शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

केजरीवाल यांच्यावर सोनीपतमध्ये गुन्हा दाखल, 'त्या' एका विधानानं अडचण वाढली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 20:14 IST

मुख्यमंत्री नायब सैनी यांनी सोनीपत जिल्हा न्यायालयात केजरीवाल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

आम आदमी पक्षाचे प्रमुख तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अडचण वाढताना दिसत आहे. हरियाणातील सोनीपत येथे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरियाणा सरकारने यमुनेत विष मिसळल्याच्या त्यांच्या विधानावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात, हरियाणा सरकारने आपत्ती व्यवस्थापन कलम 2D, 154 अंतर्गत सोनीपत येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे. मुख्यमंत्री नायब सैनी यांनी सोनीपत जिल्हा न्यायालयात केजरीवाल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

केजरीवाल यांचं विधान भ्रम निर्माण करणारे - यासंसंदर्भात हरियाणाचे महसूल तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विपुल गोयल पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "अरविंद केजरीवाल यांचे विधान हास्यास्पद आणि भ्रम निर्माण करणारे आहे. हरियाणावर असे आरोप करून केजरीवाल यांनी अत्यंत हीन दर्जाचे राजकारण केले आहे. यासंदर्भात हरियाणा सरकारने कायदेशीर कारवाई केली आहे. दिल्लीला जे पाणी पुरवले जाते तेच पाणी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री देखील पितात. हे विधान करून केजरीवाल यांनी केवळ दिल्लीतील लोकांमध्येच नव्हे तर हरियाणातील लोकांमध्येही भीती पसरवण्याचे काम केले आहे.

अशी आहे शिक्षेची तरतूद -आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मध्ये अस्तित्वात आला होता, मात्र, केंद्र सरकारने १ ऑगस्ट २०२४ रोजी लोकसभेत आपत्ती व्यवस्थापन (सुधारणा) विधेयक, २०२४ सादर करून तो मंजूर केला. आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत खोटी माहिती देणाऱ्या किंवा अफवा पसरवणाऱ्यांना एक ते दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद या विधेयकात आहे. यासोबतच दंड अथवा शिक्षा आणि दंड दोन्ही एकत्रित देण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपHaryanaहरयाणा