शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

अविवाहित महिलेच्या मुलाला कागदपत्रांत केवळ आईचे नाव टाकण्याची मुभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 12:54 IST

बलात्कार पीडित आणि अविवाहित मातांची मुलेही या देशात खासगीत्व, स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांसह सन्मानाने राहू शकतात

कोची : बलात्कार पीडित आणि अविवाहित मातांची मुले या देशात खासगीत्व, स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांसह  सन्मानाने राहू शकतात, असे सांगत केरळ उच्च न्यायालयाने अविवाहित महिलेच्या मुलाला जन्म प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि अन्य कागदपत्रांत केवळ आईचे नाव ठेवण्याची परवानगी दिली. अविवाहित मातेचा मुलगाही या देशाचा नागरिक आहे आणि कोणीही राज्यघटनेद्वारे प्राप्त त्याच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करू शकत नाही, असे न्यायमूर्ती पी. व्ही. कुन्हीकृष्णन यांनी १९ जुलै रोजीच्या आदेशात म्हटले आहे.

बलात्कार पीडित आणि अविवाहित मातांची मुलेही या देशात खासगीत्व, स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांसह सन्मानाने राहू शकतात. कोणीही त्यांच्या जीवनात हस्तक्षेप करू शकत नाही. जर कोणी असे केले तर या देशाची न्यायव्यवस्था त्यांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करेल, असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. याचिकाकर्त्याची आई अविवाहित होती. याचिकाकर्त्याच्या पित्याचे नाव तीन कागदपत्रांत वेगवेगळे होते. ती हटवून त्याठिकाणी केवळ आईचे नाव टाकू देण्याची मागणी त्याने याचिकेद्वारे केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने वरील मत नोंदवले. त्याचबरोबर  याचिकाकर्त्याच्या पित्याचे नाव जन्म नोंदणी रजिस्टरमधून हटवून तेथे केवळ आईचे नाव टाकावे आणि एकच पालक म्हणून प्रमाणपत्र जारी करावे, असे आदेश जन्म आणि मृत्यू निबंधक कार्यालयाला दिले. त्याचबरोबर सामान्य शिक्षण विभाग, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, आधार, आयकर विभाग, पासपोर्ट अधिकारी, भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाला याचिकाकर्त्याच्या पित्याचे नाव अधिकृत नोंदी आणि डेटाबेसमधून हटविण्याचे निर्देश दिले. 

ती केवळ अविवाहित माता नाहीतर या देशाची महान लेक आहे. सरकारने त्याची (याचिकाकर्ता) ओळख जाहीर न करता अन्य नागरिकांप्रमाणे त्याच्या प्रतिष्ठेची जपणूक केली पाहिजे. अन्यथा त्याला असहनीय मानसिक वेदनेला सामोरे जावे लागेल, असेही न्यायालयाने म्हटले. 

कर्णाचे दिले उदाहरण...आम्हाला असा समाज हवा आहे ज्यात कर्णासारखे पात्र नसेल. माता-पिता माहीत नसल्याने तिरस्कार सोसावा लागून आपले जीवन अभिशाप आहे, असे कोणाला वाटू नये. महाभारताचा खरा नायक आणि योद्धा असलेला कर्ण आम्हाला हवा आहे. आमची राज्यघटना आणि न्यायव्यवस्था अशा सर्वांचे रक्षण करेल आणि नव्या युगातील कर्ण अन्य नागरिकांप्रमाणे सन्मानाने जगू शकतात, असे न्यायमूर्तींनी म्हटले.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयWomenमहिला