शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 05:45 IST

केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात बहुसंख्याकांची लोकसंख्येत घसरण होत अल्पसंख्याकांची संख्या वाढत असल्याचेही त्यात नमूद केले आहे.

दिल्ली : देशात १९५० ते २०१५ दरम्यान बहुसंख्याक लोकसंख्येचा कमी झालेला वाटा आणि अल्पसंख्याकांचे वाढलेले प्रमाण हे देशातील सामाजिक विविधतेला प्रोत्साहन देण्यास अनुकूल आहे. समाजातील वंचित घटकांसाठी योग्य वातावरण आणि सामाजिक पाठबळ प्रदान केल्याशिवाय त्यांच्या चांगल्या जीवनशैलीला प्रोत्साहन देणे शक्य नाही, असा निष्कर्ष पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने (ईएसी-पीएम) नुकत्याच जारी केलेल्या अहवालात काढला आहे. 

केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात बहुसंख्याकांची लोकसंख्येत घसरण होत अल्पसंख्याकांची संख्या वाढत असल्याचेही त्यात नमूद केले आहे. 'ईएसी-पीएम'ने जारी केलेल्या 'धार्मिक अल्पसंख्याकांचा वाटा : देशव्यापी विश्लेषण'या अहवालात देशातील एकूण लोकसंख्येतील हिंदूचा वाटा १९५० ते २०१५ या कालावधीत ७.८२ टक्क्यांनी घटला, तर मुस्लिमांचा वाटा ४३.१५ टक्क्यांनी वाढला आहे. त्यातून देशात विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे त्यात म्हटले आहे. परिषदेने याबाबत परिपूर्ण आकडेवारी मात्र दिलेली नाही. देशातील शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती आणि २०२१ मध्ये होणारी जनगणना झालेली नाही.

मुस्लिमबहुल देशांत लोकसंख्येत वाढ जगातील बहुतांश मुस्लिमबहुल देशांमध्ये बहुसंख्य धर्मीयांच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. मालदीवमध्ये बहुसंख्य गटाचा (शफी सुन्नी) वाटा १.४७ टक्क्यांनी घसरला आहे.

भारतीय उपखंडात बांगलादेशात वाढ बांगलादेशमध्ये बहुसंख्याक धार्मिक गटाचा वाटा १८ टक्क्यांनी वाढला आहे, ही भारतीय उपखंडातील सर्वांत मोठी वाढ आहे. १९७१ मध्ये बांगलादेशची निर्मिती होऊनही, पाकिस्तानातील बहुसंख्य धार्मिक पंथाचा (हनाफी मुस्लिम) वाटा ३.७५ टक्क्यांनी वाढला. एकूण मुस्लिम लोकसंख्येचा त्यांचा वाटा १० टक्क्यांनी वाढला आहे.

१६७ देशांच्या लोकसंख्येचा अभ्यास या अहवालात जगभरातील २६७ देशांचे विश्लेषण केले आहे. जगभरात बहुसंख्याकांच्या लोकसंख्येत घसरण होत आहे. भारतातही त्यांची लोकसंख्या ७.८२ टक्क्यांनी घटली आहे. दक्षिण आशियातील शेजारच्या देशांशी तुलना केल्यास त्यातील तफावत लक्षात येते. त्या देशांत बहुसंख्याकांचे प्रमाण वाढले. बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, भूतान आणि अफगाणिस्तानमध्ये अल्पसंख्याकांचे प्रमाण कमी होणे नवे नाही, कारण तेथील लोक तणावाच्या काळात भारतात येतात, असेही अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक