शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

अबब ! २०१४ लोकसभा निवडणुकीत 'नोटा'ला ६० लाख मते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 11:41 IST

२०१४ मध्ये नोटाला तामिळनाडूमधून निलगिरी मतदार संघातून सर्वाधिक ४६ हजार ५५९ मते मिळाली होती. तर सर्वात कमी १२३ मते लक्षद्विप मतदार संघात पडले होते.

मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. विविध पक्ष आणि पक्षांचे उमेदवार प्रचारासाठी गावोगावी फिरत आहेत. मतदानापूर्वी सर्वच पक्ष विविध प्रकारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. आपल्या पक्षाचे जाहिरनामे वाचून दाखवतात. असं असताना देखील अनेक ठिकाणी नोटा अर्थात 'नन ऑफ अबाउ' या पर्यायाचा मतदानात अधिक वापर झाल्याचे २०१४ च्या निवडणुकीत दिसून आले आहे.

गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच 'नन ऑफ अबाउ' या पर्यायाचा वापर करण्यात आला. त्यावेळी ८३.४१ कोटी मतदारांपैकी ५५.३८ कोटी (६६.४ टक्के) मतदारांनी ५४३ मतदार संघांसाठी मतदान केले होते. यापैकी ६० लाख मतदारांनी 'नोटा'चा पर्याय निवडला होता. एकूण मतदारांपैकी याचे प्रमाण १.१ टक्के आहे. २०१४ मध्ये नोटाला तामिळनाडूमधून निलगिरी मतदार संघातून सर्वाधिक ४६ हजार ५५९ मते मिळाली होती. तर सर्वात कमी १२३ मते लक्षद्विप मतदार संघात पडले होते.

आदिवासी भागात 'नोटा'ला सर्वाधिक पसंती

२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत ज्या १० जागांवर सर्वाधिक नोटाचा वापर झाला, यामध्ये ९ जागा अदिवासी बहुल आहेत. यातील सात जागा ५० टक्के आदिवासी मतदार असलेल्या होत्या. यामध्ये तामिळनाडूमधील निलगिरी मतदार संघात सर्वाधिक ४६,५५९ मते नोटाला पडली होती. त्यापाठोपाठ ओडिशामधील नबरंगपूरमधून नोटाला ४४ हजार ४०८, छत्तीसगडमधील बस्तरमधून ३८७७२, राजस्थानमधील बांसवाडा येथे ३४,४०४, ओडिशाच्या कोरापूटमध्ये ३३,२३२, छत्तीसगडमधील राजनांदगावमध्ये ३२, ३८४, गुजरातमधील दाहोत येथे ३२,३०२, छत्तीसगडमधील कांकेरमध्ये ३१,९१७ आणि सरगुजामध्ये ३१,१०४ आणि मध्यप्रदेशातील रतलामध्ये ३०,३६४ मते नोटाला पडले होते.

४४ मतदारसंघात नोटा तिसऱ्या क्रमांकावर

२०१४ मध्ये ५४३ मतदार संघापैकी २९३ जागांवर नोटा पहिल्या पाचमध्ये होते. तर ४४ जागांवर नोटा तिसऱ्या क्रमांकावर होते. तर ५०२ जागांवर नोटा टॉप टेनमध्ये होता.

...तर दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार विजयी

निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नोटाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. परंतु नोटाचे मते रद्द मानले जातात. त्यामुळे याचा निवडणुकीच्या निकालावर काहीही परिणाम होत नाही. निवडणूकीत एका उमेदवाराला ४० मते मिळाली आणि दुसऱ्याला ३० मते पण नोटाला १०० मते मिळाली तरी देखील ४० मते असणारा उमेदवार विजयी मानला जातो.

महाराष्ट्र, हरिणायात निडणूक आयोगाचा मोठा निर्णय

महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगाने नोव्हेंबर २०१८ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नोटाला सर्वाधिक मते पडल्यास पुन्हा मतदान निवडणूक घेण्याचे ठरवले होते. त्यावेळी आयोगाने नोटाला उमेदवाराप्रमाणे गृहित धरण्याचे ठरवले होते. हरियाणामध्ये देखील असाच निर्णय झाला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान