शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरसाठी राष्ट्रपतींना साकडे; ‘इंडिया’च्या शिष्टमंडळाने घेतली भेट; हरयाणा दंगलीचीही दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 07:59 IST

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर सांगितले की, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या बैठकीत हरयाणातील दंगलींबाबतही राष्ट्रपतींना माहिती दिली. मणिपूरमधील महिलांना राज्यसभेवर नामनिर्देशित करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

नवी दिल्ली : विरोधी आघाडी ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुसिव्ह अलायन्स’ (इंडिया) च्या घटक पक्षांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना संसदेत निवेदन करण्यास सांगावे, असे साकडे घातले. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी राज्याचा दौरा करावा, अशी मागणीही त्यांनी त्यांच्याकडे केली.काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर सांगितले की, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या बैठकीत हरयाणातील दंगलींबाबतही राष्ट्रपतींना माहिती दिली. मणिपूरमधील महिलांना राज्यसभेवर नामनिर्देशित करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शिष्टमंडळात कोण?खरगे यांच्याशिवाय राष्ट्रपतींना भेटलेल्या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय, जनता दलाचे (युनायटेड) राजीव रंजन, फारूख अब्दुल्ला आणि इतर अनेक पक्षांचे नेते होते.

आम्हाला बोलू दिले जात नाही...- पत्रकार परिषदेत खरगे यांनी सांगितले की, आम्ही राष्ट्रपतींना निवेदन सादर केले आहे. तेथे घडणाऱ्या घटना विशेषत: महिलांवरील अत्याचाराची माहिती दिली. - राष्ट्रपतींचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही भेटलो. लोकसभेत आमचा मुद्दा मांडून कंटाळा आल्यावर अविश्वास प्रस्ताव आणावा लागला. यावर कालच चर्चा व्हायला हवी होती. - विरोधकांना राज्यसभेत नियम २६७ अंतर्गत चर्चा हवी आहे, पण सरकार ऐकत नाही. ‘सरकार आम्हाला सभागृहात बोलू देत नाही. माझा माइक लगेच बंद केला जातो,’ असा आरोपही त्यांनी केला.

महाराष्ट्रामध्ये रेल्वेगाडीत आरपीएफच्या जवानाने केलेला गोळीबार, हरयाणात सुरू असलेला संघर्ष, मणिपूरमधील हिंसाचार अशा घटना सध्या घडत आहेत. देशात ‘अच्छे दिन’ येणार असे केंद्र सरकारने आश्वासन दिले होते. ते हेच दिवस आहेत का? द्वेषाच्या राजकारणातून या सर्व घटना घडल्या आहेत. - कपिल सिब्बल, खासदार, राज्यसभा जनतेच्या संरक्षणाची असलेली जबाबदारी केंद्र सरकारने झटकून टाकली आहे. मणिपूरमधील घटनांकडे सरकारने संपूर्ण दुर्लक्ष केले होते. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्यात घटनात्मक जबाबदारीची थोडीतरी जाणीव शिल्लक असल्यास त्यांनी त्वरित आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.    - पी. चिदंबरम, काँग्रेस नेते 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेसHaryanaहरयाणा