शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

2.89 लाख कोटी रुपये जमा करणारे ते 9.72 लाख ठेवीदार रिझर्व्ह बँकेच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 18:07 IST

नोटाबंदीनंतर 2.89 लाख कोटी रुपयांची रोख रक्कम बँकेमध्ये भरणारे 9.72 लाख लोक रडारवर असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने गुरुवारी दिली आहे. या ठेवीदारांनी 13.33 लाख बँक खात्यांचा वापर ही रक्कम जमा करण्यासाठी केला आहे.

ठळक मुद्देचलनात असलेल्या 99 टक्के नोटा परत आल्याचे रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेअवघे 8000 कोटी रुपये परत आले नसल्याचे सांगण्यात आले.नोटाबंदीमुळे करदात्यांमध्ये वाढ झाली असून 56 लाख नवीन करदाते यंत्रणेशी जोडले गेले आहेत.

नवी दिल्ली, दि. 31 - नोटाबंदीनंतर 2.89 लाख कोटी रुपयांची रोख रक्कम बँकेमध्ये भरणारे 9.72 लाख लोक रडारवर असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने गुरुवारी दिली आहे. या ठेवीदारांनी 13.33 लाख बँक खात्यांचा वापर ही रक्कम जमा करण्यासाठी केला आहे.काल बुधवारी रिझर्व्ह बँकेने वार्षिक अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी भारताच्या मध्यवर्ती बँकेने ही माहिती दिली आहे. गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर रोजी केलेल्या ऐतिहासिक नोटाबंदीनंतर 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. त्यानंतर चलनात असलेल्या  99 टक्के नोटा परत आल्याचे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आणि अवघे 8000 कोटी रुपये परत आले नसल्याचे सांगण्यात आले.जवळपास 15 लाख कोटी रुपयांचे चलन परत आल्यानंतर यामध्ये काळ्या पैशाचे प्रमाण लक्षणीय असल्याचा अंदाजही रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. अर्थव्यवस्थेतील रोख रक्कमांचे व्यवहार कमी करावे हा नोटाबंदीचा उद्देश होता, असे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले. आता, प्रत्येक पैशाला कुणी ना कुणी मालक असल्याचेही ते म्हणाले.गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना जेटली म्हणाले की, बँकेमध्ये पैसे जमा झाले याचा अर्थ असा नाही, की हे सगळे पैसे कायदेशीर आहेत. नोटाबंदीमुळे तीन लाख नकली कंपन्या उघड झाल्याचेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. तसेच नोटाबंदीमुळे करदात्यांमध्ये वाढ झाली असून 56 लाख नवीन करदाते यंत्रणेशी जोडले गेले आहेत.

काँग्रेसचा सरकारवर तुफानी हल्ला

रिझर्व्ह बँकेने नोटाबंदी संदर्भातील आकडेवारी जाहीर केली असून, बंद करण्यात आलेल्या नोटांपैकी सुमारे ९९ टक्के नोटा नागरिकांनी बँकांत जमा केल्या आहेत. केवळ १ टक्का नोटा जमा झालेल्या नाहीत, असे या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, बंद करण्यात आलेल्या ६,७00 दशलक्ष नोटांपैकी फक्त ८९ दशलक्ष नोटा रिझर्व्ह बँकेला परत मिळाल्या नाहीत. बंद नोटांच्या स्वरूपात चलनात असलेल्या १५.४४ लाख कोटींपैकी १५.२८ लाख कोटी रुपये रिझर्व्ह बँकेला परत मिळाले आहेत. १ हजार रुपयांच्या १.३ टक्के नोटा बँकांत जमा झालेल्या नाहीत. त्यांची किंमत ८.९ कोटी रुपये आहे.या मुद्द्यावरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारवर तुफान हल्ला चढविला आहे. १ टक्का रकमेसाठी नोटाबंदी लागू करण्यात आली, अशी टीका त्यांनी केली आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ट्विट करून नोटाबंदीच्या निर्णयाची खिल्ली उडविली. त्यांनी म्हटले की, बंद करण्यात आलेल्या नोटांच्या स्वरूपात १५,४४,000 कोटी रुपये चलनात होते. त्यापैकी फक्त १६,000 कोटी रुपये रिझर्व्ह बँकेला परत मिळालेले नाहीत. याचा अर्थ नोटाबंदीतून रिझर्व्ह बँकेला काळ्या पैशाच्या स्वरूपात १६,000 कोटी रुपयांचा लाभ झाला. त्याच वेळी नव्या नोटा छापण्यासाठी २१,000 कोटी रुपये खर्च झाले. ९९ टक्के नोटा कायदेशीररीत्या परत मिळाल्या आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी