शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

परदेशातील भारतीयांच्या लग्नासाठी आता आधार कार्ड होणार गरजेचं !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 18:22 IST

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला एका तज्ज्ञांच्या समितीनं परदेशात राहणा-या भारतीय लोकांच्या लग्नासाठी आधार कार्ड गरजेचं करण्याची शिफारस केली आहे. परदेशात राहणा-या जोडप्याच्या लग्नाची नोंदणी भारतात होण्यासाठी आधार अनिवार्य करण्याची मागणी करण्यात आली आहे. पती व पत्नीमध्ये कोणताही वादविवाद झाल्यास प्रकरण योग्यरीत्या हाताळण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीनं ही शिफारस केली आहे.

नवी दिल्ली, दि. 14 - भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला एका तज्ज्ञांच्या समितीनं परदेशात राहणा-या भारतीय लोकांच्या लग्नासाठी आधार कार्ड गरजेचं करण्याची शिफारस केली आहे. परदेशात राहणा-या जोडप्याच्या लग्नाची नोंदणी भारतात होण्यासाठी आधार अनिवार्य करण्याची मागणी करण्यात आली आहे. पती व पत्नीमध्ये कोणताही वादविवाद झाल्यास प्रकरण योग्यरीत्या हाताळण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीनं ही शिफारस केली आहे.परदेशात एनआरआय पतींकडून भारतीय महिलांचा छळ होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. तसेच महिला घरगुती हिंसाचाराच्याही शिकार होत आहेत. आधार सक्तीचे केल्यास अशा महिलांना त्यांचे अधिकार मिळणार आहेत. त्यामुळेच तज्ज्ञांच्या विशेष समितीनं हा प्रस्ताव ठेवला आहे. यासंदर्भात 30 ऑगस्ट रोजी परराष्ट्र मंत्रालयात एक रिपोर्टही जमा करण्यात आली आहे. तसेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचं यासाठी एक धोरण बनवण्याच्या दिशेनं काम सुरू आहे. ते धोरण अंमलात आल्यास परदेशात घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरणा-या महिलांना न्याय मिळणार आहे. या धोरणानुसार घरगुती हिंसा करणा-या पतीला प्रत्यार्पण करून भारताल्या तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. परदेशातील व्यक्तीशी लग्न केल्यानंतर छळणुकीच्या प्रकरणात आरोपीला थांगपत्ता लावण्यासाठीही तारेवरची कसरत करावी लागते. परदेशातील पतीचा पत्ता नसल्यामुळे त्यांना नोटीस पाठवण्यातही अडचणी येतात. 

शासन नियमानुसार 30 दिवसांच्या आत लग्नाची नोंदणी करणं आवश्यक असतं. या नियमांचं पालन काटेकोरपणे केलं जात नाही. मात्र आता तुम्हाला विवाह नोंदणी करण्याशिवाय गत्यंतर नाही. लग्न झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत विवाह नोंदणी करणे लवकरच बंधनकारक करण्यात येणार असून, या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच विवाह नोंदणी करण्यास टाळाटाळ करणा-यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे.

कायदा आयोगाने याबाबत केंद्र सरकारला दिलेल्या अहवालामध्ये विवाह नोंदणी बंधनकारक करण्याची मागणी केलीय. त्याप्रमाणेच कोणत्याही ठोस कारणांशिवाय विवाह नोंदणीमध्ये उशीर झाला, तर प्रतिदिन 5 रुपये दंड आकारला जाण्याचीही शक्यता आहे. रिपोर्टनुसार वेळेत विवाह नोंदणी न केल्यास प्रतिदिन कमीत कमी 5 रुपये आणि जास्तीत जास्त 100 रुपये दंड आकारण्याचं प्रस्तावित आहे. विवाह नोंदणी बंधनकारक केल्यानं जबरदस्ती होणारे विवाह आणि बालविवाह रोखण्यासाठी मदत होणार असल्याचाही कायदा आयोगाचा कयास आहे. त्याप्रमाणेच लैंगिक समानता आणि महिलांच्या सशक्तीकरणाला मदत मिळणार असल्याचंही कायदा आयोगानं स्पष्ट केलं आहे.