शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

30 चा पंच...! 'चलाख' चीनला 'सणसणीत' उत्तर, शपथ घेताच मोदी सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 15:34 IST

...या निर्णयामुळे चीनला मिर्ची लागणार असल्याचे मानले जात आहे. एवढेच नाही, तर भारत सरकारच्या या निर्णयाकडे, चीनला दिलेले जशास तसे उत्तर म्हणूनही बघितले जात आहे.

देशात एनडीए सरकार स्थापन होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. असाच एक निर्णय तिबेटसंदर्भात घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे चीनला मिर्ची लागणार असल्याचे मानले जात आहे. एवढेच नाही, तर भारत सरकारच्या या निर्णयाकडे, चीनला दिलेले जशास तसे उत्तर म्हणूनही बघितले जात आहे. द डिप्लोमॅटने दिलेल्या एका वृत्तानुसार, भारत सरकारने तिबेटमधील 30 ठिकाणांची नावे बदलण्याची तयारी सुरू केली आहे. चीनने अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बलण्याचा खोडसाळपणा केला, त्याला हे प्रत्युत्तर मानले जात आहे.

संबंधित वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नव्या एनडीए सरकारने तिबेटमधील या ठिकाणांची नावे बदलण्यासही मंजुरीही दिली आहे. नावे निवडण्यासाठी सखोल संशोधन केले गेले आहे, एवढेच नाही तर या नावांना ऐतिहासिक महत्त्वही आहे. तसेच ती तिबेटशी संबंधितही आहेत. भारतीय लष्कर लवकरच ही नावे जाहीर करणार असून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील नकाशांमध्येही त्यांचा समावेश केला जाणार आहे.

भारत सरकारने ज्या ठिकाणांच्या नावांना मंजुरी दिली त्यांत, निवासी क्षेत्र, पर्वत, नद्या, तलाव आणि पर्वतीय खिंडींचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. द डिप्लोमॅटने माजी इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी बेनू घोष यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, PM मोदींना आपल्या मजबूत छबीच्या जोरावर ही निवडणूक जिंकायची होती. यामुळे ते आपली छबी काय ठेवण्यासाठी तेबेटमधील ठिकाणांची नावे बदलण्यास परवानगी देतील. तसेच, हे भारताकडून पुन्हा एकदा तिबेटसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यासारखे आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीXi Jinpingशी जिनपिंगchinaचीन