शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

परदेशातील भारतीयांच्या लग्नासाठी आता आधार कार्ड होणार गरजेचं !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 18:22 IST

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला एका तज्ज्ञांच्या समितीनं परदेशात राहणा-या भारतीय लोकांच्या लग्नासाठी आधार कार्ड गरजेचं करण्याची शिफारस केली आहे. परदेशात राहणा-या जोडप्याच्या लग्नाची नोंदणी भारतात होण्यासाठी आधार अनिवार्य करण्याची मागणी करण्यात आली आहे. पती व पत्नीमध्ये कोणताही वादविवाद झाल्यास प्रकरण योग्यरीत्या हाताळण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीनं ही शिफारस केली आहे.

नवी दिल्ली, दि. 14 - भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला एका तज्ज्ञांच्या समितीनं परदेशात राहणा-या भारतीय लोकांच्या लग्नासाठी आधार कार्ड गरजेचं करण्याची शिफारस केली आहे. परदेशात राहणा-या जोडप्याच्या लग्नाची नोंदणी भारतात होण्यासाठी आधार अनिवार्य करण्याची मागणी करण्यात आली आहे. पती व पत्नीमध्ये कोणताही वादविवाद झाल्यास प्रकरण योग्यरीत्या हाताळण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीनं ही शिफारस केली आहे.परदेशात एनआरआय पतींकडून भारतीय महिलांचा छळ होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. तसेच महिला घरगुती हिंसाचाराच्याही शिकार होत आहेत. आधार सक्तीचे केल्यास अशा महिलांना त्यांचे अधिकार मिळणार आहेत. त्यामुळेच तज्ज्ञांच्या विशेष समितीनं हा प्रस्ताव ठेवला आहे. यासंदर्भात 30 ऑगस्ट रोजी परराष्ट्र मंत्रालयात एक रिपोर्टही जमा करण्यात आली आहे. तसेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचं यासाठी एक धोरण बनवण्याच्या दिशेनं काम सुरू आहे. ते धोरण अंमलात आल्यास परदेशात घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरणा-या महिलांना न्याय मिळणार आहे. या धोरणानुसार घरगुती हिंसा करणा-या पतीला प्रत्यार्पण करून भारताल्या तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. परदेशातील व्यक्तीशी लग्न केल्यानंतर छळणुकीच्या प्रकरणात आरोपीला थांगपत्ता लावण्यासाठीही तारेवरची कसरत करावी लागते. परदेशातील पतीचा पत्ता नसल्यामुळे त्यांना नोटीस पाठवण्यातही अडचणी येतात. 

शासन नियमानुसार 30 दिवसांच्या आत लग्नाची नोंदणी करणं आवश्यक असतं. या नियमांचं पालन काटेकोरपणे केलं जात नाही. मात्र आता तुम्हाला विवाह नोंदणी करण्याशिवाय गत्यंतर नाही. लग्न झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत विवाह नोंदणी करणे लवकरच बंधनकारक करण्यात येणार असून, या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच विवाह नोंदणी करण्यास टाळाटाळ करणा-यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे.

कायदा आयोगाने याबाबत केंद्र सरकारला दिलेल्या अहवालामध्ये विवाह नोंदणी बंधनकारक करण्याची मागणी केलीय. त्याप्रमाणेच कोणत्याही ठोस कारणांशिवाय विवाह नोंदणीमध्ये उशीर झाला, तर प्रतिदिन 5 रुपये दंड आकारला जाण्याचीही शक्यता आहे. रिपोर्टनुसार वेळेत विवाह नोंदणी न केल्यास प्रतिदिन कमीत कमी 5 रुपये आणि जास्तीत जास्त 100 रुपये दंड आकारण्याचं प्रस्तावित आहे. विवाह नोंदणी बंधनकारक केल्यानं जबरदस्ती होणारे विवाह आणि बालविवाह रोखण्यासाठी मदत होणार असल्याचाही कायदा आयोगाचा कयास आहे. त्याप्रमाणेच लैंगिक समानता आणि महिलांच्या सशक्तीकरणाला मदत मिळणार असल्याचंही कायदा आयोगानं स्पष्ट केलं आहे.