शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीमध्ये मोठा अपघात! विषारी वायूमुळे पाच कामगारांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 18:40 IST

गुजरातमधील कच्छ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, येथील एका केमिकल फॅक्टरीमध्ये विषारी वायूमुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील कांडला येथील एका केमिकल फॅक्टरीमध्ये विषारी वायू गळतीमुळे पाच कर्मचाऱ्यांचा मृ्त्यू झाला आहे. या फॅक्टरीमध्ये केमिकलची टाकी साफ करत असताना हा अपघात झाला आहे. ही घटना बुधवारी सकाळी झाली असून पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. 

मिळालेली माहिती अशी, येथील इमामी ॲग्रो प्लांटमध्ये एका सुपरवायझरसह पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. केमिकल टाकी साफ करत असताना हा अपघात झाला. कारखान्यातील रासायनिक टाक्या साफ करताना विषारी धुराच्या संपर्कात आल्याने कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृतांपैकी चार मजूर आहेत, तर एक पाटण जिल्ह्यातील रहिवासी आहे. बुधवारी सकाळी ते तेलाची टाकी साफ करत असताना हा अपघात झाला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

गुजरातमधील कांडला येथील इमामी ॲग्रोटेक प्लांटमध्ये खाद्यतेल, बायोडिझेल, रिफाइंड पाम, सोयाबीन तेल आणि वनस्पति तूप याचे उत्पादन केले जाते. याची उत्पादन क्षमता प्रतिदिन ३,२०० टन आहे. कच्छचे पोलिस अधीक्षक सागर बागमार यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी साडेबारा वाजता ॲग्रोटेक प्लांटमध्ये ही घटना घडली. अपघाताच्या वेळी कामगार साफसफाई करत होते.

मिळालेली माहिती अशी, एक कर्मचारी गाळ काढण्यासाठी टाकीत उतरला होता यानंतर तो बेशुद्ध झाला. त्याला वाचवण्यासाठी अन्य दोन कर्मचारी टाकीत उटरले तेव्हा तेही बेशुद्ध पडले. यानंतर आणखी दोन कर्मचारी त्यात उटरले यात पाचही जणांचा मृत्यू झाला. सिद्धार्थ तिवारी, अजमत खान, आशिष गुप्ता, आशिष कुमार आणि संजय ठाकूर अशी मृतांची नावे आहेत.

इमामी ॲग्रोटेक लिमिटेडचे ​​प्लांट हेड मणिक पाल यांनी सांगितले की, रात्री १२.३० च्या सुमारास काही लोक टाकीत बेशुद्ध पडल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यांना वाचवताना चार जणांना जीव गमवावा लागला. ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. तपास सुरू आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

कारखान्यात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना लगेच रुग्णालयात दाखल केले. तेथे पाचही जणांना मृत घोषित करण्यात आले. 

टॅग्स :Gujaratगुजरात