शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

30 चा पंच...! 'चलाख' चीनला 'सणसणीत' उत्तर, शपथ घेताच मोदी सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 15:34 IST

...या निर्णयामुळे चीनला मिर्ची लागणार असल्याचे मानले जात आहे. एवढेच नाही, तर भारत सरकारच्या या निर्णयाकडे, चीनला दिलेले जशास तसे उत्तर म्हणूनही बघितले जात आहे.

देशात एनडीए सरकार स्थापन होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. असाच एक निर्णय तिबेटसंदर्भात घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे चीनला मिर्ची लागणार असल्याचे मानले जात आहे. एवढेच नाही, तर भारत सरकारच्या या निर्णयाकडे, चीनला दिलेले जशास तसे उत्तर म्हणूनही बघितले जात आहे. द डिप्लोमॅटने दिलेल्या एका वृत्तानुसार, भारत सरकारने तिबेटमधील 30 ठिकाणांची नावे बदलण्याची तयारी सुरू केली आहे. चीनने अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बलण्याचा खोडसाळपणा केला, त्याला हे प्रत्युत्तर मानले जात आहे.

संबंधित वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नव्या एनडीए सरकारने तिबेटमधील या ठिकाणांची नावे बदलण्यासही मंजुरीही दिली आहे. नावे निवडण्यासाठी सखोल संशोधन केले गेले आहे, एवढेच नाही तर या नावांना ऐतिहासिक महत्त्वही आहे. तसेच ती तिबेटशी संबंधितही आहेत. भारतीय लष्कर लवकरच ही नावे जाहीर करणार असून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील नकाशांमध्येही त्यांचा समावेश केला जाणार आहे.

भारत सरकारने ज्या ठिकाणांच्या नावांना मंजुरी दिली त्यांत, निवासी क्षेत्र, पर्वत, नद्या, तलाव आणि पर्वतीय खिंडींचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. द डिप्लोमॅटने माजी इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी बेनू घोष यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, PM मोदींना आपल्या मजबूत छबीच्या जोरावर ही निवडणूक जिंकायची होती. यामुळे ते आपली छबी काय ठेवण्यासाठी तेबेटमधील ठिकाणांची नावे बदलण्यास परवानगी देतील. तसेच, हे भारताकडून पुन्हा एकदा तिबेटसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यासारखे आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीXi Jinpingशी जिनपिंगchinaचीन