शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

अबब ! २०१४ लोकसभा निवडणुकीत 'नोटा'ला ६० लाख मते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 11:41 IST

२०१४ मध्ये नोटाला तामिळनाडूमधून निलगिरी मतदार संघातून सर्वाधिक ४६ हजार ५५९ मते मिळाली होती. तर सर्वात कमी १२३ मते लक्षद्विप मतदार संघात पडले होते.

मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. विविध पक्ष आणि पक्षांचे उमेदवार प्रचारासाठी गावोगावी फिरत आहेत. मतदानापूर्वी सर्वच पक्ष विविध प्रकारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. आपल्या पक्षाचे जाहिरनामे वाचून दाखवतात. असं असताना देखील अनेक ठिकाणी नोटा अर्थात 'नन ऑफ अबाउ' या पर्यायाचा मतदानात अधिक वापर झाल्याचे २०१४ च्या निवडणुकीत दिसून आले आहे.

गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच 'नन ऑफ अबाउ' या पर्यायाचा वापर करण्यात आला. त्यावेळी ८३.४१ कोटी मतदारांपैकी ५५.३८ कोटी (६६.४ टक्के) मतदारांनी ५४३ मतदार संघांसाठी मतदान केले होते. यापैकी ६० लाख मतदारांनी 'नोटा'चा पर्याय निवडला होता. एकूण मतदारांपैकी याचे प्रमाण १.१ टक्के आहे. २०१४ मध्ये नोटाला तामिळनाडूमधून निलगिरी मतदार संघातून सर्वाधिक ४६ हजार ५५९ मते मिळाली होती. तर सर्वात कमी १२३ मते लक्षद्विप मतदार संघात पडले होते.

आदिवासी भागात 'नोटा'ला सर्वाधिक पसंती

२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत ज्या १० जागांवर सर्वाधिक नोटाचा वापर झाला, यामध्ये ९ जागा अदिवासी बहुल आहेत. यातील सात जागा ५० टक्के आदिवासी मतदार असलेल्या होत्या. यामध्ये तामिळनाडूमधील निलगिरी मतदार संघात सर्वाधिक ४६,५५९ मते नोटाला पडली होती. त्यापाठोपाठ ओडिशामधील नबरंगपूरमधून नोटाला ४४ हजार ४०८, छत्तीसगडमधील बस्तरमधून ३८७७२, राजस्थानमधील बांसवाडा येथे ३४,४०४, ओडिशाच्या कोरापूटमध्ये ३३,२३२, छत्तीसगडमधील राजनांदगावमध्ये ३२, ३८४, गुजरातमधील दाहोत येथे ३२,३०२, छत्तीसगडमधील कांकेरमध्ये ३१,९१७ आणि सरगुजामध्ये ३१,१०४ आणि मध्यप्रदेशातील रतलामध्ये ३०,३६४ मते नोटाला पडले होते.

४४ मतदारसंघात नोटा तिसऱ्या क्रमांकावर

२०१४ मध्ये ५४३ मतदार संघापैकी २९३ जागांवर नोटा पहिल्या पाचमध्ये होते. तर ४४ जागांवर नोटा तिसऱ्या क्रमांकावर होते. तर ५०२ जागांवर नोटा टॉप टेनमध्ये होता.

...तर दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार विजयी

निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नोटाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. परंतु नोटाचे मते रद्द मानले जातात. त्यामुळे याचा निवडणुकीच्या निकालावर काहीही परिणाम होत नाही. निवडणूकीत एका उमेदवाराला ४० मते मिळाली आणि दुसऱ्याला ३० मते पण नोटाला १०० मते मिळाली तरी देखील ४० मते असणारा उमेदवार विजयी मानला जातो.

महाराष्ट्र, हरिणायात निडणूक आयोगाचा मोठा निर्णय

महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगाने नोव्हेंबर २०१८ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नोटाला सर्वाधिक मते पडल्यास पुन्हा मतदान निवडणूक घेण्याचे ठरवले होते. त्यावेळी आयोगाने नोटाला उमेदवाराप्रमाणे गृहित धरण्याचे ठरवले होते. हरियाणामध्ये देखील असाच निर्णय झाला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान