शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

“आमचा अजेंडा बाकीच्या पक्षांनी चोरला”; अरविंद केजरीवालांची BJP-काँग्रेसवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 19:03 IST

Arvind Kejriwal News: मनिष सिसोदिया यांनी भाजपशी हातमिळवणी केली तर ते उद्या बाहेर येतील. मात्र, ते देशाशी तडजोड करणार नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

Arvind Kejriwal News: देशभरात अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी काँग्रेसवर टीका केली आहे. यातच आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विरोधकांवर टीका केली आहे. 

आम आदमी पक्षाच्या कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, गॅरेंटी हा शब्दप्रयोग आम्हीच सुरू केला होता. केजरीवाल यांची गॅरेंटी आहे, असे सांगत जनतेला आश्वासने दिली होती. मात्र, आता अन्य पक्षांकडून याचा वापर केला जातो. जाहीरनामा, संकल्प पत्र गायब झाले, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली. 

७५ वर्षापासून काँग्रेसने देशाला अशिक्षित ठेवले

अन्य पक्ष अनेक गोष्टी मोफत देण्याबाबत प्रचार करतात. मात्र शिक्षणाबाबत कोणी बोलत नाही. आमचा पक्ष शिक्षणावर भर देत आहे. काँग्रेस असो वा भाजप असो, कोणताही पक्ष तुमच्या मुलांसाठी शाळा बांधू, असे सांगत नाही. गेल्या ७५ वर्षांपासून मुद्दामहून काँग्रेसने देशाला अशिक्षित ठेवले. गेल्या ७ वर्षांत आम आदमी पक्षाच्या सरकारने २ कोटींना चांगले शिक्षण दिले. आम आदमी पक्ष असे करू शकतो, तर काँग्रेसला ७५ वर्षांत १४० कोटी जनतेला शिक्षण देणे शक्य नव्हते का, अशी विचारणा केजरीवाल यांनी केली.

दरम्यान, मनिष सिसोदिया यांची पत्नी आजारी आहे, त्यांचा मुलगा कॅनडामध्ये शिकतो. तरीही त्यांना १० महिने तुरुंगात ठेवले. मनिष सिसोदिया यांनी भाजपशी हातमिळवणी केली तर ते उद्या बाहेर येतील. मनिष सिसोदिया हे भगतसिंग आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे शिष्य आहेत, ते मरण पत्करतील. परंतु, देशाशी तडजोड करणार नाहीत, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला. 

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीAAPआप