शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

मणिपूरसाठी राष्ट्रपतींना साकडे; ‘इंडिया’च्या शिष्टमंडळाने घेतली भेट; हरयाणा दंगलीचीही दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 07:59 IST

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर सांगितले की, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या बैठकीत हरयाणातील दंगलींबाबतही राष्ट्रपतींना माहिती दिली. मणिपूरमधील महिलांना राज्यसभेवर नामनिर्देशित करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

नवी दिल्ली : विरोधी आघाडी ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुसिव्ह अलायन्स’ (इंडिया) च्या घटक पक्षांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना संसदेत निवेदन करण्यास सांगावे, असे साकडे घातले. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी राज्याचा दौरा करावा, अशी मागणीही त्यांनी त्यांच्याकडे केली.काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर सांगितले की, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या बैठकीत हरयाणातील दंगलींबाबतही राष्ट्रपतींना माहिती दिली. मणिपूरमधील महिलांना राज्यसभेवर नामनिर्देशित करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शिष्टमंडळात कोण?खरगे यांच्याशिवाय राष्ट्रपतींना भेटलेल्या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय, जनता दलाचे (युनायटेड) राजीव रंजन, फारूख अब्दुल्ला आणि इतर अनेक पक्षांचे नेते होते.

आम्हाला बोलू दिले जात नाही...- पत्रकार परिषदेत खरगे यांनी सांगितले की, आम्ही राष्ट्रपतींना निवेदन सादर केले आहे. तेथे घडणाऱ्या घटना विशेषत: महिलांवरील अत्याचाराची माहिती दिली. - राष्ट्रपतींचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही भेटलो. लोकसभेत आमचा मुद्दा मांडून कंटाळा आल्यावर अविश्वास प्रस्ताव आणावा लागला. यावर कालच चर्चा व्हायला हवी होती. - विरोधकांना राज्यसभेत नियम २६७ अंतर्गत चर्चा हवी आहे, पण सरकार ऐकत नाही. ‘सरकार आम्हाला सभागृहात बोलू देत नाही. माझा माइक लगेच बंद केला जातो,’ असा आरोपही त्यांनी केला.

महाराष्ट्रामध्ये रेल्वेगाडीत आरपीएफच्या जवानाने केलेला गोळीबार, हरयाणात सुरू असलेला संघर्ष, मणिपूरमधील हिंसाचार अशा घटना सध्या घडत आहेत. देशात ‘अच्छे दिन’ येणार असे केंद्र सरकारने आश्वासन दिले होते. ते हेच दिवस आहेत का? द्वेषाच्या राजकारणातून या सर्व घटना घडल्या आहेत. - कपिल सिब्बल, खासदार, राज्यसभा जनतेच्या संरक्षणाची असलेली जबाबदारी केंद्र सरकारने झटकून टाकली आहे. मणिपूरमधील घटनांकडे सरकारने संपूर्ण दुर्लक्ष केले होते. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्यात घटनात्मक जबाबदारीची थोडीतरी जाणीव शिल्लक असल्यास त्यांनी त्वरित आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.    - पी. चिदंबरम, काँग्रेस नेते 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेसHaryanaहरयाणा