शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 17:27 IST

Election Commission Supreme Court Bihar Voter List: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वीच बोगस मतदारांवरून गदारोळ उठला आहे. आता निवडणूक आयोगाने पडताळणी कार्यक्रम हाती घेतला आहे.

Election Commission Supreme Court Bihar Voter List News: काम खासगी असो वा सरकारी... प्रश्न शासकीय योजनेचा लाभ घेण्याचा असो इतर काही... प्रत्येक ठिकाणी महत्त्वाचा पुरावा म्हणून स्वीकारले जाणारे आधार कार्ड वा रेशन कार्ड विश्वसनीय कागदपत्रे नसल्याचा धक्कादायक दावा निवडणूक आयोगाने केला आहे. बिहारमध्ये मतदार यादी पडताळणीसाठी आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड स्वीकारण नसल्याचे आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या बिहारमध्ये बोगस मतदारांवरून गदारोळ सुरू आहे. परराज्यातील आणि परदेशातील नागरिकांची नावे मतदार यांद्यामध्ये आढळल्यानंतर निवडणूक आयोगाने मतदार यांद्याच्या पडताळणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. पण, लोकांना मतदार म्हणून वैध असल्याचे सिद्ध करण्यासाठी वेगवेगळी दहा प्रकारची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. 

निवडणूक आयोगाने शपथपत्रात काय म्हटले आहे?

लोकप्रतिनिधी कायदा १९५० मधील नियम २१ (३) नुसार मतदान ओळखपत्र हे दुरुस्ती प्रक्रिया आणि मतदार यादीत मतदारांच्या नावावर आधारित आहे. मतदान ओळखपत्र सुधारणांच्या कक्षेते येते. त्यामुळे बिहारमध्ये मतदार याद्यांची पडताळणी करताना मतदान ओळखपत्र वैध पुरावा म्हणून स्वीकारले जाणार नाही, असे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. 

आधार कार्ड व्यक्तीचे नागरिकत्व सिद्ध करू शकत नाही आणि ते फक्त व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा आहे. आधार क्रमांक नागरिकत्व प्रदान करत नाही, असे आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने रेशन कार्ड अर्था शिक्षा पत्रिकाही रहिवासाचा पुरावा म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे. रेशन कार्ड बोगस असू शकते असे सांगताना आयोगाने केंद्र सरकारने ५ कोटी बोगस रेशन कार्ड रद्द केल्याचा वृत्ताचा हवाला दिला आहे. 

बिहारच्या मतदारांना कोणती कागदपत्रे सादर करावी लागणार

निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या पडताळणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यासाठी नागरिकांना बिहारचे नागरिक असल्याचे सिद्ध करण्यासाठी जन्माचा दाखला, जात प्रमाणपत्र, निवृत्तिवेतनाची पावती, पासपोर्ट, दहावी किंवा पदवी प्रमाणपत्र, विमा अथवा गुंतवणूक केल्यासंदर्भातील प्रमाणपत्र, कायमचा निवासी दाखला, जंगल वहिवाट दाखला, स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिका यातील घराची नोंद, घर अथवा अन्य मालमत्तेचा कर भरल्याचे प्रमाणपत्र यापैकी एक कागदपत्रे द्यावे लागणार आहे. 

टॅग्स :BiharबिहारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSupreme Courtसर्वोच्च न्यायालयVotingमतदान