शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुलांपासून प्रेरणा घेत २०० कोटींची संपत्ती दान; ऐषारामाचे जीवन त्यागून पती-पत्नीचा संन्यास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 05:27 IST

आयुष्यभर भिक्षा मागून कंठणार आयुष्य; २२ एप्रिल रोजी घेणार शपथ

साबरकांठा : गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगर येथील रहिवासी असलेले व्यापारी भावेश भाई भंडारी आणि त्यांच्या पत्नीने २०० कोटी रुपयांची संपत्ती दान करून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपले ऐशोआरामाचे जीवन सोडून जैन धर्माची दीक्षा घेण्याचे आणि एकांताचे जीवन जगण्याचा निर्णय घेतला आहे. भावेश हे इमारत बांधकामाच्या व्यवसायाशी संबंधित आहेत. साबरकांठा ते अहमदाबादपर्यंत त्यांचा व्यवसाय पसरला आहे. संन्यास घेतल्याने त्यांची चर्चा होत आहे.

भावेश भाई भंडारी यांनी आपले ऐशोआरामाचे जीवन सोडून जैन धर्माची दीक्षा घेण्याचे आणि एकांताचे जीवन जगण्याचा निर्णय घेतला आहे. भावेश भाई आणि त्यांच्या पत्नीसह ३५ जण २२ एप्रिल रोजी हिम्मतनगर रिव्हर फ्रंट येथे एकांताचे जीवन जगण्याची शपथ घेणार आहेत.

४ किलोमीटर मिरवणूकभावेश भाई भंडारी व त्यांच्या पत्नीची हिंमतनगर येथे मोठ्या थाटामाटात ४ किलाेमीटर मिरवणूक काढण्यात आली. या यात्रेत भावेश भाईंनी त्यांची २०० कोटींची संपत्ती दान केली.

मुले आधीच संन्यस्तभावेश यांचा मुलगा आणि मुलगीही संन्यस्त जीवन जगत आहेत. १६ वर्षांचा मुलगा आणि १९ वर्षांच्या मुलीने दोन वर्षांपूर्वीच दीक्षा घेतली होती. मुलांपासून प्रेरणा घेऊन भावेश भाईंनी दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पंखे, एसी, मोबाइल फोन त्यागणार भंडारी यांच्या कुटुंबाचा नेहमीच जैन समाजाकडे कल असल्याचे लोकांनी सांगितले. त्यांचे कुटुंबीय अनेकदा दीक्षार्थीं आणि गुरूंची भेट घेत असे. संन्यास घेतल्यानंतर भावेश भाई आणि त्यांच्या पत्नीला आयुष्यभर भिक्षा मागून जगावे लागणार आहे. पंखे, एसी, मोबाईल फोन यांसारख्या चैनीच्या वस्तूही त्यांना सोडून द्याव्या लागतील. याशिवाय त्यांना सर्वत्र पायी प्रवास करावा लागणार आहे.

टॅग्स :Gujaratगुजरात