शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 05:45 IST

केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात बहुसंख्याकांची लोकसंख्येत घसरण होत अल्पसंख्याकांची संख्या वाढत असल्याचेही त्यात नमूद केले आहे.

दिल्ली : देशात १९५० ते २०१५ दरम्यान बहुसंख्याक लोकसंख्येचा कमी झालेला वाटा आणि अल्पसंख्याकांचे वाढलेले प्रमाण हे देशातील सामाजिक विविधतेला प्रोत्साहन देण्यास अनुकूल आहे. समाजातील वंचित घटकांसाठी योग्य वातावरण आणि सामाजिक पाठबळ प्रदान केल्याशिवाय त्यांच्या चांगल्या जीवनशैलीला प्रोत्साहन देणे शक्य नाही, असा निष्कर्ष पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने (ईएसी-पीएम) नुकत्याच जारी केलेल्या अहवालात काढला आहे. 

केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात बहुसंख्याकांची लोकसंख्येत घसरण होत अल्पसंख्याकांची संख्या वाढत असल्याचेही त्यात नमूद केले आहे. 'ईएसी-पीएम'ने जारी केलेल्या 'धार्मिक अल्पसंख्याकांचा वाटा : देशव्यापी विश्लेषण'या अहवालात देशातील एकूण लोकसंख्येतील हिंदूचा वाटा १९५० ते २०१५ या कालावधीत ७.८२ टक्क्यांनी घटला, तर मुस्लिमांचा वाटा ४३.१५ टक्क्यांनी वाढला आहे. त्यातून देशात विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे त्यात म्हटले आहे. परिषदेने याबाबत परिपूर्ण आकडेवारी मात्र दिलेली नाही. देशातील शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती आणि २०२१ मध्ये होणारी जनगणना झालेली नाही.

मुस्लिमबहुल देशांत लोकसंख्येत वाढ जगातील बहुतांश मुस्लिमबहुल देशांमध्ये बहुसंख्य धर्मीयांच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. मालदीवमध्ये बहुसंख्य गटाचा (शफी सुन्नी) वाटा १.४७ टक्क्यांनी घसरला आहे.

भारतीय उपखंडात बांगलादेशात वाढ बांगलादेशमध्ये बहुसंख्याक धार्मिक गटाचा वाटा १८ टक्क्यांनी वाढला आहे, ही भारतीय उपखंडातील सर्वांत मोठी वाढ आहे. १९७१ मध्ये बांगलादेशची निर्मिती होऊनही, पाकिस्तानातील बहुसंख्य धार्मिक पंथाचा (हनाफी मुस्लिम) वाटा ३.७५ टक्क्यांनी वाढला. एकूण मुस्लिम लोकसंख्येचा त्यांचा वाटा १० टक्क्यांनी वाढला आहे.

१६७ देशांच्या लोकसंख्येचा अभ्यास या अहवालात जगभरातील २६७ देशांचे विश्लेषण केले आहे. जगभरात बहुसंख्याकांच्या लोकसंख्येत घसरण होत आहे. भारतातही त्यांची लोकसंख्या ७.८२ टक्क्यांनी घटली आहे. दक्षिण आशियातील शेजारच्या देशांशी तुलना केल्यास त्यातील तफावत लक्षात येते. त्या देशांत बहुसंख्याकांचे प्रमाण वाढले. बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, भूतान आणि अफगाणिस्तानमध्ये अल्पसंख्याकांचे प्रमाण कमी होणे नवे नाही, कारण तेथील लोक तणावाच्या काळात भारतात येतात, असेही अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक