शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 05:45 IST

केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात बहुसंख्याकांची लोकसंख्येत घसरण होत अल्पसंख्याकांची संख्या वाढत असल्याचेही त्यात नमूद केले आहे.

दिल्ली : देशात १९५० ते २०१५ दरम्यान बहुसंख्याक लोकसंख्येचा कमी झालेला वाटा आणि अल्पसंख्याकांचे वाढलेले प्रमाण हे देशातील सामाजिक विविधतेला प्रोत्साहन देण्यास अनुकूल आहे. समाजातील वंचित घटकांसाठी योग्य वातावरण आणि सामाजिक पाठबळ प्रदान केल्याशिवाय त्यांच्या चांगल्या जीवनशैलीला प्रोत्साहन देणे शक्य नाही, असा निष्कर्ष पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने (ईएसी-पीएम) नुकत्याच जारी केलेल्या अहवालात काढला आहे. 

केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात बहुसंख्याकांची लोकसंख्येत घसरण होत अल्पसंख्याकांची संख्या वाढत असल्याचेही त्यात नमूद केले आहे. 'ईएसी-पीएम'ने जारी केलेल्या 'धार्मिक अल्पसंख्याकांचा वाटा : देशव्यापी विश्लेषण'या अहवालात देशातील एकूण लोकसंख्येतील हिंदूचा वाटा १९५० ते २०१५ या कालावधीत ७.८२ टक्क्यांनी घटला, तर मुस्लिमांचा वाटा ४३.१५ टक्क्यांनी वाढला आहे. त्यातून देशात विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे त्यात म्हटले आहे. परिषदेने याबाबत परिपूर्ण आकडेवारी मात्र दिलेली नाही. देशातील शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती आणि २०२१ मध्ये होणारी जनगणना झालेली नाही.

मुस्लिमबहुल देशांत लोकसंख्येत वाढ जगातील बहुतांश मुस्लिमबहुल देशांमध्ये बहुसंख्य धर्मीयांच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. मालदीवमध्ये बहुसंख्य गटाचा (शफी सुन्नी) वाटा १.४७ टक्क्यांनी घसरला आहे.

भारतीय उपखंडात बांगलादेशात वाढ बांगलादेशमध्ये बहुसंख्याक धार्मिक गटाचा वाटा १८ टक्क्यांनी वाढला आहे, ही भारतीय उपखंडातील सर्वांत मोठी वाढ आहे. १९७१ मध्ये बांगलादेशची निर्मिती होऊनही, पाकिस्तानातील बहुसंख्य धार्मिक पंथाचा (हनाफी मुस्लिम) वाटा ३.७५ टक्क्यांनी वाढला. एकूण मुस्लिम लोकसंख्येचा त्यांचा वाटा १० टक्क्यांनी वाढला आहे.

१६७ देशांच्या लोकसंख्येचा अभ्यास या अहवालात जगभरातील २६७ देशांचे विश्लेषण केले आहे. जगभरात बहुसंख्याकांच्या लोकसंख्येत घसरण होत आहे. भारतातही त्यांची लोकसंख्या ७.८२ टक्क्यांनी घटली आहे. दक्षिण आशियातील शेजारच्या देशांशी तुलना केल्यास त्यातील तफावत लक्षात येते. त्या देशांत बहुसंख्याकांचे प्रमाण वाढले. बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, भूतान आणि अफगाणिस्तानमध्ये अल्पसंख्याकांचे प्रमाण कमी होणे नवे नाही, कारण तेथील लोक तणावाच्या काळात भारतात येतात, असेही अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक