शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

भारत सरकारच्या एका निर्णयानं ३ देशांची चिंता वाढली; जागतिक बाजारपेठेतही गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 17:35 IST

भारतात किरकोळ महागाई दराने गेल्या १५ महिन्यात उच्चांक गाठला आहे. त्यासाठी मोदी सरकारने किंमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्यातबंदीसह अनेक उपाय केले आहेत.

नवी दिल्ली – तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या भारताने बिगर बासमती तांदळावर निर्यातबंदी आणल्याने तांदळाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या दराने अनेक देशांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. जगातील अनेक देश तांदळासाठी भारतावर निर्भर आहेत. तांदळावरील निर्यातबंदी उठवावी अशी मागणी या देशांनी भारताकडे केली आहे. सिंगापूर, इंडोनेशिया, फिलिपिंस या देशांनी तांदळाच्या वाढत्या किंमती पाहून भारताकडे निर्यातबंदी उठवण्याचं आवाहन केले आहे.

मिंट रिपोर्टनुसार, सिंगापूरने भारताकडे ११०००० टन तांदळाची निर्यात करण्याची विनंती केली आहे. जूनमध्ये इंडोनेशियाने अल निनोच्या पार्श्वभूमीवर देशातील अन्नपुरवठा कायम ठेवण्यासाठी भारतातून दहा लाख टन तांदूळ आयात करण्याची घोषणा केली होती. अल निनोमुळे हवामान चक्र विस्कळीत होऊन पूर, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्ती उद्भवतात. त्याचबरोबर फिलीपिन्सही तांदूळ पुरवठ्यासाठी भारतावर अवलंबून आहे.

अलीकडेच संयुक्त राष्ट्र जागतिक खाद्य कार्यक्रमाअंतर्गत भारताकडे २ लाख टन तांदळाची मागणी करण्यात आली होती. कोविड १९ आणि युक्रेन युद्धामुळे खाद्य पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यात भारताने तांदूळ निर्यातबंदी निर्णय घेतल्याने खाद्य असुरक्षा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भारताचा शेजारी देश बांगलादेशही तांदळासह काही कृषी उत्पादनांच्या पुरवठ्यासाठी भारताशी बोलणी करत आहे. भारतात किरकोळ महागाई दराने गेल्या १५ महिन्यात उच्चांक गाठला आहे. त्यासाठी मोदी सरकारने किंमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्यातबंदीसह अनेक उपाय केले आहेत.

पुढील लोकसभा निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकार किंमतीवर नियंत्रण लावण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करत आहे. महागाई कमी करू असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले होते. नुकतेच सिंगापूरने तांदूळ निर्यातीबाबत आम्ही भारत सरकारशी चर्चा करत आहोत असं म्हटलं. सिंगापूरमध्ये ३० देशातून तांदूळ आयात केला जातो. त्यात २०२२ मध्ये भारतातून आयात केलेल्या तांदळाचे योगदान ४० टक्के इतके होते. निर्यातबंदीमुळे बिगर बासमती तांदळाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सिंगापूरमध्ये बिगर बासमती तांदूळ जवळपास १७ टक्के आयात केला जातो.

शेजारील देशांची चिंता वाढली

भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे. जागतिक व्यापारात भारताचा ४० टक्के हिस्सा आहे. भारत सरकारने २० जुलैरोजी बिगर बासमती तांदूळ निर्यातीवर बंदी आणली. घरगुती किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. तांदूळ निर्यातीवर निर्बंध आणल्याने जागतिक बाजारपेठेत तांदळाच्या किंमतीवर परिणाम झाला. बांगलादेश, नेपाळसह भारताचे शेजारील देश तांदळासाठी भारतावर निर्भर आहेत. त्यामुळे या देशांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार