शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

राजस्थानमध्ये काँग्रेससमोर अजब समस्या, बडे मंत्री निवडणूक लढवण्यास देताहेत नकार, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 15:44 IST

Rajasthan Assembly Election 2023: राजस्थानमध्ये निवडणुकीचा प्रचार ऐन बहरात आला असताना काँग्रेससमोर वेगळीच समस्या निर्माण झालेली आहे. राज्यातील पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री निवडणूक लढवण्यास नकार देत आहेत. 

विधानसभा निवडणुकीमुळे सध्या राजस्थानमध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे. राजस्थानमधील विधानसभेच्या २०० जागांसाठी २५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्तांतराची असलेली परंपरा तोडण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. तर भाजपाने पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र निवडणुकीचा प्रचार ऐन बहरात आला असताना काँग्रेससमोर वेगळीच समस्या निर्माण झालेली आहे. राज्यातील पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री निवडणूक लढवण्यास नकार देत आहेत. 

एकीकडे भाजपामध्य़े तिकीट वाटप आणि उमेदवारी न मिळाल्याने नेते नाराज आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये सरकारमधील मंत्रीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास कचरत आहेत. अशोक गहलोत सरकारमध्ये वन आणि पर्यावरण मंत्री असलेल्या हेमाराम चौधरी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून आपल्या जागी कुठल्या तरी तरुण नेत्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे.

हेमाराम चौधरी यांच्यानंतर आता राजस्थान सरकारमधील कृषिमंत्री लालचंद कटारिया यांनीही आपण निवडणूक लढवण्यास इच्छूक नसल्याचं सांगितलं आहे. आध्यात्मावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री भरत सिंह यांनीही निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. आता एकापाठोपाठ एक मंत्री आणि माजी मंत्री राजीनामा देत असल्याने सत्ताधारी पक्षामध्ये सारं काही आलबेल आहे का? असा प्रश्न पडला आहे.

हेमाराम चौधरी आणि लालचंद कटारिया यांची गणती मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे निकटवर्तीय म्हणून गणना होते. मात्र तरीही ते निवडणूक लढवण्यास नकार का देत आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. हेमाराम चौधरी यांनी २०१३ आणि २०१८च्या विधानसभा निवडणुकीवेळीही निवडणूक लढवण्यास नकाल दिला होता. मात्र नंतर मनधरणी करण्यात आल्यानंतर हेमाराम चौधरी निवडणूक लढवण्यास तयार झाले होते.

तर लालचंद कटारिया यांच्या निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याच्या निर्णयाबाबत सांगण्यात येतेय की, ते ज्या झोटवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवतात. त्या मतदारसंघामध्ये भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केलेली आहे. भाजपाने इथे माजी केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांना उमेदवारी दिली आहे. याआधी राज्यवर्धन सिंह राठोड आणि लालचंद कटारिया यांचा आमना-सामना लोकसभा निवडणुकीतही झाला होता. त्यावेळी राज्यवर्धन सिंह राठोड यांनी बाजी मारली होती.  

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसAshok Gahlotअशोक गहलोत