शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

वाऱ्याची दिशा बदलल्यास दिल्लीऐवजी मेरठमध्ये पडेल कृत्रिम पाऊस; नेमका खर्च किती?, पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 14:55 IST

दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी आयआयटी कानपूरच्या टीमसोबत कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत बैठक बोलावली होती.

नवी दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये दिवसागणिक प्रदूषणामध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. त्याचप्रमाणे राजधानी दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स हा ४०० पार झालाय. त्यामुळे दिल्लीतील प्रदूषण नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी केजरीवाल सरकार विविध निर्णय घेत आहे. यामध्ये सम-विषम फॉर्म्युला लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी देखील सरकार तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे. 

दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी आयआयटी कानपूरच्या टीमसोबत कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत बैठक बोलावली होती. यामध्ये आयआयटी कानपूरने संपूर्ण योजना दिल्ली सरकारला सादर केली आहे. यानंतर २० आणि २१ नोव्हेंबर रोजी कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र कृत्रिम पाऊस पाडणे इतके सोपं नाही. कृत्रिम पाऊस पाडताना दोन मुख्य समस्यांना समोरे जायला लागू शकते, असं सांगितले जात आहे. 

कृत्रिम पावसाची प्रक्रिया करताना प्रथम वाऱ्याचा वेग आणि दिशा, याचा विचार करावा लागेल. दुसरे म्हणजे, आकाशात ४० टक्के ढग असावेत आणि त्यात द्रव (पाणी) असावं. आता या दोन्ही परिस्थितींमध्ये थोडाफार फरक असेल, पण खूप फरक असेल तर दिल्लीवर कृत्रिम पावसाची चाचणी निरुपयोगी ठरू शकते किंवा त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तसेच वाऱ्याची दिशा बदलल्यास दिल्लीऐवजी मेरठमध्ये कृत्रिम पाऊस पडू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने जुलैपासून या संदर्भात IIT कानपूरच्या शास्त्रज्ञांसोबत तीन बैठका घेतल्या आहेत.

एकदा पाऊस पाडण्यासाठी १० ते १५ लाख रुपये खर्च-

दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडल्यास सुमारे १० ते १५ लाख रुपये मोजावे लागतील. आतापर्यंत जगातील ५३ देशांनी हा प्रयोग केला आहे. कानपूरमध्ये छोट्या विमानाने या कृत्रिम पावसाच्या छोट्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी पाऊस तर काहींमध्ये नुसता रिमझिम पाऊस पडला होता. २०१९मध्येही दिल्लीत कृत्रिम पावसाची तयारी करण्यात आली होती. पण ढग आणि इस्रोने परवानगी नसल्याने हे प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.

१३ नोव्हेंबरपासून दिल्लीत सम-विषम प्रणाली लागू होणार-

दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची जळजळ, ऍलर्जी अशा आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिल्लीचे केजरीवाल सरकार विविध पावले उचलत आहे. केजरीवाल सरकारने नुकतेच १३ नोव्हेंबरपासून सम-विषम फॉर्म्युला लागू करण्याची घोषणा केली आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल