शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शेतकरी-सरकार चर्चेची ९ वी फेरीही ठरली निष्फळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 05:37 IST

१९ जानेवारीला पुन्हा चर्चा करणार, शेतकरी न्यायालयीन समितीकडे जाणार नाहीत; भूमिकेवर ठाम

विकास झाडेनवी दिल्ली : केंद्र सरकार आणि  शेतकरी संघटना यांच्यात झालेली आजची नववी बैठकही निष्फळ ठरली आहे. शेतकऱ्यांचा एकच रेटा आहे. कृषी कायदे रद्द करण्यात यावेत आणि एमएसपी कायदा लागू करावा. पुढची बैठक ही १९ जानेवारीला होणार आहे.  बैठकीनंतर भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी आमच्या केवळ दोनच मागण्या आहेत, त्या म्हणजे कृषी कायदा रद्द करणे आणि एमएसपी कायदा तयार करणे. आम्ही यासाठी सुप्रीम कोर्टाने तयार केलेल्या समितीकडे जाणार नाही, आमची चर्चा सरकारसोबतच सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. आजच्या बैठकीत कोणताही तोडगा निघू न शकल्याने शेतकरी नाराज होते. मात्र, कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सरकारचे काय म्हणणे आहे ते सुप्रीम कोर्टाने गठित केलेल्या समितीकडे मांडू. सरकार आणि शेतकरी यांच्यात तोडगा काढण्यासाठीच ही समिती गठित करण्यात आली असल्याचे सांगितले. 

शेतकरी नेत्यांनी एकत्र बसून कायद्याबाबत मसुदा तयार करावा, आम्ही त्यावर चर्चा करायला तयार आहोत, याकडेही तोमर यांनी लक्ष वेधले. कायदा रद्दच करायचा असल्यास तो सुप्रीम कोर्टाने करावा, अशी भूमिका आता सरकारने घेतली आहे. 

सीमेवर गर्दी वाढली आंदोलन सुरू असलेल्या दिल्लीच्या सीमांवर आता मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. २६ जानेवारीचा गणतंत्र दिवसाचा सोहळा लक्षात घेत मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीकडे येत आहेत. ओडिशाहून आज निघालेली शेतकऱ्यांची यात्रा प. बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशमार्गे दिल्लीत २१ जानेवारीला पोहोचत आहे. विविध राज्यांतील शेतकरी यात सहभागी होतील. १२ जानेवारी रोजी पुण्याहून निघालेले शेतकरी २६ ला दिल्लीत पोहोचतील.

प्रजासत्ताकदिनी रॅलीबाबत सोमवारी सुनावणी

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आक्षेप जाणून घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने गठित केलेल्या चार तज्ज्ञांच्या समितीच्या एका सदस्याने राजीनामा दिला असतानाच, कोर्ट सोमवारी शेतकरी आंदोलनासंदर्भात सुनावणी घेणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात आंदोलक अडथळा आणतील, अशी भीती सरकारने कोर्टात व्यक्त केली होती. प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर किंवा अन्य प्रकारच्या वाहनांची रॅली काढण्यासंदर्भात शेतकऱ्यांना काही निर्देश किंवा सूचना देऊ शकते. 

सोमवारी सुनावणीसाठी असलेल्या त्रिसदस्यीय न्यायाधीशांच्या रचनेतही बदल करण्यात आला आहे. यावेळी खंडपीठाचे प्रमुख सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासोबत न्या. एल. नागेश्वर राव आणि न्या. विनीत सरण हे असणार आहेत. १२ जानेवारीला झालेल्या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांसोबत न्या. ए. एस. बोपन्ना आणि आणि न्या. व्ही. रामसुब्रमणियन हे होते. किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष भूपिंदरसिंग मान यांनी सुप्रीम कोर्टाद्वारे स्थापित करण्यात आलेल्या समितीतून अंग काढून घेतले आहे. याची दखल कोर्ट सोमवारच्या सुनावणीत घेऊ शकते. या समितीला पुढील १० दिवसात काम सुरू करून दोन महिन्यात अहवाल सादर करावयाचा आहे. 

 

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संप