शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई, ठाण्यात जुळली...! पण अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेने युती तोडली...
2
PMC Election 2026: पुण्यात भाजप - शिवसेना युती तुटली; समाधानकारक जागा न मिळाल्याने नाराज शिंदेसेना स्वबळावर लढणार
3
ठाकरे बंधूंमध्ये कोण किती जागांवर लढणार? उद्धवसेना आणि मनसेतीला जागावाटपाची आकडेवारी अखेर समोर 
4
२ महिन्यांपूर्वी लग्न, श्रीलंकेत हनिमून अन् कपलने संपवलं आयुष्य; का झाला सुखी संसाराचा करुण अंत?
5
"संभाजीनगरात भाजपच्या अहंकारामुळे युती तुटली!" संजय शिरसाटांचा घणाघाती आरोप
6
३२ वर्ष निष्ठेने काम केले अन् पक्षानं दुर्लक्ष केले; मुलुंडमधील BJP पदाधिकाऱ्याचं खुलं पत्र
7
Vastu Shastra: सावधान! घरामध्ये 'या' चुका होत असतील तर पैसा टिकणार नाही आणि नात्यातही येईल कटुता!
8
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; ६ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
9
भाजपा-शिंदे गटाचे अखेर मुंबईत ठरले, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
11
Sunny Leone : सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा
12
'धुरंधर' पाहून मला माझ्याच क्षमतांवर प्रश्न पडलेत..., आदित्य धरबद्दल करण जोहरची प्रतिक्रिया
13
Shyam Dhani Industries IPO Listing: ९०% प्रीमिअमवर लिस्टिंग, नंतर रॉकेट बनला शेअर; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट
14
७ वेळा अटक, पण इरादे बुलंद! बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे भारताशी होते कनेक्शन 
15
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
16
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
17
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
18
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
19
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
20
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 17:53 IST

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिहारमधील मतदार यादीवरुन निवडणूक आयोगावर टीका केली.

"बिहार निवडणुकीच्या नावाखाली संपूर्ण देशात एनआरसीसारखी प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू आहे", असा गंभीर आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर केला.  त्यांनी हे देशाच्या लोकशाहीसाठी "धोकादायक आणि चिंताजनक" असल्याचे म्हटले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, राज्य सरकारला निवडणूक आयोगाकडून काही कागदपत्रे मिळाली आहेत, यात असे म्हटले आहे की मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी पालकांचे जन्म प्रमाणपत्र सादर करावे.

काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

प्रत्यक्षात, निवडणूक आयोग बिहारसह सहा राज्यांमध्ये एक विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण मोहीम सुरू करणार आहे. मतदार यादीतून बेकायदेशीर परदेशी नागरिकांना काढून टाकून अचूक आणि विश्वासार्ह मतदार यादी तयार करणे हा त्याचा उद्देश आहे. आता यावर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने, ही प्रक्रिया बिहारमधून सुरू केली जात आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, "सध्या बिहारमध्ये ते लागू केले गेले आहे, पण हे स्पष्ट आहे की ते देशातील प्रत्येक राज्यात लागू केले जाईल. खरे लक्ष्य बंगाल आहे, कारण ते स्थलांतरित कामगार आणि गरीब मतदारांना घाबरतात." गरीब आणि कामगारांना त्यांच्या पालकांचे प्रमाणपत्र कुठून मिळेल?, असा सवालही त्यांनी केला. त्यांनी या नवीन प्रक्रियेची थेट तुलना एनआरसीशी केली आणि ती त्याहूनही धोकादायक असल्याचे म्हटले. "हे लोक जाणूनबुजून गरीब आणि तरुण मतदारांचे हक्क हिरावून घेऊ इच्छितात. तरुण पिढीला मतदानाचा अधिकार नाही का?, असा आरोपही त्यांनी केला.

'निवडणूक आयोग कोणत्याही राजकीय पक्षाशी चर्चा न करता एकतर्फी निर्णय घेत आहे, असा आरोप सीएम ममता बॅनर्जी यांनी केला. त्या म्हणाल्या, "ECI ला वाटते की राजकीय पक्ष आणि निवडून आलेली सरकारे त्यांचे गुलाम आहेत. ही मानसिकता लोकशाहीला कमकुवत करते." निवडणूक आयोगाने TMC कडून बूथ लेव्हल एजंट्सची माहिती मागितली आहे, जी पक्षाने देण्यास नकार दिला आहे, असंही त्यांनी सांगितले.ही सर्व भाजप प्रचारकांनी बनवलेली योजना आहे. मी त्याचा तीव्र विरोध करेन, असंही त्या म्हणाल्या.

टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूक 2024Mamata Banerjeeममता बॅनर्जी