शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

एका वर्षात ९८ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या अन् मोदी विश्व गुरू व्हायला चाललेत; काँग्रेसचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 15:12 IST

एका वर्षात देशातील ९८ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्व गुरू व्हायला चालले आहेत, पहिलं तुम्ही देशाचे गुरू तरी बना, असा खोचक टोला काँग्रेसचे नेते मल्लिकार्झुन खरगे यांनी मोदींना लगावला आहे.

एका वर्षात देशातील ९८ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्व गुरू व्हायला चालले आहेत, पहिलं तुम्ही देशाचे गुरू तरी बना, असा खोचक टोला काँग्रेसचे नेते मल्लिकार्झुन खरगे यांनी मोदींना लगावला आहे. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं दिल्लीत पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यात मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकावर जोरदार हल्लाबोल केला. 

काँग्रेसच्या योजनेमुळे देशातील २७ टक्के जनता गरिबीतून बाहेर आली तर मोदींमुळे २३ टक्के जनता पुन्हा गरिबीत ढकलली गेली. त्यामुळे मोदी सरकार हे लोकांचं उत्पन्न वाढवणारं नव्हे, तर उत्पन्न घालवणारं सरकार आहे, असा आरोप खरगे यांनी यावेळी केला. 

पेट्रोलनं गाठली शंभरीदेशात आज अनेक ठिकाणी पेट्रोल १०० रुपयांच्या घरात पोहोचलं आहे. देशात आज महाराष्ट्रात सर्वाधिक महाग पेट्रोल विकलं जातंय. मुंबईसारख्या शहरात आज पेट्रोल प्रतिलीटर १०८ रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. केंद्र सरकार इंधनाच्या किमतीवर सेस लावत आहे. तो कोणत्याही राज्याला मिळत नाही. तो थेट केंद्र सरकारच्या तिजोरीत जात आहे. पेट्रोलवर कर लादून केंद्रानं २५ लाख कोटी रुपये कमावले आहेत. पण त्यातील कोणताही महसूल राज्याला दिलेला नाही, असा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. 

मोदींनी ५ वर्ष मागितली होती त्याचं काय झालं?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्याआधी काँग्रेसला ७० वर्ष दिली. मला ५ वर्ष द्या, पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करुन दाखवतो असं आश्वासन दिलं होतं. त्याचं काय झालं?, असा खोचक सवाल खरगे यांनी यावेळी उपस्थित केला. देशाच्या इतिहासात आज सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल विकलं जात आहे. तर सिलिंडरच्या दरातही वाढ झालीय. सिलिंडरवर मिळणारं अनुदान गेल्या तीन महिन्यांपासून कुणालाही मिळालेलं नाही, असंही खरगे म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या