शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आधारकार्डची झेरॉक्स न देण्याचा सल्ला मागे; खात्री करूनच शेअर करण्याचा UIDAIचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 07:40 IST

चुकीचा अर्थ लावला जाण्याची भीती लक्षात घेऊन हा निर्णय तत्काळ मागे घेण्यात आला असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

नवी दिल्ली : सर्वसामान्यांनी त्यांच्या आधारची झेरॉक्स (छायांकित पत्र) कोणासोबतही शेअर करू नका, असा दिलेला सल्ला सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय)ने तत्काळ मागे घेतला आहे. यावरून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. त्यामुळे आधारची झेरॉक्स कुणालाही शेअर करू नका, असा सल्ला देणारे निवेदन मागे घेण्यात आले आहे. नागरिकांनी त्यांच्या आधारची प्रत कोणत्याही संस्थेसोबत शेअर करू नये, त्याचा गैरवापर होऊ शकतो, असे मंत्रालयाने म्हटले होते. यात आधार क्रमांकाचे शेवटचे चार अंक असणारे आधारकार्ड (मास्क्ड कार्ड) वापरले जाऊ शकते. यामध्ये आधार क्रमांकाचे पहिले आठ अंक लपवून ठेवले जातात, तर केवळ शेवटचे चार अंकच दिसतात. परंतु याचा चुकीचा अर्थ लावला जाण्याची भीती लक्षात घेऊन हा निर्णय तत्काळ मागे घेण्यात आला असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

बंगळुरूमधील यूआयडीएआयच्या प्रादेशिक कार्यालयाने जारी केलेल्या प्रकाशनात, सामान्य जनतेला त्यांच्या आधारच्या फोटोकॉपी कोणत्याही संस्थेसोबत शेअर करू नयेत असे सांगण्यात आले होते. यामध्ये पर्याय म्हणून आधार क्रमांकाच्या शेवटच्या चार अंकांचे आधार वापरण्याचा सल्ला देण्यात आला होता. यूआयडीएआयकडून आधार कार्डधारकांना त्यांचा आधार क्रमांक वापरण्यात आणि इतरांना शेअर करताना योग्य काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. आधार ओळख पडताळणीच्या प्रणालीने आधारधारकाची ओळख आणि गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी पुरेशी व्यवस्था केली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डCentral Governmentकेंद्र सरकार