शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

पावसाचा आता माेठा ब्रेक; यंदा सरासरी गाठण्याची शक्यता कमी; हवामान खात्याने वर्तविला अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 07:18 IST

यंदा १९७० नंतर प्रथमच दिल्ली, आग्रा आणि वृंदावनमध्ये पूरसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली.

नवी दिल्ली : पावसाने दगा दिल्यामुळे देशभरात चिंतेचे वातावरण आहे. देशभरात ऑगस्टमध्ये आतापर्यंत ३२ टक्के कमी पाऊस पडला आहे. पुढील चार दिवस २५ राज्यांमध्ये पावसाची शक्यता नाही. उत्तराखंड, हिमाचलसारख्या डोंगराळ राज्यांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता पावसाने बऱ्यापैकी ब्रेक घेतला आहे. इतर राज्यांत पावसाने आधीपासूनच ओढ दिली आहे. याचे कारण म्हणजे अल-निनो. ऑगस्टनंतर सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.

यंदा १९७० नंतर प्रथमच दिल्ली, आग्रा आणि वृंदावनमध्ये पूरसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली. दुसरीकडे, हरयाणामध्ये पहिल्यांदाच पूरस्थिती निर्माण झाली होती. गेल्या तीन वर्षांतील हा सर्वांत कोरडा मान्सून ठरला आहे. या पावसाळ्यात आतापर्यंत ७ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. तर ऑगस्टमध्ये आतापर्यंतचा पाऊस ३२ टक्के कमी आहे.

सरासरी गाठण्याची शक्यता कमी- याचा अर्थ असा की, या पावसाळ्याचा हंगाम (३० सप्टेंबरपर्यंत) सरासरीपेक्षा कमी पावसाने संपेल. सरासरी ९४ ते १०६ टक्के पर्जन्यमान सरासरीएवढे मानले जाते. - हवामान शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार सप्टेंबरमध्ये भारतातील ३६ पैकी ३२ हंगामी उपविभागांमध्ये सरासरीपेक्षा कमी म्हणजेच ९४ टक्के किंवा त्याहून अधिक आहे. सप्टेंबरमध्ये तो सरासरीपेक्षा २० मिमी कमी असेल.

या प्रदेशांनाही फटकाउत्तर प्रदेशच्या मैदानी भागात सामान्यपेक्षा १३ टक्के कमी पाऊस झाला आहे. बिहारमध्ये २५ टक्के कमी, मध्य प्रदेशात १० टक्के कमी पाऊस झाला. याशिवाय केरळ, झारखंड, कर्नाटक आणि छत्तीसगडमध्येही कमी पाऊस झाला आहे. 

टॅग्स :Rainपाऊस