांचे मित्र चालवत आहेत. आज वीज महाग आहे कारण ती वीज कंपन्यांच्या आदेशानुसार आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपा