शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

अविवाहित महिलेच्या मुलाला कागदपत्रांत केवळ आईचे नाव टाकण्याची मुभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 12:54 IST

बलात्कार पीडित आणि अविवाहित मातांची मुलेही या देशात खासगीत्व, स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांसह सन्मानाने राहू शकतात

कोची : बलात्कार पीडित आणि अविवाहित मातांची मुले या देशात खासगीत्व, स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांसह  सन्मानाने राहू शकतात, असे सांगत केरळ उच्च न्यायालयाने अविवाहित महिलेच्या मुलाला जन्म प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि अन्य कागदपत्रांत केवळ आईचे नाव ठेवण्याची परवानगी दिली. अविवाहित मातेचा मुलगाही या देशाचा नागरिक आहे आणि कोणीही राज्यघटनेद्वारे प्राप्त त्याच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करू शकत नाही, असे न्यायमूर्ती पी. व्ही. कुन्हीकृष्णन यांनी १९ जुलै रोजीच्या आदेशात म्हटले आहे.

बलात्कार पीडित आणि अविवाहित मातांची मुलेही या देशात खासगीत्व, स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांसह सन्मानाने राहू शकतात. कोणीही त्यांच्या जीवनात हस्तक्षेप करू शकत नाही. जर कोणी असे केले तर या देशाची न्यायव्यवस्था त्यांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करेल, असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. याचिकाकर्त्याची आई अविवाहित होती. याचिकाकर्त्याच्या पित्याचे नाव तीन कागदपत्रांत वेगवेगळे होते. ती हटवून त्याठिकाणी केवळ आईचे नाव टाकू देण्याची मागणी त्याने याचिकेद्वारे केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने वरील मत नोंदवले. त्याचबरोबर  याचिकाकर्त्याच्या पित्याचे नाव जन्म नोंदणी रजिस्टरमधून हटवून तेथे केवळ आईचे नाव टाकावे आणि एकच पालक म्हणून प्रमाणपत्र जारी करावे, असे आदेश जन्म आणि मृत्यू निबंधक कार्यालयाला दिले. त्याचबरोबर सामान्य शिक्षण विभाग, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, आधार, आयकर विभाग, पासपोर्ट अधिकारी, भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाला याचिकाकर्त्याच्या पित्याचे नाव अधिकृत नोंदी आणि डेटाबेसमधून हटविण्याचे निर्देश दिले. 

ती केवळ अविवाहित माता नाहीतर या देशाची महान लेक आहे. सरकारने त्याची (याचिकाकर्ता) ओळख जाहीर न करता अन्य नागरिकांप्रमाणे त्याच्या प्रतिष्ठेची जपणूक केली पाहिजे. अन्यथा त्याला असहनीय मानसिक वेदनेला सामोरे जावे लागेल, असेही न्यायालयाने म्हटले. 

कर्णाचे दिले उदाहरण...आम्हाला असा समाज हवा आहे ज्यात कर्णासारखे पात्र नसेल. माता-पिता माहीत नसल्याने तिरस्कार सोसावा लागून आपले जीवन अभिशाप आहे, असे कोणाला वाटू नये. महाभारताचा खरा नायक आणि योद्धा असलेला कर्ण आम्हाला हवा आहे. आमची राज्यघटना आणि न्यायव्यवस्था अशा सर्वांचे रक्षण करेल आणि नव्या युगातील कर्ण अन्य नागरिकांप्रमाणे सन्मानाने जगू शकतात, असे न्यायमूर्तींनी म्हटले.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयWomenमहिला