शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कुदरत का करिश्मा! ३० वर्षापूर्वी पाण्यात बुडालेली मशीद अचानक बाहेर आली, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 17:12 IST

ही मशीद १२० वर्ष जुनी असून गेल्या ३० वर्षापासून पाण्यात पूर्णत: बुडाली होती.

नवादा - बिहारच्या नवादा येथे ३ दशकापूर्वी पाण्यात बुडलेली एक मशीद सापडली आहे. ३० वर्ष पाण्यात असूनही मशिदीला काहीही नुकसान झाले नाही. नवादाच्या रजौली मुख्यालयापासून ५ किलोमीटर अंतरावर फुलवारिया धरण आहे. या धरणाशेजारील चंदौली गावात असणारी मस्जिद ३ दशकापूर्वी पाण्यात बुडाली होती. परंतु आता पाणी पूर्ण आटल्यानं ३० वर्षांनी पहिल्यांच मशीद दिसू लागली. त्यामुळे मशीद पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. 

पाण्यातून मशीद बाहेर आली अशी चर्चा आसपासच्या गावांमध्ये पसरली. त्यामुळे जिल्ह्यातील विविध परिसरातील मुस्लीम लोक कुटुंबासह याठिकाणी मशीद पाहण्यासाठी पोहचले. मागील काही दिवसांपासून ही मशीद चर्चेत आली आहे. काही युवकांनी हातात चप्पल घेत चिखलातून मशिदीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र चिखल आणि पाणी असल्याने मशिदीच्या जवळ जाता आले नाही. 

स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, ही मशीद १२० वर्ष जुनी असून गेल्या ३० वर्षापासून पाण्यात पूर्णत: बुडाली होती. मात्र तरीही इतक्या वर्षांनी पाणी ओसरल्यानंतर मशिदी जैसे थे आहे. मशिदीचं कुठल्याही प्रकारे नुकसान झाले नाही. फुलवारिया धरणाचं बांधकाम १९८४ मध्ये करण्यात आले होते. त्याकाळी या जागेवर मोठ्या संख्येने मुस्लीम समुदायाची वस्ती होती. जमीन अधिग्रहण केल्यानंतर धरणाची निर्मिती करण्यात आली. तेव्हा येथील स्थानिकांना दुसरीकडे स्थलांतरित करत हरदिया डॅमच्या शेजारील गावात वसवण्यात आले. धरणाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मशिदीला तसेच सोडण्यात आले. पाणी भरल्यानंतर मशीद पूर्णपणे पाण्यात गेली. केवळ मशिदीचा घुमट पाण्याबाहेर दिसून येत होता. मात्र आता पाण्याची पातळी एकदम कमी झाल्यामुळे मशीद लोकांना दिसत आहे.