शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

नेपाळ, भूतानला जाताना सोबत बाळगा आधार कार्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 05:57 IST

भारतातील १५ वर्षांखालील व ६५ वर्षांहून अधिक वयाचे नागरिक नेपाळ व भूतानला जाताना आधार कार्डचा वैध दस्तावेज म्हणून वापर करू शकतील.

नवी दिल्ली : भारतातील १५ वर्षांखालील व ६५ वर्षांहून अधिक वयाचे नागरिक नेपाळ व भूतानला जाताना आधार कार्डचा वैध दस्तावेज म्हणून वापर करू शकतील. ही माहिती केंद्रीय गृह खात्याने दिली. याव्यतिरिक्तच्या वयोगटातील नागरिकांना या दोन्ही देशात जाताना आधार कार्डचा वापर करता येणार नाही. भारतीयांकडे वैध पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र किंवा रेशन कार्ड असल्यास त्यांना नेपाळ, भूतानमध्ये विनासायास प्रवेश मिळतो. त्यासाठी तेथील व्हिसा काढण्याची गरज नसते. याआधी १५ वर्षांखालील व ६५ वर्षांवरील भारतीयांनी आपले पॅन कार्ड, वाहनचालक परवाना, केंद्रीय आरोग्य सेवा (सीजीएचएस) हे संबंधित अधिकाऱ्यांना दाखविल्यानंतर त्यांना या देशांना भेट देता येत असे. मात्र, त्यावेळी वैध दस्तावेजांच्या यादीत आधारचा समावेश दोन्ही देशांनी केलेला नव्हता.।काही प्रसंगी चालतात ही कागदपत्रेभारतीय नागरिकाला काठमांडू येथील भारतीय दूतावासाने दिलेले नोंदणी प्रमाणपत्र हे नेपाळला भेट देण्याकरिता वैध दस्तावेज समजले जाणार नाहीत. मात्र, आपत्कालीन स्थितीत या दूतावासाने दिलेले प्रमाणपत्र किंवा ओळख प्रमाणपत्र नेपाळमधून भारतात परतताना चालू शकेल; पण ही मुभा एकाच वेळच्या प्रवासासाठी आहे.शाळेचे मुख्याध्यापक किंवा महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी ठराविक नमुन्यात भरून ओळख प्रमाणपत्र सोबत असल्यास १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना नेपाळ, भूतानमध्ये प्रवेश दिला जातो.या देशांत जाणाºया एखाद्या कुटुंबातील सर्वांनीच वैध दस्तावेज सोबत बाळगायला हवेत याची आवश्यकता नाही. त्यांच्यासोबत असलेल्या प्रमुख व्यक्तीकडे पासपोर्ट किंवा निवडणूक ओळखपत्र असेल तर त्यांची तपासणी होऊन या सर्वांना देशात प्रवेश दिला जातो.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड