शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाऱ्याची दिशा बदलल्यास दिल्लीऐवजी मेरठमध्ये पडेल कृत्रिम पाऊस; नेमका खर्च किती?, पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 14:55 IST

दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी आयआयटी कानपूरच्या टीमसोबत कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत बैठक बोलावली होती.

नवी दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये दिवसागणिक प्रदूषणामध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. त्याचप्रमाणे राजधानी दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स हा ४०० पार झालाय. त्यामुळे दिल्लीतील प्रदूषण नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी केजरीवाल सरकार विविध निर्णय घेत आहे. यामध्ये सम-विषम फॉर्म्युला लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी देखील सरकार तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे. 

दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी आयआयटी कानपूरच्या टीमसोबत कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत बैठक बोलावली होती. यामध्ये आयआयटी कानपूरने संपूर्ण योजना दिल्ली सरकारला सादर केली आहे. यानंतर २० आणि २१ नोव्हेंबर रोजी कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र कृत्रिम पाऊस पाडणे इतके सोपं नाही. कृत्रिम पाऊस पाडताना दोन मुख्य समस्यांना समोरे जायला लागू शकते, असं सांगितले जात आहे. 

कृत्रिम पावसाची प्रक्रिया करताना प्रथम वाऱ्याचा वेग आणि दिशा, याचा विचार करावा लागेल. दुसरे म्हणजे, आकाशात ४० टक्के ढग असावेत आणि त्यात द्रव (पाणी) असावं. आता या दोन्ही परिस्थितींमध्ये थोडाफार फरक असेल, पण खूप फरक असेल तर दिल्लीवर कृत्रिम पावसाची चाचणी निरुपयोगी ठरू शकते किंवा त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तसेच वाऱ्याची दिशा बदलल्यास दिल्लीऐवजी मेरठमध्ये कृत्रिम पाऊस पडू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने जुलैपासून या संदर्भात IIT कानपूरच्या शास्त्रज्ञांसोबत तीन बैठका घेतल्या आहेत.

एकदा पाऊस पाडण्यासाठी १० ते १५ लाख रुपये खर्च-

दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडल्यास सुमारे १० ते १५ लाख रुपये मोजावे लागतील. आतापर्यंत जगातील ५३ देशांनी हा प्रयोग केला आहे. कानपूरमध्ये छोट्या विमानाने या कृत्रिम पावसाच्या छोट्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी पाऊस तर काहींमध्ये नुसता रिमझिम पाऊस पडला होता. २०१९मध्येही दिल्लीत कृत्रिम पावसाची तयारी करण्यात आली होती. पण ढग आणि इस्रोने परवानगी नसल्याने हे प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.

१३ नोव्हेंबरपासून दिल्लीत सम-विषम प्रणाली लागू होणार-

दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची जळजळ, ऍलर्जी अशा आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिल्लीचे केजरीवाल सरकार विविध पावले उचलत आहे. केजरीवाल सरकारने नुकतेच १३ नोव्हेंबरपासून सम-विषम फॉर्म्युला लागू करण्याची घोषणा केली आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल